शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

बिहार, झारखंड, यूपीमध्ये वादळाचा कहर, ४0 मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 05:12 IST

दक्षिणेकडील केरळमध्ये मान्सूनचे पदार्पण केले असतानाच, संपूर्ण उत्तर भारतात मात्र गरमीने अंगाची काहिली होत आहे

नवी दिल्ली : दक्षिणेकडील केरळमध्ये मान्सूनचे पदार्पण केले असतानाच, संपूर्ण उत्तर भारतात मात्र गरमीने अंगाची काहिली होतआहे. गेले काही दिवस सतत उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच, सोमवारी संध्याकाळी उत्तर प्रदेश, बिहार व झारखंड या तीन राज्यांना वादळाने जोरदार तडाखा दिला. या तीन राज्यांत मिळून किमान ४0 बळी गेले.जखमींची संख्याही मोठी आहे. सर्वाधिक म्हणजे १७ जणांचामृत्यू बिहारमध्ये झाला. झारखंडमध्ये १३ आणि उत्तर प्रदेशमध्ये १0जण मृत्युमुखी पडले आहेत. वादळामुळे विजेचे खांब व झाडे कोसळून काही जण मरण पावले,तर काही जणांचा मृत्यूविजा कोसळल्याने झाला, असे सांगण्यात आले.बिहारमध्ये जीवितहानीबरोबरच वित्तहानीही प्रचंड झाली आहे. याची पाहणी करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अन्य दोन्ही राज्यांमध्येही जिथे सर्वाधिक मनुष्यहानी व वित्तहानी झाली. या वादळानंतर आज दिवसा पुन्हा तिथे कडक ऊनच होते.या तिन्ही राज्यांत मिळून १00 हून अधिक लोक जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या वादळामुळे अनेक वृक्ष पार कोलमडून पडले व त्यामुळे वाहतूकही ठप्प झाली. या महिन्याच्या सुरुवातीला असेच वादळ होऊ न याच तीन राज्यांत १५० हून अधिक लोक मरण पावले होते.येथे सूर्याचा कोप कायमदिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांबरोबरच व जम्मूत उष्णतेची लाटच पसरली असून, या सर्व भागांत तापमान ४५ अंशांच्या वर आहे. सर्व राज्यांमध्ये सकाळी १0 ते दुपारी ४ या वेळेत अगदी महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडा, सोबत पाणी घ्या, छत्रीचा वापर करा अशा सूचना दिल्या आहेत.