शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

4 जी स्पीडमध्ये भारत आता पाकिस्तान, श्रीलंकेपेक्षा मागे

By admin | Updated: June 8, 2017 10:58 IST

4 जी इंटरनेटच्या स्पीडच्या शर्यतीत भारत आता पाकिस्तान आणि श्रीलंकेपेक्षा मागे राहिलं आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 8-  सध्याचं जगं हे इंटरनेटचं जग आहे. डिजीटल क्रांतीच्या या युगात सगळीकडेच इंटरनेटचा वापर केला जातो. तसंच विविध टेलिकॉम कंपन्यांकडून हाय स्पीड तसंत सुपर हाय स्पीड इंटरनेट सेवा दिल्या जातात. पण भारतामध्ये मात्र हाय स्पीड इंटरनेट द्यायचा टेलिकॉम कंपन्यांचा दावा पोकळ ठरतो आहे. 4 जी इंटरनेटच्या स्पीडच्या शर्यतीत भारत आता पाकिस्तान आणि श्रीलंकेपेक्षा मागे राहिलं आहे. अनेक क्षेत्रात भारताच्या कित्येक पट मागे असलेले पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश 4 जी इंटरनेटे सेवेच्या बाबतीत भारतापेक्षा पुढे गेले आहेत.
 
भारतात ४ जी इंटरनेट डाऊनलोड स्पीडची सरासरी 5.1 Mbps इतकी आहे. जगाच्या इंटरनेट सरासरीपेक्षा ही सरासरी एक-तृतीयांश पेक्षाही कमी आहे. जागतिक स्तरावर थ्रीजी इंटरनेटची सरासरी 4.4 mbps इतकी असून भारतातील "4 जी"चा स्पीड यापेक्षा फक्त 0.7 mbpsनं अधिक आहे. त्याचवेळी जगातील "४ जी" इंटरनेट स्पीडची सरासरी तब्बल 16.2Mbps इतकी आहे.
 
देशात "जिओ"ने ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर देऊन टेलिकॉम विश्वात स्पर्धा निर्माण केली आहे. एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया  यांनीही मैदानात उतरून इंटरनेटच्या दरांत मोठ्या प्रमाणावर घट केली आणि ग्राहकांना विविध ऑफर्स देऊ केल्या. पण, वास्तवात इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत जगात ७४व्या स्थानावर आहे.  भारतापेक्षा पाकिस्तान आणि  श्रीलंका हे देश  पुढे आहेत. ४ जी इंटरनेटच्या स्पीडमध्ये सिंगापूर पहिल्या स्थानावर आहे, तर दक्षिण कोरियाचा दुसरा क्रमांक लागतो.
 
ट्रायच्या माहितीनुसार, देशात काही ठिकाणी  थ्रीजी स्पीड १० kbps पेक्षाही कमी आहे.   तसंच देशातील इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये गेल्या 6 महिन्यांमध्ये 1 मेगाबाइट प्रति सेकंदपेक्षाही अधिक घट झाली आहे, असं  ट्रायने एका अहवालात म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये इंटरनेट स्पीडबाबत ग्राहकांच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.