शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

४ भारतीय शिक्षकांचे इसिसकडून अपहरण

By admin | Updated: August 1, 2015 02:21 IST

त्रिपोली व ट्युनिस येथून मायदेशी परतत असलेल्या ४ भारतीय शिक्षकांचे लिबियात कथितरीत्या इस्लामिक स्टेटने (इसिस) अपहरण केले होते. या चार नागरिकांपैकी दोघांची सुटका करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : त्रिपोली व ट्युनिस येथून मायदेशी परतत असलेल्या ४ भारतीय शिक्षकांचे लिबियात कथितरीत्या इस्लामिक स्टेटने (इसिस) अपहरण केले होते. या चार नागरिकांपैकी दोघांची सुटका करण्यात आली आहे. या चौघांपैकी दोघे हैदराबादचे, तर एक रायचूर आणि दुसरा बंगळुरूचा आहे. सुटका झालेल्या दोन भारतीयांची नावे लक्ष्मीकांत व विजयकुमार अशी आहेत. राहिलेल्या दोघांची सुटका करण्याचे प्रयत्न चालू आहेत असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी टिष्ट्वटरवर टाकलेल्या पोस्टनुसार अपहरण झालेल्या दोन भारतीयांची सुटका झाली आहे. सुटका झालेले भारतीय लिबियातील सिर्ते विद्यापीठात सुरक्षितपणे परत आले आहेत,असेही स्वरूप यांनी म्हटले आहे. पण ही सुटका कशी झाली हे लगेच कळले नव्हते. सकाळी सुषमा स्वराज यांनी या घटनेची माहिती तसेच योजले जाणारे उपाय याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले होते. सिर्ते येथून ५० कि.मी.वर असलेल्या तपासणी चौकीवर या चौघांना ताब्यात घेण्यात आले. हा परिसर इस्लामिक स्टेटच्या ताब्यात आहे. यातील तिघे हे सिर्ते विद्यापीठात प्राध्यापक असून चौथा याच विद्यापीठाच्या जुफ्रा येथील शाखेत कार्यरत आहे. आम्ही पीडित कुटुंबियांच्या नियमित संपर्कात असून अपहृतांच्या सुखरूप सुटकेकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत, असे स्वरूप यांनी सांगितले. या नागरिकांच्या सुटके करीता खंडणीची मागणी करण्यात आलेली नाही. दोन दिवसांपूर्वी २९ जुलै रोजी रात्री ११ वाजता त्रिपोली येथील आमच्या दूतावासाला मायदेशी परतत असलेल्या चार भारतीयांना तपासणी चौकीवर पकडण्यात आल्याची माहिती मिळाली. परराष्ट्र मंत्रालय त्रिपोलीतील आपल्या दूतावासाद्वारे या घटनेसंदर्भातील माहितीची खातरजमा करीत आहे. ज्या भागात या भारतीयांचे अपहरण झाले तो भाग इस्लामिक स्टेटच्या ताब्यात आहे. इस्लामिक स्टेटने इराक आणि सिरियातील मोठा भूभाग आपल्या कब्जात घेत स्वत:चे खलिफा साम्राज्य घोषित केले. याची गंभीर दखल घेत भारत सरकारने गेल्या वर्षी जुलै महिन्यात संघर्षग्रस्त लिबियातील भारतीयांना तात्काळ तेथून बाहेर पडण्यास सांगितले होते. इराकमध्ये बेपत्ता असलेल्या ३९ भारतीयांचा अद्याप ठावठिकाणा नाही.(वृत्तसंस्था)