शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

काश्मीरमध्ये महिनाभरात ४२ जण मारले गेले

By admin | Updated: June 25, 2017 00:56 IST

रमझानचा महिना हा मुस्लिमांमध्ये अतिशय पवित्र मानला जातो. मात्र याच महिन्यात काश्मीर खोऱ्यात ९ पोलिसांसह ४२ जण मारले गेले.

श्रीनगर : रमझानचा महिना हा मुस्लिमांमध्ये अतिशय पवित्र मानला जातो. मात्र याच महिन्यात काश्मीर खोऱ्यात ९ पोलिसांसह ४२ जण मारले गेले. गोळीबार व हिंसाचारात मरण पावलेल्या ४२ जणांत २७ दहशतवादी आणि ६ नागरिक आहेत. श्रीनगरचे पोलीस उपअधीक्षक मोहम्मद आयुब पंडित यांनाही जमावाने ठेचून मारले.पंडित यांना ज्या प्रकारे मारण्यात आले, त्यामुळे पोलीस संतापले आहेत. सरकार नीट स्थिती हाताळत नाही आणि बळी आम्हाला पडावे लागते, अशी तक्रार पोलीस करीत आहेत. पंडित यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आज तीन जणांना अटक केल्याने एकूण पाच जण पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. पोलीस आणखी आठ जणांचा शोध घेत आहेत. हा प्रकार घडला, तेव्हा हुरियत कॉन्फरन्सचा नेता मीरवाइज फारूख मशिदीत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. जेकेएलएफचा नेता यासिन मलिक याला पोलिसांनी जम्मूतून अटक करून श्रीनगरला नेले.फुटीरवादी नेते चिथावणीखोर भाषा करून तणाव वाढवत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाईच्या सूचना मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी द्यायला हव्यात. कारवाईसाठी त्या पुढाकार घेत नाहीत, असे पोलिसांना वाटते. पंडित यांच्या हत्येनंतर श्रीनगरचे पोलीस अधीक्षक सज्जाद खालिक भट्ट यांची बदली झाली. त्यांच्यावर कारवाई होते, पण चिथावणीखोर नेत्यांवर कारवाई होत नाही, अशी तक्रार आहे.फुटीरवादी नेत्यांची सुरक्षा व्यवस्था बंद करावी, अशी मागणी होत आहे. राज्याचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी तसे सूचितच केले आहे. हुरियत कॉन्फरन्सचा नेता मीरवाइज उमर फारुख याची सुरक्षा काढून घ्यायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. तसे प्रत्यक्षात होणार का, राज्य सरकार तो निर्णय घेणार का, हा प्रश्न आहे. सततच्या हिंसाचार व तणावामुळे काश्मीरमधील पर्यटन व्यवसायही डबघाईला आला आहे. पर्यटनावर अवलंबून असलेले व्यापारी व उद्योजक तसेच हॉटेलमालक, गाइड, छोटे दुकानदार आणि टूर्स व ट्रॅव्हल्सवाले या प्रकारामुळे अडचणीत आले आहेत. आमच्या रोजगारावरच आता गदा आली आहे. ही परिस्थिती अशीच सुरू राहिली, तर आम्हाला अन्यत्र जावे लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे. एरवीही पर्यटनावर अवलंबून असलेले अनेक दुकानदार आता अन्य राज्यांमध्ये व्यवसायासाठी निघून गेले आहेत.