शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

४२ हजार शेतकरी कर्जासाठी बँका, सावकाराच्या दारी

By admin | Updated: July 2, 2015 23:47 IST

बळीराजा अडचणीत : सिल्लोड तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

बळीराजा अडचणीत : सिल्लोड तालुक्यात दुबार पेरणीचे संकट
श्यामकुमार पुरे/ सिल्लोड
मृग नक्षत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकर्‍यांनी पेरणी केली. गत १५ दिवसांपासून पावसाने तडी दिल्यामुळे आता उन्हामुळे पिके कोमेजू लागली आहेत.यामुळे दुबार पेरणी करावी लागते की काय, अशी चिंता बळीराजाला लागली आहे़ त्यात कर्ज देणार्‍या बँका शेतकर्‍यांची चेष्टा करीत आहेत. कशी तरी उसनवारी करून बी-बियाणे खरेदी करणारे शेतकरी कर्जासाठी बँक तसेच सावकाराचे उंबरठे झिजवीत आहेत़ शेतकर्‍याची अडवणूक करणार्‍या अधिकार्‍यांना वरिष्ठ पातळीवरून शेतकर्‍यांना बँका कर्ज देतेय, मोफत नाही याची जाणीव करून देणे गरजेचे आहे़
सिल्लोड तालुक्यात ७४ हजार शेतकरी आहेत. यापैकी ३२ हजार शेतकर्‍यांना १०० कोटी रुपये पीककर्ज वाटप केले आहे़ सिल्लोड तालुक्यातील काही निवडक बँकांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात वाटप केले आहे़ अजूनही जवळपास ४२ हजार शेतकरी कर्जासाठी बँकांत तसेच सावकारांकडे खेट्या मारत असल्याचे तालुक्यात चित्र आहे़
गेल्या १५ दिवसांपासून पाऊस उघडल्याने जमिनीतून वर उगवून आलेल्या कोवळ्या पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. लवकरच पावसाचे आगमन झाले नाही तर तालुक्यातील जवळपास ९९ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बँकांना शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, यापैकी काही बँकांनी कर्जपुरवठा केला तर काही बँका कासवगतीने काम करून शेतकर्‍यांना आज, उद्या करून वेळ मारून नेताना दिसत आहेत. तसेच काही बँका कर्मचारी संख्या अपुरी असल्याचे कारण पुढे करीत आहेत़ विशेष म्हणजे काही बँकांनी तर गावांचा वार ठरवून दिला आहे़ ठरवून दिलेल्या दिवशीच शेतकर्‍यांनी बँकेत येणे गरजेचे आहे़ नसता बळीराजाला या बँकेत सापत्न वागणूक मिळते़
गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळी स्थितीचा सामना करणारा शेतकरी पार थकला आहे. या शेतकर्‍याच्या निसर्गाकडून अपेक्षा वाढल्या असताना निसर्ग सतत शेतकर्‍याचे कंबरडे मोडत आहे. शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती कमालीची बिघडली आहे. दागदागिने विकून, तर काहींनी जमिनी गहाण ठेवून सावकारांकडून कर्ज घेतले, तर काहींनी उसनवारी करून बी-बियाणे खरेदी करीत पेरणी केली.