शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये महिनाभरात ४२ जण मारले गेले

By admin | Updated: June 25, 2017 00:56 IST

रमझानचा महिना हा मुस्लिमांमध्ये अतिशय पवित्र मानला जातो. मात्र याच महिन्यात काश्मीर खोऱ्यात ९ पोलिसांसह ४२ जण मारले गेले.

श्रीनगर : रमझानचा महिना हा मुस्लिमांमध्ये अतिशय पवित्र मानला जातो. मात्र याच महिन्यात काश्मीर खोऱ्यात ९ पोलिसांसह ४२ जण मारले गेले. गोळीबार व हिंसाचारात मरण पावलेल्या ४२ जणांत २७ दहशतवादी आणि ६ नागरिक आहेत. श्रीनगरचे पोलीस उपअधीक्षक मोहम्मद आयुब पंडित यांनाही जमावाने ठेचून मारले.पंडित यांना ज्या प्रकारे मारण्यात आले, त्यामुळे पोलीस संतापले आहेत. सरकार नीट स्थिती हाताळत नाही आणि बळी आम्हाला पडावे लागते, अशी तक्रार पोलीस करीत आहेत. पंडित यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आज तीन जणांना अटक केल्याने एकूण पाच जण पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. पोलीस आणखी आठ जणांचा शोध घेत आहेत. हा प्रकार घडला, तेव्हा हुरियत कॉन्फरन्सचा नेता मीरवाइज फारूख मशिदीत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. जेकेएलएफचा नेता यासिन मलिक याला पोलिसांनी जम्मूतून अटक करून श्रीनगरला नेले.फुटीरवादी नेते चिथावणीखोर भाषा करून तणाव वाढवत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाईच्या सूचना मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी द्यायला हव्यात. कारवाईसाठी त्या पुढाकार घेत नाहीत, असे पोलिसांना वाटते. पंडित यांच्या हत्येनंतर श्रीनगरचे पोलीस अधीक्षक सज्जाद खालिक भट्ट यांची बदली झाली. त्यांच्यावर कारवाई होते, पण चिथावणीखोर नेत्यांवर कारवाई होत नाही, अशी तक्रार आहे.फुटीरवादी नेत्यांची सुरक्षा व्यवस्था बंद करावी, अशी मागणी होत आहे. राज्याचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी तसे सूचितच केले आहे. हुरियत कॉन्फरन्सचा नेता मीरवाइज उमर फारुख याची सुरक्षा काढून घ्यायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. तसे प्रत्यक्षात होणार का, राज्य सरकार तो निर्णय घेणार का, हा प्रश्न आहे. सततच्या हिंसाचार व तणावामुळे काश्मीरमधील पर्यटन व्यवसायही डबघाईला आला आहे. पर्यटनावर अवलंबून असलेले व्यापारी व उद्योजक तसेच हॉटेलमालक, गाइड, छोटे दुकानदार आणि टूर्स व ट्रॅव्हल्सवाले या प्रकारामुळे अडचणीत आले आहेत. आमच्या रोजगारावरच आता गदा आली आहे. ही परिस्थिती अशीच सुरू राहिली, तर आम्हाला अन्यत्र जावे लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे. एरवीही पर्यटनावर अवलंबून असलेले अनेक दुकानदार आता अन्य राज्यांमध्ये व्यवसायासाठी निघून गेले आहेत.