शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

भारतातील तब्बल ४०० भाषा नष्ट होण्याची भीती; इंग्रजीचा धोका मात्र नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 06:45 IST

इंग्रजी भाषेमुळे भारतातील हिंदी, मराठी, बांगला आणि तेलगू या मुख्य भाषांना धोका नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे आॅफ इंडियाच्या (पीएसएआय) ११ खंडांच्या गुरुवारी येथे झालेल्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

नवी दिल्ली : भारतातील ७८० भाषांपैकी ४०० येत्या ५० वर्षांत नामशेष होण्याची शक्यता आहे, असे ज्येष्ठ भाषाअभ्यासक गणेश एन. देवी यांनी म्हटले.इंग्रजी भाषेमुळे भारतातील हिंदी, मराठी, बांगला आणि तेलगू या मुख्य भाषांना धोका नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे आॅफ इंडियाच्या (पीएसएआय) ११ खंडांच्या गुरुवारी येथे झालेल्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. जगातील ही सर्वात मोठी भाषेची पाहणी असल्याचे सांगितले जाते. जगातील सहा हजार भाषांपैकी चार हजार भाषा येत्या ५० वर्षांत नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत. या चार हजार भाषांपैकी ४०० भारतातील आहेत. याचा अर्थ असा की, धोक्यात असलेल्या दहा टक्के भाषा या भारतात आहेत, असे गणेश देवी म्हणाले. इंग्रजीचे प्रभुत्व हिंदी, बांगला, मराठी, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती व पंजाबी या मोठ्या भाषांना नष्ट करून टाकेल, हा समज निराधार आहे, कारण जगातील पहिल्या तीस भाषांमध्ये त्या आहेत. त्या किमान एक हजार वर्षे जुन्या असून, त्या बोलणारे दोन कोटींपेक्षा अधिक आहेत. चित्रपटसृष्टी, उत्तम संगीत परंपरा, शिक्षणाची उपलब्धता व जोमाने वाढणाºया प्रसारमाध्यमांचा त्यांना आधार आहे, असे देवी म्हणाले.भाषा गमावणे म्हणजे मोठ्या संख्येतील मानवी भांडवल, सांस्कृतिक भांडवल आणि आर्थिक भांडवल गमावण्यासारखे आहे. कारण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भाषेचा कल्पकतेने उपयोग केला तर ती आर्थिकदृष्ट्या उत्पादक बनू शकते, असे देवी यांनी म्हटले. देवी म्हणाले की, देशातील किनारी भागातील भाषा या जास्त धोक्यात आहेत. त्याचे कारण म्हणजे त्या भागात उदरनिर्वाहाचे साधन सुरक्षित राहिलेले नाही. मात्र काही आदिवासी भाषांची चांगली वाढही झाली आहे. त्या भाषेतील सुशिक्षित आपल्या भाषेत लिहू लागल्याचा हा परिणाम आहे.