शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी राजवटीत रोज ४७ शेतक-यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 05:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे शेतक-यांना उद््ध्वस्त करणारी असून, मोदी सत्तेवर आल्यापासून देशभरात दररोज ४७ शेतकरी आत्महत्या करत असल्याचे आकडेवारीवरुन दिसते असा आरोप काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे शेतक-यांना उद््ध्वस्त करणारी असून, मोदी सत्तेवर आल्यापासून देशभरात दररोज ४७ शेतकरी आत्महत्या करत असल्याचे आकडेवारीवरुन दिसते असा आरोप काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकºयांचा नशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर बोलताना सुरजेवाला म्हणाले की, शेतकºयांना दिलेली आश्वासने सरकार पूर्ण करू शकलेले नाही. शेतकºयांच्या प्रश्नांसंदर्भात मोदी सरकार असंवेदनशील बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या अध्यक्षांबरोबर नौकाविहार करण्यात मग्न आहेत तर दुसºया बाजूला शेतकरी आपली दुस्थिती सरकारसमोर मांडण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरला आहे. महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेला सोमवारी ८८ वर्षे पूर्ण होत असतानाच शेतकºयाला आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी १८० किलोमीटर चालत सरकारच्या दारी जावे लागते, हे दुर्दैवी आहे.काँग्रेसने म्हटले आहे की, एक जानेवारी २०१७पर्यंत महाराष्ट्रामध्ये २,४१४ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. इतकी भीषण स्थिती असूनही मोदी व अरुण जेटली यांनी शेतकºयांना कर्जमाफी देण्यास नकार दिला. शेतमालाची निर्यात घटली व आयात वाढली आहे. मोदी सरकार शेतकºयांऐवजी दलालांची मदत करीत आहे. २०१३-१४या वर्षात काँग्रेस सरकारच्या काळात तेव्हा निर्यातीतून ४२.२३ अब्ज डॉलर व आयातीतून १५.०३ अब्ज डॉलरची उलाढाल होत होती. २०१६-१७या कालावधीत निर्यातीतून ३३.८२ अब्ज डॉलर व आयातीतून २५.०९ अब्ज डॉलर इतकी उलाढाल झाली. डाळ व गव्हाच्या व्यापाºयांना फायदा व्हावा यासाठी मोदी सरकारने इम्पोर्ट ड्युटी शून्यावर आणली. या कृतीतून मोदी सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवत असल्याचे स्पष्ट होते.>शेतकºयांच्या स्थितीवर अहवालशेतकºयांचे न सुटलेले प्रश्न व त्याबाबत मोदी सरकारने दाखविलेली निष्क्रिय्रता हे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे मुख्य मुद्दे बनविण्याचा विचार काँग्रेस पक्ष करत आहे. शेतकºयांच्या स्थितीबद्दल येत्या १६ मार्चपासून सुरू होणाºया काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात अधिवेशनात खास चर्चा करण्यात येईल व त्याचा एक अहवाल तयार करण्यात येणार आहे. शेतकºयांची स्थिती सुधारण्यासाठी नेमके काय करायला हवे, सत्तेत आल्यानंतर शेतकºयांसाठी काँग्रेस पक्ष काय करणार आहे, याबाबत अहवालात माहिती देण्यात येईल.