शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
4
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
5
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
6
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
7
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
8
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
9
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
10
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
11
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
12
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
13
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
14
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
15
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
16
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
18
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
19
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
20
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

शेतकर्‍यांवर डोक्यावर ४ हजार कोटींचे कर्ज पतपुरवठा: राष्ट्रीयकृत,सहकारी आणि खासगी बँकांचा समावेश

By admin | Updated: March 25, 2015 21:09 IST

अहमदनगर: सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्‘ातील शेतीला गेले वर्षभर सावरता आलेले नाही़ या आपत्तीत सरकारी घोषणांच्या पलीकडे पदरात काहीच पडत नाही़ शेतीही सोडता येत नाही़ अशा कात्रीत सापडलेल्या असंख्य शेतकर्‍यांनी स्वत: खंबीर होत, त्यातून मार्ग काढण्यास सुरुवात केली़ गेल्या वर्षभरात शेती सावरण्यासाठी जिल्‘ातील शेतकर्‍यांनी विविध बँकांकडून ४ हजार कोटींचे कर्ज घेतल्याचे वास्तव एका अहवालावरून समोर आले आहे़ ही फक्त राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बँकांची स्थिती असून, अन्य सावकार व पतसंस्थांचा विचार केल्यास कर्जाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे़

अहमदनगर: सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतीला गेले वर्षभर सावरता आलेले नाही़ या आपत्तीत सरकारी घोषणांच्या पलीकडे पदरात काहीच पडत नाही़ शेतीही सोडता येत नाही़ अशा कात्रीत सापडलेल्या असंख्य शेतकर्‍यांनी स्वत: खंबीर होत, त्यातून मार्ग काढण्यास सुरुवात केली़ गेल्या वर्षभरात शेती सावरण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी विविध बँकांकडून ४ हजार कोटींचे कर्ज घेतल्याचे वास्तव एका अहवालावरून समोर आले आहे़ ही फक्त राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बँकांची स्थिती असून, अन्य सावकार व पतसंस्थांचा विचार केल्यास कर्जाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे़
दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे शेती व्यवसायाला अवकळा आली़ पिकांचा वाढता खर्च आणि मिळणारे उत्पन्न, याचा ताळमेळ बसेनासा झाला आहे़ सततच्या नापिकीमुळे शेतकर्‍यांच्या पदरात वर्षभर काहीच पडले नाही़ त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली़ कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे़ पण शेती काही सोडता येत नाही़ एक पीक गेले म्हणून हातावर हात ठेवून न बसता पुढचे पीक पदरात पाडून घेण्यासाठी बळीराजाने बँकांचा रस्ता धरला़ पीक येईल आणि कर्जातून मुक्ती मिळेल, अशी आशा बाळगून असलेल्या शेतकर्‍यांनी चालू आर्थिक वर्षात तब्बल ४ हजार १९ कोटीचे कर्ज घेतले़ याशिवाय सावकारी व पतसंस्थांकडून घेतलेला कर्जाचा आकडाही काही कोटींच्या घरात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे़ एकूणच शेतकर्‍यांवरील कर्जाचा डोंगर वाढत असून, पिकातून मात्र काहीच साध्य होत नसल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे़
जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी गेल्या वर्षभरात राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बँकांकडून २ हजार ७१९ कोटींचे पीक कर्ज घेतले़ शेतीसाठीच पण मध्यम मुदतीचे २ हजार ३०९ कोटींचे कर्ज विविध बँकांकडून घेतले गेले आहे़ पण ज्या पिकांसाठी हे कर्ज घेतले, ती पिके शेतातच वाया गेली़ खरीप आणि त्यापाठोपाठ रब्बीची पिके हातची गेली़ निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकर्‍यांना बँकांचे घेतलेले कर्ज परत करणे कठीण झाले झाले आहे़ सततच्या नापिकीमुळे शेतकर्‍यांना बँकांची पायरी चढावी लागली़ कर्ज घेतले पण पीक आले नाही़ त्यामुळे बँकांच्या कर्ज फेर्‍यात जिल्ह्यातील बळीराजा अडकला असून, त्यातून बाहेर कसे पडायचे, असा पेच शेतकर्‍यांसमोर आहे़
़़़