शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
5
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
6
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
7
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
8
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
9
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
11
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
12
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
13
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
14
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
15
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
16
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
17
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
18
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
19
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

पदवीधरसाठी ३७ हजार मतदारांची नोंदणी नाव नोंदणीसाठी शेवटचे पाच दिवस: इच्छुकांची डोकेदुखी वाढली

By admin | Updated: October 30, 2016 22:47 IST

अहमदनगर: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या पुढीलवर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्‘ातील ३७ हजार मतदारांची नोंदणी झाली आहे़ मतदार नोंदणीसाठी अंतिम मुदत ५ नोंव्हेबर आहे़ पुढील पाच दिवसांत २० हजार मतदार नोंदणी होईल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे़

अहमदनगर: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या पुढीलवर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३७ हजार मतदारांची नोंदणी झाली आहे़ मतदार नोंदणीसाठी अंतिम मुदत ५ नोंव्हेबर आहे़ पुढील पाच दिवसांत २० हजार मतदार नोंदणी होईल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे़
नाशिक पदवीधर मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक पुढील वर्षाच्या प्रारंभी होणार आहे़ निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने जुनी मतदारयादी रद्द केली़ गत सार्वत्रिक निवडणुकीसाठी ८९ हजार मतदार होते़ जुनी मतदारयादी रद्द होऊन नव्याने मतदार नोंदणी अभियान युध्दपातळीवर सुरू आहे़ गेल्या महिनाभरात ३७ हजार ९६२ मतदारांनी नोंदणी केली़ यापूर्वी नोंदणी करणार्‍यांनादेखील नव्याने २० मुद्यांच्या माहितीसह नोंदणी करणे बंधनकारक आहे़ प्रशासनाने तलाठी, मंडलाधिकारी आणि तहसील कार्यालयांमार्फत मतदार नोंदणी अभियान सुरू केले़ पूर्वी केलेली नोंदणी रद्द झाल्याने नवीन नोंदणी करण्यास मतदार पुढे येत नाहीत़राजकीय पक्षांनी अर्ज भरून घेण्याची मोहीम सुरू केली, परंतु नोंदणीची आकडेवारी वाढली नाही़ पुढील पाच दिवसांत किती नोंदणी होते,यावरच निवडणुकीच्या मतदारांची संख्या ठरणार आहे़
पदवीधरची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदारांकडून २० मुद्यांची माहिती मागविली होती़ जुन्या मतदारांकडून ही माहिती मागविली गेली़ मात्र ८९ हजार मतदारांपैकी ३० हजार मतदारांनीच फक्त माहिती दिली़ उर्वरित ६० हजार मतदारांची माहिती आली नाही़ माहिती न देणार्‍या मतदारांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते़ पण, जुनी यादी रद्द झाल्याने राजकीय पक्षांना मोठा फटका बसला़ त्यात काही इच्छुकांनी मतदारांच्या गाठी भेटी घेऊन निवडणुकीची तयारी सुरू केली होती़ पण, यादी रद्द झाल्याने मतदारांची नव्याने नोंदणी करून घेण्यातच इच्छुकांचा सर्वाधिक वेळ खर्च होत आहे़ नव्याने बिनचूक यादी तयार होणार असल्याने इच्छुकांची संख्याही वाढण्याची चिन्हे आहेत़
़़़़़़़़़़़़़़़़
इच्छुकांना थोपविण्याचे आव्हान
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रशांत पाटील तर काँग्रेसकडून तांबे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे़ राष्ट्रवादीकडून कोते यांच्या नावाची चर्चा आहे़ कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष महेश कडूस यांनी निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे़ त्यामुळे पदवीधर निवडणुकीच्या मैदानात चार उमेदवार असतील, असे चित्र सध्या तरी दिसते़