शहरं
Join us  
Trending Stories
1
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
2
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
4
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
5
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
6
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
7
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
8
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
9
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
10
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
11
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
12
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
13
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
14
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
15
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
16
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
17
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
18
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
19
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
20
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांवर डोक्यावर ४ हजार कोटींचे कर्ज पतपुरवठा: राष्ट्रीयकृत,सहकारी आणि खासगी बँकांचा समावेश

By admin | Updated: March 25, 2015 21:09 IST

अहमदनगर: सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्‘ातील शेतीला गेले वर्षभर सावरता आलेले नाही़ या आपत्तीत सरकारी घोषणांच्या पलीकडे पदरात काहीच पडत नाही़ शेतीही सोडता येत नाही़ अशा कात्रीत सापडलेल्या असंख्य शेतकर्‍यांनी स्वत: खंबीर होत, त्यातून मार्ग काढण्यास सुरुवात केली़ गेल्या वर्षभरात शेती सावरण्यासाठी जिल्‘ातील शेतकर्‍यांनी विविध बँकांकडून ४ हजार कोटींचे कर्ज घेतल्याचे वास्तव एका अहवालावरून समोर आले आहे़ ही फक्त राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बँकांची स्थिती असून, अन्य सावकार व पतसंस्थांचा विचार केल्यास कर्जाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे़

अहमदनगर: सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतीला गेले वर्षभर सावरता आलेले नाही़ या आपत्तीत सरकारी घोषणांच्या पलीकडे पदरात काहीच पडत नाही़ शेतीही सोडता येत नाही़ अशा कात्रीत सापडलेल्या असंख्य शेतकर्‍यांनी स्वत: खंबीर होत, त्यातून मार्ग काढण्यास सुरुवात केली़ गेल्या वर्षभरात शेती सावरण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी विविध बँकांकडून ४ हजार कोटींचे कर्ज घेतल्याचे वास्तव एका अहवालावरून समोर आले आहे़ ही फक्त राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बँकांची स्थिती असून, अन्य सावकार व पतसंस्थांचा विचार केल्यास कर्जाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे़
दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे शेती व्यवसायाला अवकळा आली़ पिकांचा वाढता खर्च आणि मिळणारे उत्पन्न, याचा ताळमेळ बसेनासा झाला आहे़ सततच्या नापिकीमुळे शेतकर्‍यांच्या पदरात वर्षभर काहीच पडले नाही़ त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली़ कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे़ पण शेती काही सोडता येत नाही़ एक पीक गेले म्हणून हातावर हात ठेवून न बसता पुढचे पीक पदरात पाडून घेण्यासाठी बळीराजाने बँकांचा रस्ता धरला़ पीक येईल आणि कर्जातून मुक्ती मिळेल, अशी आशा बाळगून असलेल्या शेतकर्‍यांनी चालू आर्थिक वर्षात तब्बल ४ हजार १९ कोटीचे कर्ज घेतले़ याशिवाय सावकारी व पतसंस्थांकडून घेतलेला कर्जाचा आकडाही काही कोटींच्या घरात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे़ एकूणच शेतकर्‍यांवरील कर्जाचा डोंगर वाढत असून, पिकातून मात्र काहीच साध्य होत नसल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे़
जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी गेल्या वर्षभरात राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बँकांकडून २ हजार ७१९ कोटींचे पीक कर्ज घेतले़ शेतीसाठीच पण मध्यम मुदतीचे २ हजार ३०९ कोटींचे कर्ज विविध बँकांकडून घेतले गेले आहे़ पण ज्या पिकांसाठी हे कर्ज घेतले, ती पिके शेतातच वाया गेली़ खरीप आणि त्यापाठोपाठ रब्बीची पिके हातची गेली़ निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकर्‍यांना बँकांचे घेतलेले कर्ज परत करणे कठीण झाले झाले आहे़ सततच्या नापिकीमुळे शेतकर्‍यांना बँकांची पायरी चढावी लागली़ कर्ज घेतले पण पीक आले नाही़ त्यामुळे बँकांच्या कर्ज फेर्‍यात जिल्ह्यातील बळीराजा अडकला असून, त्यातून बाहेर कसे पडायचे, असा पेच शेतकर्‍यांसमोर आहे़
़़़