शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मोदी राजवटीत रोज ४७ शेतक-यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 05:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे शेतक-यांना उद््ध्वस्त करणारी असून, मोदी सत्तेवर आल्यापासून देशभरात दररोज ४७ शेतकरी आत्महत्या करत असल्याचे आकडेवारीवरुन दिसते असा आरोप काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे शेतक-यांना उद््ध्वस्त करणारी असून, मोदी सत्तेवर आल्यापासून देशभरात दररोज ४७ शेतकरी आत्महत्या करत असल्याचे आकडेवारीवरुन दिसते असा आरोप काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकºयांचा नशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर बोलताना सुरजेवाला म्हणाले की, शेतकºयांना दिलेली आश्वासने सरकार पूर्ण करू शकलेले नाही. शेतकºयांच्या प्रश्नांसंदर्भात मोदी सरकार असंवेदनशील बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या अध्यक्षांबरोबर नौकाविहार करण्यात मग्न आहेत तर दुसºया बाजूला शेतकरी आपली दुस्थिती सरकारसमोर मांडण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरला आहे. महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेला सोमवारी ८८ वर्षे पूर्ण होत असतानाच शेतकºयाला आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी १८० किलोमीटर चालत सरकारच्या दारी जावे लागते, हे दुर्दैवी आहे.काँग्रेसने म्हटले आहे की, एक जानेवारी २०१७पर्यंत महाराष्ट्रामध्ये २,४१४ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. इतकी भीषण स्थिती असूनही मोदी व अरुण जेटली यांनी शेतकºयांना कर्जमाफी देण्यास नकार दिला. शेतमालाची निर्यात घटली व आयात वाढली आहे. मोदी सरकार शेतकºयांऐवजी दलालांची मदत करीत आहे. २०१३-१४या वर्षात काँग्रेस सरकारच्या काळात तेव्हा निर्यातीतून ४२.२३ अब्ज डॉलर व आयातीतून १५.०३ अब्ज डॉलरची उलाढाल होत होती. २०१६-१७या कालावधीत निर्यातीतून ३३.८२ अब्ज डॉलर व आयातीतून २५.०९ अब्ज डॉलर इतकी उलाढाल झाली. डाळ व गव्हाच्या व्यापाºयांना फायदा व्हावा यासाठी मोदी सरकारने इम्पोर्ट ड्युटी शून्यावर आणली. या कृतीतून मोदी सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवत असल्याचे स्पष्ट होते.>शेतकºयांच्या स्थितीवर अहवालशेतकºयांचे न सुटलेले प्रश्न व त्याबाबत मोदी सरकारने दाखविलेली निष्क्रिय्रता हे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे मुख्य मुद्दे बनविण्याचा विचार काँग्रेस पक्ष करत आहे. शेतकºयांच्या स्थितीबद्दल येत्या १६ मार्चपासून सुरू होणाºया काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात अधिवेशनात खास चर्चा करण्यात येईल व त्याचा एक अहवाल तयार करण्यात येणार आहे. शेतकºयांची स्थिती सुधारण्यासाठी नेमके काय करायला हवे, सत्तेत आल्यानंतर शेतकºयांसाठी काँग्रेस पक्ष काय करणार आहे, याबाबत अहवालात माहिती देण्यात येईल.