शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
2
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
3
दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
4
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
5
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
6
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
7
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
8
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
10
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
11
IND vs SA World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
12
Shocking!! कॅप्टन बनताच Bigg Boss 19च्या घरातून बेघर झाला प्रणित मोरे? एलिमिनेशनमध्ये मोठा ट्विस्ट
13
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
14
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
15
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
16
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
17
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
18
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
19
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
20
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात

मोदी राजवटीत रोज ४७ शेतक-यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 05:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे शेतक-यांना उद््ध्वस्त करणारी असून, मोदी सत्तेवर आल्यापासून देशभरात दररोज ४७ शेतकरी आत्महत्या करत असल्याचे आकडेवारीवरुन दिसते असा आरोप काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे शेतक-यांना उद््ध्वस्त करणारी असून, मोदी सत्तेवर आल्यापासून देशभरात दररोज ४७ शेतकरी आत्महत्या करत असल्याचे आकडेवारीवरुन दिसते असा आरोप काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकºयांचा नशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर बोलताना सुरजेवाला म्हणाले की, शेतकºयांना दिलेली आश्वासने सरकार पूर्ण करू शकलेले नाही. शेतकºयांच्या प्रश्नांसंदर्भात मोदी सरकार असंवेदनशील बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या अध्यक्षांबरोबर नौकाविहार करण्यात मग्न आहेत तर दुसºया बाजूला शेतकरी आपली दुस्थिती सरकारसमोर मांडण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरला आहे. महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेला सोमवारी ८८ वर्षे पूर्ण होत असतानाच शेतकºयाला आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी १८० किलोमीटर चालत सरकारच्या दारी जावे लागते, हे दुर्दैवी आहे.काँग्रेसने म्हटले आहे की, एक जानेवारी २०१७पर्यंत महाराष्ट्रामध्ये २,४१४ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. इतकी भीषण स्थिती असूनही मोदी व अरुण जेटली यांनी शेतकºयांना कर्जमाफी देण्यास नकार दिला. शेतमालाची निर्यात घटली व आयात वाढली आहे. मोदी सरकार शेतकºयांऐवजी दलालांची मदत करीत आहे. २०१३-१४या वर्षात काँग्रेस सरकारच्या काळात तेव्हा निर्यातीतून ४२.२३ अब्ज डॉलर व आयातीतून १५.०३ अब्ज डॉलरची उलाढाल होत होती. २०१६-१७या कालावधीत निर्यातीतून ३३.८२ अब्ज डॉलर व आयातीतून २५.०९ अब्ज डॉलर इतकी उलाढाल झाली. डाळ व गव्हाच्या व्यापाºयांना फायदा व्हावा यासाठी मोदी सरकारने इम्पोर्ट ड्युटी शून्यावर आणली. या कृतीतून मोदी सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवत असल्याचे स्पष्ट होते.>शेतकºयांच्या स्थितीवर अहवालशेतकºयांचे न सुटलेले प्रश्न व त्याबाबत मोदी सरकारने दाखविलेली निष्क्रिय्रता हे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे मुख्य मुद्दे बनविण्याचा विचार काँग्रेस पक्ष करत आहे. शेतकºयांच्या स्थितीबद्दल येत्या १६ मार्चपासून सुरू होणाºया काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात अधिवेशनात खास चर्चा करण्यात येईल व त्याचा एक अहवाल तयार करण्यात येणार आहे. शेतकºयांची स्थिती सुधारण्यासाठी नेमके काय करायला हवे, सत्तेत आल्यानंतर शेतकºयांसाठी काँग्रेस पक्ष काय करणार आहे, याबाबत अहवालात माहिती देण्यात येईल.