शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

४२ हजार शेतकरी कर्जासाठी बँका, सावकाराच्या दारी

By admin | Updated: July 2, 2015 23:47 IST

बळीराजा अडचणीत : सिल्लोड तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

बळीराजा अडचणीत : सिल्लोड तालुक्यात दुबार पेरणीचे संकट
श्यामकुमार पुरे/ सिल्लोड
मृग नक्षत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकर्‍यांनी पेरणी केली. गत १५ दिवसांपासून पावसाने तडी दिल्यामुळे आता उन्हामुळे पिके कोमेजू लागली आहेत.यामुळे दुबार पेरणी करावी लागते की काय, अशी चिंता बळीराजाला लागली आहे़ त्यात कर्ज देणार्‍या बँका शेतकर्‍यांची चेष्टा करीत आहेत. कशी तरी उसनवारी करून बी-बियाणे खरेदी करणारे शेतकरी कर्जासाठी बँक तसेच सावकाराचे उंबरठे झिजवीत आहेत़ शेतकर्‍याची अडवणूक करणार्‍या अधिकार्‍यांना वरिष्ठ पातळीवरून शेतकर्‍यांना बँका कर्ज देतेय, मोफत नाही याची जाणीव करून देणे गरजेचे आहे़
सिल्लोड तालुक्यात ७४ हजार शेतकरी आहेत. यापैकी ३२ हजार शेतकर्‍यांना १०० कोटी रुपये पीककर्ज वाटप केले आहे़ सिल्लोड तालुक्यातील काही निवडक बँकांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात वाटप केले आहे़ अजूनही जवळपास ४२ हजार शेतकरी कर्जासाठी बँकांत तसेच सावकारांकडे खेट्या मारत असल्याचे तालुक्यात चित्र आहे़
गेल्या १५ दिवसांपासून पाऊस उघडल्याने जमिनीतून वर उगवून आलेल्या कोवळ्या पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. लवकरच पावसाचे आगमन झाले नाही तर तालुक्यातील जवळपास ९९ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बँकांना शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, यापैकी काही बँकांनी कर्जपुरवठा केला तर काही बँका कासवगतीने काम करून शेतकर्‍यांना आज, उद्या करून वेळ मारून नेताना दिसत आहेत. तसेच काही बँका कर्मचारी संख्या अपुरी असल्याचे कारण पुढे करीत आहेत़ विशेष म्हणजे काही बँकांनी तर गावांचा वार ठरवून दिला आहे़ ठरवून दिलेल्या दिवशीच शेतकर्‍यांनी बँकेत येणे गरजेचे आहे़ नसता बळीराजाला या बँकेत सापत्न वागणूक मिळते़
गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळी स्थितीचा सामना करणारा शेतकरी पार थकला आहे. या शेतकर्‍याच्या निसर्गाकडून अपेक्षा वाढल्या असताना निसर्ग सतत शेतकर्‍याचे कंबरडे मोडत आहे. शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती कमालीची बिघडली आहे. दागदागिने विकून, तर काहींनी जमिनी गहाण ठेवून सावकारांकडून कर्ज घेतले, तर काहींनी उसनवारी करून बी-बियाणे खरेदी करीत पेरणी केली.