शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

४७ गावे झाली जलयुक्त

By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST

पुणे : टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने नव्याने सुरू केलेली जलयुक्त शिवार अभियानामध्ये जिल्‘ातील २०० पैकी ४७ गावे जलयुक्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. १५ ऑगस्ट रोजी या गावांमध्ये झालेल्या ग्रामसभांत ही गावे जलयुक्त झाल्याचा ठराव करण्यात आला आहे.

पुणे : टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने नव्याने सुरू केलेली जलयुक्त शिवार अभियानामध्ये जिल्‘ातील २०० पैकी ४७ गावे जलयुक्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. १५ ऑगस्ट रोजी या गावांमध्ये झालेल्या ग्रामसभांत ही गावे जलयुक्त झाल्याचा ठराव करण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत २०० गावांची निवड करून ही गावे टंचाईमुक्त करण्याचा अराखडा तयार करण्यात आला आहे. राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमात असलेली, तसेच ५० पेक्षा कमी पैसेवारी आलेली व टंचाईग्रस्त गावे यामध्ये निवडण्यात आली आहेत. जिल्‘ाच्या प्रत्येक तालुक्यातील १५ ते २० गावे घेण्यात आली आहेत.
यामध्ये अभियानात साखळी सिमेंट बंधारे, नालाबांध कार्यक्रम, नाला खोलीकरण, जल व कृषी संधारण, गाळ काढणे, विहीर पुनर्भरण, पाणी अडवणे व जिरवणे यासाठी चर खोदाई, अशी कामे करण्यात आली आहेत.
या २०० गावांमध्ये ७ हजार कामे हाती घेतली होती. यात कृषी, वन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, पाणीपुरवठा, भूजल विभाग ही कामे करीत आहे. आजच्या परिस्थितीत जिल्‘ात ९० टक्क्यांपर्यंत ४७ गावांत कामे झाली आहेत. ५२ गावांत ५० ते ७० टक्के, ५० गावांत ३० ते ४० टक्के, २८ गावांत ३८ टक्क्यांपर्यंत कामे पूर्ण झाली आहे. यातील ९० टक्क्यांपर्यंत कामे ज्या गावांत झाली आहेत. ती गावे जलयुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आली आहेत.
ग्रामसभेत तसा प्रस्ताव ठेवण्यात येऊन आपल्या गावात या योजनेंतर्गत किती कामे व किती खर्च झाला, हे मांडण्यात आले. यावर कोणाच्या सूचना, हरकती, तक्रारी घेण्यात आल्या. यानंतर सर्वांच्या मते गाव जलयुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले.
कामांसाठी आतापर्यंत ६१ कोटी ७७ लाख इतका निधी खर्च करण्यात येत असून, ३० कोटींचा लोकसहभाग व ३२ कोटींची कामेही शासकीय निधीतून करण्यात येत आहेत. जवळपास पहिल्या टप्प्यातील हा निधी खर्च झाला आहे.