शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

बिहार, झारखंड, यूपीमध्ये वादळाचा कहर, ४0 मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 05:12 IST

दक्षिणेकडील केरळमध्ये मान्सूनचे पदार्पण केले असतानाच, संपूर्ण उत्तर भारतात मात्र गरमीने अंगाची काहिली होत आहे

नवी दिल्ली : दक्षिणेकडील केरळमध्ये मान्सूनचे पदार्पण केले असतानाच, संपूर्ण उत्तर भारतात मात्र गरमीने अंगाची काहिली होतआहे. गेले काही दिवस सतत उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच, सोमवारी संध्याकाळी उत्तर प्रदेश, बिहार व झारखंड या तीन राज्यांना वादळाने जोरदार तडाखा दिला. या तीन राज्यांत मिळून किमान ४0 बळी गेले.जखमींची संख्याही मोठी आहे. सर्वाधिक म्हणजे १७ जणांचामृत्यू बिहारमध्ये झाला. झारखंडमध्ये १३ आणि उत्तर प्रदेशमध्ये १0जण मृत्युमुखी पडले आहेत. वादळामुळे विजेचे खांब व झाडे कोसळून काही जण मरण पावले,तर काही जणांचा मृत्यूविजा कोसळल्याने झाला, असे सांगण्यात आले.बिहारमध्ये जीवितहानीबरोबरच वित्तहानीही प्रचंड झाली आहे. याची पाहणी करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अन्य दोन्ही राज्यांमध्येही जिथे सर्वाधिक मनुष्यहानी व वित्तहानी झाली. या वादळानंतर आज दिवसा पुन्हा तिथे कडक ऊनच होते.या तिन्ही राज्यांत मिळून १00 हून अधिक लोक जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या वादळामुळे अनेक वृक्ष पार कोलमडून पडले व त्यामुळे वाहतूकही ठप्प झाली. या महिन्याच्या सुरुवातीला असेच वादळ होऊ न याच तीन राज्यांत १५० हून अधिक लोक मरण पावले होते.येथे सूर्याचा कोप कायमदिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांबरोबरच व जम्मूत उष्णतेची लाटच पसरली असून, या सर्व भागांत तापमान ४५ अंशांच्या वर आहे. सर्व राज्यांमध्ये सकाळी १0 ते दुपारी ४ या वेळेत अगदी महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडा, सोबत पाणी घ्या, छत्रीचा वापर करा अशा सूचना दिल्या आहेत.