शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
2
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
3
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
4
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
5
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
6
वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
7
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार
8
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार?
9
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
10
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
11
भावा जिंकलस! 'बिग बॉस १९'च्या टॉप ५मध्ये पोहोचला प्रणित मोरे, 'या' दिवशी पार पडणार ग्रँड फिनाले
12
"भाऊ, मी तुलाही मानतो...", रितेश देशमुखच्या 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरेने दिलं उत्तर; पाहा Video
13
New Rules 1 December 2025: आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
14
Sunil Gavaskar: सचिन तेंडुलकर की कोहली? वनडेतील सर्वोत्तम फलंदाज कोण? गावस्कर म्हणाले...
15
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
16
'गुरुजन' इतके क्रूर होऊच कसे शकतात? आपण फार मोठी जोखीम स्वीकारतो आहोत
17
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
18
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
19
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
20
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांवर डोक्यावर ४ हजार कोटींचे कर्ज पतपुरवठा: राष्ट्रीयकृत,सहकारी आणि खासगी बँकांचा समावेश

By admin | Updated: March 25, 2015 21:09 IST

अहमदनगर: सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्‘ातील शेतीला गेले वर्षभर सावरता आलेले नाही़ या आपत्तीत सरकारी घोषणांच्या पलीकडे पदरात काहीच पडत नाही़ शेतीही सोडता येत नाही़ अशा कात्रीत सापडलेल्या असंख्य शेतकर्‍यांनी स्वत: खंबीर होत, त्यातून मार्ग काढण्यास सुरुवात केली़ गेल्या वर्षभरात शेती सावरण्यासाठी जिल्‘ातील शेतकर्‍यांनी विविध बँकांकडून ४ हजार कोटींचे कर्ज घेतल्याचे वास्तव एका अहवालावरून समोर आले आहे़ ही फक्त राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बँकांची स्थिती असून, अन्य सावकार व पतसंस्थांचा विचार केल्यास कर्जाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे़

अहमदनगर: सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतीला गेले वर्षभर सावरता आलेले नाही़ या आपत्तीत सरकारी घोषणांच्या पलीकडे पदरात काहीच पडत नाही़ शेतीही सोडता येत नाही़ अशा कात्रीत सापडलेल्या असंख्य शेतकर्‍यांनी स्वत: खंबीर होत, त्यातून मार्ग काढण्यास सुरुवात केली़ गेल्या वर्षभरात शेती सावरण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी विविध बँकांकडून ४ हजार कोटींचे कर्ज घेतल्याचे वास्तव एका अहवालावरून समोर आले आहे़ ही फक्त राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बँकांची स्थिती असून, अन्य सावकार व पतसंस्थांचा विचार केल्यास कर्जाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे़
दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे शेती व्यवसायाला अवकळा आली़ पिकांचा वाढता खर्च आणि मिळणारे उत्पन्न, याचा ताळमेळ बसेनासा झाला आहे़ सततच्या नापिकीमुळे शेतकर्‍यांच्या पदरात वर्षभर काहीच पडले नाही़ त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली़ कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे़ पण शेती काही सोडता येत नाही़ एक पीक गेले म्हणून हातावर हात ठेवून न बसता पुढचे पीक पदरात पाडून घेण्यासाठी बळीराजाने बँकांचा रस्ता धरला़ पीक येईल आणि कर्जातून मुक्ती मिळेल, अशी आशा बाळगून असलेल्या शेतकर्‍यांनी चालू आर्थिक वर्षात तब्बल ४ हजार १९ कोटीचे कर्ज घेतले़ याशिवाय सावकारी व पतसंस्थांकडून घेतलेला कर्जाचा आकडाही काही कोटींच्या घरात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे़ एकूणच शेतकर्‍यांवरील कर्जाचा डोंगर वाढत असून, पिकातून मात्र काहीच साध्य होत नसल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे़
जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी गेल्या वर्षभरात राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बँकांकडून २ हजार ७१९ कोटींचे पीक कर्ज घेतले़ शेतीसाठीच पण मध्यम मुदतीचे २ हजार ३०९ कोटींचे कर्ज विविध बँकांकडून घेतले गेले आहे़ पण ज्या पिकांसाठी हे कर्ज घेतले, ती पिके शेतातच वाया गेली़ खरीप आणि त्यापाठोपाठ रब्बीची पिके हातची गेली़ निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकर्‍यांना बँकांचे घेतलेले कर्ज परत करणे कठीण झाले झाले आहे़ सततच्या नापिकीमुळे शेतकर्‍यांना बँकांची पायरी चढावी लागली़ कर्ज घेतले पण पीक आले नाही़ त्यामुळे बँकांच्या कर्ज फेर्‍यात जिल्ह्यातील बळीराजा अडकला असून, त्यातून बाहेर कसे पडायचे, असा पेच शेतकर्‍यांसमोर आहे़
़़़