शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

रोज बांधणार ४0 किलोमीटरचे महामार्ग : नितीन गडकरी

By admin | Updated: January 6, 2017 02:35 IST

रोज २२ ऐवजी ४0 किलोमीटर अंतराचे महामार्ग बांधणीचे लक्ष्य भूपृष्ठ मंत्रालय गाठणार असून, दहा नव्या एक्स्प्रेसवेपैकी काहींचे काम प्रत्यक्ष सुरू आहे

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीरोज २२ ऐवजी ४0 किलोमीटर अंतराचे महामार्ग बांधणीचे लक्ष्य भूपृष्ठ मंत्रालय गाठणार असून, दहा नव्या एक्स्प्रेसवेपैकी काहींचे काम प्रत्यक्ष सुरू आहे. महाराष्ट्र व राजस्थानात रेल्वे व राज्यांच्या मदतीने २५00 रेल्वे ओव्हरब्रिज (ओआरबी) बांधण्यात येईल आणि नागपूर व वाराणसीमध्ये एकात्मिक वाहतूक केंद्रेही उभारण्यात येत आहेत, अशा घोषणा केंद्रीय भूतल परिवहन राष्ट्रीय मार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केल्या. आपल्या मंत्रालयांच्या अडीच वर्षांच्या कामगिरीची ते माहिती देत होते.

यूपीए काळात रोज ३ किलोमीटर्स महामार्ग बांधले जात होते. या थंडावलेल्या कामाला वेग देत, रोज २२ किलोमीटर्सची रस्ते बांधणी आम्ही सुरू केली. यापुढे रोज ४0 कि.मी. अंतराची महामार्ग उभारणी देशात सुरू झाल्याचे पाहायला मिळेल, असा दावा करून गडकरी म्हणाले, ‘१0 एक्स्प्रेसवेना सुरुवात होत असून, काही कामे सुरूही झाली आहेत, एक्स्प्रेसवेमध्ये मुख्यत्वे नागपूर हैद्राबाद बंगळुरू ११00 कि.मी. लांबीच्या, तर मुंबई-बडोदे ४00 कि.मी.इत्यादी १0 आंतरराज्य एक्सप्रेसवेचा समावेश आहे. आतापर्यंत ४ लाख ६0 हजार कोटींची कामे झाली असून, त्यातून १४ हजार ३९0 किलोमीटर्स लांबीचे रस्ते बांधण्यात आले आहेत.

जिल्हा मुख्यालयांना राष्ट्रीय महामार्गांशी जोडण्यासाठी ६0 हजार कोटी रुपये खर्च करून ९ हजार किलोमीटर्सचे रस्ते बांधत आहोत. दोन लाख किमीचे नवे राष्ट्रीय महामार्ग उभारण्याचे ठरवले आहे. महामार्ग बांधणी प्रकल्पातून २ कोटी लोकांना रोजगार मिळेल व जीडीपीतही २ टक्क्यांची भर पडेल, असा दावा गडकरींनी केला. यापुढे वाहनाला लावलेल्या टॅगमुळे टोल नाक्यावर थांबावे लागणार नाही. संबंधित टोल नाक्यांवर नोंदीनुसार वाहनमालकाच्या बँक खात्यातून रक्कम कापली जाईल. या तंत्रज्ञानामुळे वेळ व इंधनाची मोठी बचत होईल, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला राज्यमंत्री पी. राधाकृष्णन व परिवहन सचिव संजय मित्रा हजर होते.