शहरं
Join us  
Trending Stories
1
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
2
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
3
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
4
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
5
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
6
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
7
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
8
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
9
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
10
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
11
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
12
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
13
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
14
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
15
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
16
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
17
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
18
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
19
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
20
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा

४ भारतीय शिक्षकांचे इसिसकडून अपहरण

By admin | Updated: August 1, 2015 02:21 IST

त्रिपोली व ट्युनिस येथून मायदेशी परतत असलेल्या ४ भारतीय शिक्षकांचे लिबियात कथितरीत्या इस्लामिक स्टेटने (इसिस) अपहरण केले होते. या चार नागरिकांपैकी दोघांची सुटका करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : त्रिपोली व ट्युनिस येथून मायदेशी परतत असलेल्या ४ भारतीय शिक्षकांचे लिबियात कथितरीत्या इस्लामिक स्टेटने (इसिस) अपहरण केले होते. या चार नागरिकांपैकी दोघांची सुटका करण्यात आली आहे. या चौघांपैकी दोघे हैदराबादचे, तर एक रायचूर आणि दुसरा बंगळुरूचा आहे. सुटका झालेल्या दोन भारतीयांची नावे लक्ष्मीकांत व विजयकुमार अशी आहेत. राहिलेल्या दोघांची सुटका करण्याचे प्रयत्न चालू आहेत असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी टिष्ट्वटरवर टाकलेल्या पोस्टनुसार अपहरण झालेल्या दोन भारतीयांची सुटका झाली आहे. सुटका झालेले भारतीय लिबियातील सिर्ते विद्यापीठात सुरक्षितपणे परत आले आहेत,असेही स्वरूप यांनी म्हटले आहे. पण ही सुटका कशी झाली हे लगेच कळले नव्हते. सकाळी सुषमा स्वराज यांनी या घटनेची माहिती तसेच योजले जाणारे उपाय याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले होते. सिर्ते येथून ५० कि.मी.वर असलेल्या तपासणी चौकीवर या चौघांना ताब्यात घेण्यात आले. हा परिसर इस्लामिक स्टेटच्या ताब्यात आहे. यातील तिघे हे सिर्ते विद्यापीठात प्राध्यापक असून चौथा याच विद्यापीठाच्या जुफ्रा येथील शाखेत कार्यरत आहे. आम्ही पीडित कुटुंबियांच्या नियमित संपर्कात असून अपहृतांच्या सुखरूप सुटकेकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत, असे स्वरूप यांनी सांगितले. या नागरिकांच्या सुटके करीता खंडणीची मागणी करण्यात आलेली नाही. दोन दिवसांपूर्वी २९ जुलै रोजी रात्री ११ वाजता त्रिपोली येथील आमच्या दूतावासाला मायदेशी परतत असलेल्या चार भारतीयांना तपासणी चौकीवर पकडण्यात आल्याची माहिती मिळाली. परराष्ट्र मंत्रालय त्रिपोलीतील आपल्या दूतावासाद्वारे या घटनेसंदर्भातील माहितीची खातरजमा करीत आहे. ज्या भागात या भारतीयांचे अपहरण झाले तो भाग इस्लामिक स्टेटच्या ताब्यात आहे. इस्लामिक स्टेटने इराक आणि सिरियातील मोठा भूभाग आपल्या कब्जात घेत स्वत:चे खलिफा साम्राज्य घोषित केले. याची गंभीर दखल घेत भारत सरकारने गेल्या वर्षी जुलै महिन्यात संघर्षग्रस्त लिबियातील भारतीयांना तात्काळ तेथून बाहेर पडण्यास सांगितले होते. इराकमध्ये बेपत्ता असलेल्या ३९ भारतीयांचा अद्याप ठावठिकाणा नाही.(वृत्तसंस्था)