शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

पंजाबमध्ये विषारी दारूचे ३८ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 06:45 IST

आंध्रात सॅनिटायझर प्यायल्याने ९ जणांचा मृत्यू

अमृतसर /अमरावती (आंध्र प्रदेश ) : पंजाबच्या अमृतसर, बटाला आणि तरुणतारण या जिल्ह्यांमध्ये विषारी दारू प्यायल्याने ३८ जण, तर आंध्र प्रदेशच्या प्रकाशाम जिल्ह्यात सॅनिटायझर प्यायल्याने ९ जण मरण पावले असून, त्यामुळे दोन्ही राज्यांत खळबळ उडाली आहे. दोन्ही राज्यांत पोलिसांनी छापेमारी सुरू केली असून, काही जणांना अटकही केली आहे.

पंजाबमध्ये विषारी दारू बनवून, ती विकल्याबद्दल एका महिलेला अटक केली आहे. या धंद्याच्या सूत्रधारांचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पोलिसांचे विशेष तपास पथक स्थापन केले आहे. ही विषारी दारू आणखी काही जिल्ह्यांत विकली गेली आहे का, याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

लॉकडाउनच्या काळात पंजाबमध्ये दारूची दुकाने अनेक ठिकाणी बंद आहेत, तर काही ठिकाणी त्यावर निर्बंध आहेत. तसेच दारूचा काळाबाजारही सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी बेकायदेशीर हातभट्ट्या सुरू झाल्या आहेत. तेथूनच ही दारू विकली गेली असावी, असा अंदाज आहे. मात्र त्यात मुद्दाम विषारी द्रव्य मिसळण्यात आले की मिश्रणात चूक झाल्याने विषारी दारू तयार झाली, याचाही शोध पोलीस घेत आहेत. ही दारू स्वस्तात मिळाल्यामुळे लोकांनी ती प्राशन केली असावी, असे पोलिसांना वाटते आहे.

दारू न मिळाल्याने प्यायले सॅनिटायझरलॉकडाउनमुळे आंध्र प्रदेशातही दारूच्या विक्रीवर खूप निर्बंध आहेत. गावांमध्ये दारू मिळेनाशी झाल्याने अनेक ठिकाणी लोक सॅनिटायझर पिऊ लागले आहेत. प्रकाशम जिल्ह्यातील चेरीकुडी गावातील काही जणही सॅनिटायझर प्यायले आणि त्यातील ९ जण गुरुवार व शुक्रवारी या दोन दिवसांत मरण पावले. गेल्या काही दिवसांत दुकानांतून सॅनिटायझरची प्रचंड प्रमाणात विक्री वाढल्याचे आढळले आहे. मरण पावलेले सारे गरीब पुरुष असून, त्यात तिघे भिकारी आहेत.

टॅग्स :Punjabपंजाब