शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बिहार, झारखंड, यूपीमध्ये वादळाचा कहर, ४0 मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 05:12 IST

दक्षिणेकडील केरळमध्ये मान्सूनचे पदार्पण केले असतानाच, संपूर्ण उत्तर भारतात मात्र गरमीने अंगाची काहिली होत आहे

नवी दिल्ली : दक्षिणेकडील केरळमध्ये मान्सूनचे पदार्पण केले असतानाच, संपूर्ण उत्तर भारतात मात्र गरमीने अंगाची काहिली होतआहे. गेले काही दिवस सतत उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच, सोमवारी संध्याकाळी उत्तर प्रदेश, बिहार व झारखंड या तीन राज्यांना वादळाने जोरदार तडाखा दिला. या तीन राज्यांत मिळून किमान ४0 बळी गेले.जखमींची संख्याही मोठी आहे. सर्वाधिक म्हणजे १७ जणांचामृत्यू बिहारमध्ये झाला. झारखंडमध्ये १३ आणि उत्तर प्रदेशमध्ये १0जण मृत्युमुखी पडले आहेत. वादळामुळे विजेचे खांब व झाडे कोसळून काही जण मरण पावले,तर काही जणांचा मृत्यूविजा कोसळल्याने झाला, असे सांगण्यात आले.बिहारमध्ये जीवितहानीबरोबरच वित्तहानीही प्रचंड झाली आहे. याची पाहणी करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अन्य दोन्ही राज्यांमध्येही जिथे सर्वाधिक मनुष्यहानी व वित्तहानी झाली. या वादळानंतर आज दिवसा पुन्हा तिथे कडक ऊनच होते.या तिन्ही राज्यांत मिळून १00 हून अधिक लोक जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या वादळामुळे अनेक वृक्ष पार कोलमडून पडले व त्यामुळे वाहतूकही ठप्प झाली. या महिन्याच्या सुरुवातीला असेच वादळ होऊ न याच तीन राज्यांत १५० हून अधिक लोक मरण पावले होते.येथे सूर्याचा कोप कायमदिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांबरोबरच व जम्मूत उष्णतेची लाटच पसरली असून, या सर्व भागांत तापमान ४५ अंशांच्या वर आहे. सर्व राज्यांमध्ये सकाळी १0 ते दुपारी ४ या वेळेत अगदी महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडा, सोबत पाणी घ्या, छत्रीचा वापर करा अशा सूचना दिल्या आहेत.