शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

अपहृत ३९ भारतीय बहुधा बदुश तुरुंगात

By admin | Updated: July 16, 2017 23:38 IST

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाने (इसिस) तीन वर्षांपूर्वी अपहरण केलेले ३९ भारतीय वायव्य मोसुलमधील बदुश तुरुंगात असावेत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाने (इसिस) तीन वर्षांपूर्वी अपहरण केलेले ३९ भारतीय वायव्य मोसुलमधील बदुश तुरुंगात असावेत, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी म्हटले. २४ जुलै रोजी इराकचे परराष्ट्रमंत्री इब्राहीम अल जाफरी भारत दौऱ्यावर येत असून त्यावेळी ते या अपहृतांबद्दल ताजी माहिती कदाचित आणतील, असेही त्या म्हणाल्या. या अपहृत भारतीय पुरुषांच्या कुटुंबियांनी रविवारी स्वराज यांची येथे भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. अपहृतांत बहुसंख्य पंजाबमधील आहेत. परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. के. सिंह यांनी अपहृतांबद्दल माहिती गोळा केली आहे. इसिसच्या ताब्यातून मोसूल सोडवून घेण्यात आले आहे अशी घोषणा इराकच्या पंतप्रधानांनी केल्यानंतर सिंह यांना त्या देशात पाठवण्यात आले होते. त्या भारतीयांना रुग्णालयाच्या कामांवर ठेवण्यात आले होते व नंतर त्यांना शेतात हलवण्यात आले. नंतर त्यांना पश्चिम मोसुलमधील बदुश तुरुंगात ठेवण्यात आले, असे गुप्तचर सूत्रांचा हवाला देऊन विश्वसनीय अधिकाऱ्याने सांगितल्याचे स्वराज म्हणाल्या. बदुश येथे इराकची सशस्त्र दले आणि इसिसमध्ये संघर्ष सध्या सुरू आहे. पूर्व मोसुल पूर्णपणे इसिसच्या ताब्यातून सोडवून घेण्यात आलेला आहे. इमारती सध्या स्वच्छ करून घेतल्या जात आहेत व नागरिकांना त्यात बाँब किंवा इतर स्फोटके असतील म्हणून जाऊ दिले जात नाही, असे त्या म्हणाल्या. भारतीयांना तुरुंगात ठेवले गेल्यापासून त्यांच्याबद्दल काही माहिती नाही, असे व्ही. के. सिंह म्हणाले. बदुशमधील लढाई संपली की नव्याने माहिती उपलब्ध होईल. या भारतीयांचा ठावठिकाणा शोधण्यास मदत करू शकतील अशा देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी मी बोलले असल्याचेही स्वराज म्हणाल्या.