वैराग, ईलेवाडी, तुळशीदासनगर, मानेगाव ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी ३७ अर्ज दाखल
By admin | Updated: July 18, 2015 01:12 IST
४० जागा : सोमवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत
वैराग, ईलेवाडी, तुळशीदासनगर, मानेगाव ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी ३७ अर्ज दाखल
४० जागा : सोमवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत बार्शी : तालुक्यातील वैराग, ईलेवाडी, तुळशीदासनगर व मानेगाव या चार ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार अखेर वैरागच्या 17 जागांसाठी 28, ईलेवाडीच्या 7 जागांसाठी 6, तुळशीदासनगरच्या 7 जागंेसाठी 1 तर मानेगावच्या 9 जागांसाठी 2 अर्ज निवडणूक शाखेकडे दाखल झाले आहेत. सोमवार दि.20 रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे़ आज भूमकर गटाने निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्र.5 वगळता इतर प्रभागातून अर्ज भरले. तसेच इतरही काही इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. वैरागमध्ये 6 प्रभागातून ही निवडणूक होत आहे. प्रभाग 1 मधून किशोर इंगळे, राजकुमार पौळ, शाम कसबे, संगमेश्वर डोळसे, शोभा भालशंकर, रंजना भालशंकर, प्रभाग 2 मधून संजय भूमकर, दिलीप डोके, सुजाता डोळसे, लक्ष्मी डोके, सीताराम दिंडोरे, प्रभाग 3 मधून संतोष तोडकरी, सुनील कटके, मोहसीन शेख, श्रीशैल पाटील, चांदसाहेब शेख, योजना जाधव, प्रभाग 4 मधून हमीद पठाण, आदम पठाण, प्रमोदिनी क्षीरसागर, अश्विनी कटके प्रभाग 6 मधून राजकुमार पौळ, हणमंत पांढरमिसे, शहनाज शेख, रेहना शेख, जयश्री घोडके, अनुराधा पांढरमिसे यांनी अर्ज दाखल केले आहेत. ईलेवाडी, मानेगावमध्ये बिनविरोधच्या हालचाली ईलेवाडी ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी निवडणूक होत असून प्रभाग 1 मधून रेखा काळे, अब्दुल तांबोळी, प्रभाग 2 मधून महादेव केसरे, प्रभाग 3 मधून भागीरथी शितोळे, सुनीता शिंदे, मच्छिंद्र तांबारे यांनी अर्ज दाखल केले आहेत. ईलेवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तुळशीदासनगर ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी निवडणूक होत असून येथून प्रभाग 2 मधून तृप्ती आतकरे यांचा एकमेव अर्ज आजअखेर दाखल आहे. मानेगाव ग्रा.पं.च्या 9 जागांसाठी निवडणूक होत असून येथून प्रभाग 1 मधून भारत ताटे, देविदास गायकवाड यांनी अर्ज दाखल केले आहेत. येथेही बिनविरोधच्या हालचाली सुरू आहेत. चौकट सोमवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत, दि.21 रोजी छाननी, दि.23 रोजी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असून त्याच दिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. 4 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून दि.6 रोजी बार्शी येथे मतमोजणी होणार आहे. मानेगावसाठी आर. डी. मोरे, ईलेवाडीसाठी ए.एस.वसेकर, अल्ताफ चौधरी, तुळशीदासनगरसाठी विठ्ठल ठवरे तर वैरागसाठी श्रीशैल बशेी, एम. डी. धेंडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.चौकट तालुक्यातील सर्वात मोठ्या वैराग ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. भूमकर व निंबाळकर या पारंपरिक गटातच येथे आजवर निवडणूक होत आली आहे. सध्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे संतोष निंबाळकर यांची सत्ता आहे तर वैराग जि़प़ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावेळी दोन गट पडण्याची शक्यता निर्माण झाली असून शिवसेना-राष्ट्रवादीचे दोन पॅनल व भाजपा (राजेंद्र मिरगणे गट) अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता दिसत आहे़वैरागमध्ये शुक्रवारी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य निरंजन भूमकर गटाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत़ अद्याप विद्यमान सरपंच शिवसेनेचे संतोष निंबाळकर, तसेच भाजपागटाच्या वतीने अर्ज दाखल झाले नाहीत़