शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

अपहृत ३९ भारतीय बहुधा बदुश तुरुंगात

By admin | Updated: July 16, 2017 23:38 IST

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाने (इसिस) तीन वर्षांपूर्वी अपहरण केलेले ३९ भारतीय वायव्य मोसुलमधील बदुश तुरुंगात असावेत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाने (इसिस) तीन वर्षांपूर्वी अपहरण केलेले ३९ भारतीय वायव्य मोसुलमधील बदुश तुरुंगात असावेत, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी म्हटले. २४ जुलै रोजी इराकचे परराष्ट्रमंत्री इब्राहीम अल जाफरी भारत दौऱ्यावर येत असून त्यावेळी ते या अपहृतांबद्दल ताजी माहिती कदाचित आणतील, असेही त्या म्हणाल्या. या अपहृत भारतीय पुरुषांच्या कुटुंबियांनी रविवारी स्वराज यांची येथे भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. अपहृतांत बहुसंख्य पंजाबमधील आहेत. परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. के. सिंह यांनी अपहृतांबद्दल माहिती गोळा केली आहे. इसिसच्या ताब्यातून मोसूल सोडवून घेण्यात आले आहे अशी घोषणा इराकच्या पंतप्रधानांनी केल्यानंतर सिंह यांना त्या देशात पाठवण्यात आले होते. त्या भारतीयांना रुग्णालयाच्या कामांवर ठेवण्यात आले होते व नंतर त्यांना शेतात हलवण्यात आले. नंतर त्यांना पश्चिम मोसुलमधील बदुश तुरुंगात ठेवण्यात आले, असे गुप्तचर सूत्रांचा हवाला देऊन विश्वसनीय अधिकाऱ्याने सांगितल्याचे स्वराज म्हणाल्या. बदुश येथे इराकची सशस्त्र दले आणि इसिसमध्ये संघर्ष सध्या सुरू आहे. पूर्व मोसुल पूर्णपणे इसिसच्या ताब्यातून सोडवून घेण्यात आलेला आहे. इमारती सध्या स्वच्छ करून घेतल्या जात आहेत व नागरिकांना त्यात बाँब किंवा इतर स्फोटके असतील म्हणून जाऊ दिले जात नाही, असे त्या म्हणाल्या. भारतीयांना तुरुंगात ठेवले गेल्यापासून त्यांच्याबद्दल काही माहिती नाही, असे व्ही. के. सिंह म्हणाले. बदुशमधील लढाई संपली की नव्याने माहिती उपलब्ध होईल. या भारतीयांचा ठावठिकाणा शोधण्यास मदत करू शकतील अशा देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी मी बोलले असल्याचेही स्वराज म्हणाल्या.