शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

4 तासांत 38 दहशतवादी, 9 पाकी सैनिकांचा खात्मा

By admin | Updated: September 29, 2016 22:14 IST

भारतीय लष्कराने गुरुवारी रात्री नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात मोठया प्रमाणावर दहशतवादी गटांचे नुकसान झाले.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २९ -  भारतीय लष्कराने बुधवारी रात्री नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केले. सुमारे ४ तास चाललेल्या या कारवाईत पाकिस्तान लष्कराच्या नऊ सैनिकांसह किमान ३८ दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारपरिषद घेऊन ही माहिती दिली. 
गुप्तचरांकडून मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तानी लष्करालाही या कारवाईची माहिती दिल्याचे भारतीय लष्कराच्या डीजीएमओंनी सांगितले. हे दहशतवादी भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याच्या तयारीत होते. 
दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणा-यांच्या विरोधात हे हल्ले होते अशी माहिती लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी दिली. आता ही कारवाई संपली असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
आणखी वाचा 
लष्कराच्या कारवाईचा शेअर बाजाराला फटका, सेन्सेक्स 450 अंकांनी कोसळला
 
आपल्या भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर करु  देऊ नका असे वारंवार पाकिस्तानला सांगितल्यानंतरही त्याचा काहीही उपयोग झाला नाही. काहीही परिस्थितीत फरक पडला नाही असे डीजीएमओनी सांगितले. 
या कारवाई दरम्यान भारताच्या बाजूला कोणतीही जिवीतहानी झाली नाही. नियंत्रण रेषा ओलांडून हे दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत होते. गुप्तचरांकडून मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली असे डीजीएमओनी सांगितले. २००३ च्या शस्त्रसंधी करारानुसार पाकिस्तानला या कारवाईची माहिती देण्यात आली. 
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना भारतीय लष्कराने या सर्जिकल स्ट्राईक्सची माहिती दिली.