शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

४ भारतीय शिक्षकांचे इसिसकडून अपहरण

By admin | Updated: August 1, 2015 02:21 IST

त्रिपोली व ट्युनिस येथून मायदेशी परतत असलेल्या ४ भारतीय शिक्षकांचे लिबियात कथितरीत्या इस्लामिक स्टेटने (इसिस) अपहरण केले होते. या चार नागरिकांपैकी दोघांची सुटका करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : त्रिपोली व ट्युनिस येथून मायदेशी परतत असलेल्या ४ भारतीय शिक्षकांचे लिबियात कथितरीत्या इस्लामिक स्टेटने (इसिस) अपहरण केले होते. या चार नागरिकांपैकी दोघांची सुटका करण्यात आली आहे. या चौघांपैकी दोघे हैदराबादचे, तर एक रायचूर आणि दुसरा बंगळुरूचा आहे. सुटका झालेल्या दोन भारतीयांची नावे लक्ष्मीकांत व विजयकुमार अशी आहेत. राहिलेल्या दोघांची सुटका करण्याचे प्रयत्न चालू आहेत असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी टिष्ट्वटरवर टाकलेल्या पोस्टनुसार अपहरण झालेल्या दोन भारतीयांची सुटका झाली आहे. सुटका झालेले भारतीय लिबियातील सिर्ते विद्यापीठात सुरक्षितपणे परत आले आहेत,असेही स्वरूप यांनी म्हटले आहे. पण ही सुटका कशी झाली हे लगेच कळले नव्हते. सकाळी सुषमा स्वराज यांनी या घटनेची माहिती तसेच योजले जाणारे उपाय याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले होते. सिर्ते येथून ५० कि.मी.वर असलेल्या तपासणी चौकीवर या चौघांना ताब्यात घेण्यात आले. हा परिसर इस्लामिक स्टेटच्या ताब्यात आहे. यातील तिघे हे सिर्ते विद्यापीठात प्राध्यापक असून चौथा याच विद्यापीठाच्या जुफ्रा येथील शाखेत कार्यरत आहे. आम्ही पीडित कुटुंबियांच्या नियमित संपर्कात असून अपहृतांच्या सुखरूप सुटकेकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत, असे स्वरूप यांनी सांगितले. या नागरिकांच्या सुटके करीता खंडणीची मागणी करण्यात आलेली नाही. दोन दिवसांपूर्वी २९ जुलै रोजी रात्री ११ वाजता त्रिपोली येथील आमच्या दूतावासाला मायदेशी परतत असलेल्या चार भारतीयांना तपासणी चौकीवर पकडण्यात आल्याची माहिती मिळाली. परराष्ट्र मंत्रालय त्रिपोलीतील आपल्या दूतावासाद्वारे या घटनेसंदर्भातील माहितीची खातरजमा करीत आहे. ज्या भागात या भारतीयांचे अपहरण झाले तो भाग इस्लामिक स्टेटच्या ताब्यात आहे. इस्लामिक स्टेटने इराक आणि सिरियातील मोठा भूभाग आपल्या कब्जात घेत स्वत:चे खलिफा साम्राज्य घोषित केले. याची गंभीर दखल घेत भारत सरकारने गेल्या वर्षी जुलै महिन्यात संघर्षग्रस्त लिबियातील भारतीयांना तात्काळ तेथून बाहेर पडण्यास सांगितले होते. इराकमध्ये बेपत्ता असलेल्या ३९ भारतीयांचा अद्याप ठावठिकाणा नाही.(वृत्तसंस्था)