शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

रेल्वेतील व्हीआयपी संस्कृती ३६ वर्षांनी निघाली मोडीत, कर्मचारी केवळ आॅफिसपुरते : अधिका-यांच्या सरंजामी राहणीला चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 03:37 IST

देशातील सर्वात मोठा सेवाउद्योग असूनही परंपरेने रूढ झालेली ‘व्हीआयपी’ संस्कृती मोडीत काढण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले असून त्याचाच एक भाग म्हणून वरिष्ठ अधिकाºयांना केवळ कार्यालयीन कामातच नव्हे तर घरीही सरंजामी राहणीमान सोडण्यास सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा सेवाउद्योग असूनही परंपरेने रूढ झालेली ‘व्हीआयपी’ संस्कृती मोडीत काढण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले असून त्याचाच एक भाग म्हणून वरिष्ठ अधिका-यांना केवळ कार्यालयीन कामातच नव्हे तर घरीही सरंजामी राहणीमान सोडण्यास सांगण्यात आले आहे.रेल्वे अधिका-यांसाठी गेली ३६ वर्षे लागू असलेला ‘प्रोटोकॉल’ आता मागे घेण्यात आल्याचा आदेश रेल्वे मंत्रालयाने २९ सप्टेंबर रोजी काढला आहे. आधीच्या ‘प्रोटोकॉल’नुसार रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या भेटीच्या वेळी संबंधित विभागीय रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह वरिष्ठ अधिका-यांनी, इतर कामे सोडून, त्यांच्यासोबत हांजी-हांजी करत फिरावे, असे अपेक्षित होते. आता अधिका-यांची यातून सुटका करण्यात आली आहे. रेल्वेच्या कोणाही अधिकाºयाने कोणत्याही वेळी पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू स्वीकारू नयेत, असे निर्देश रेल्वे मंडळाचे अध्यक्ष अश्विनी लोहाणी यांनी दिले आहेत.वरिष्ठ अधिका-यांच्या घरी रेल्वेतील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांनी घरगडी म्हणून काम करण्याची पद्धतही परंपरेने रूढ झाली आहे. अशा प्रकारे रेल्वेमार्गांच्या दुरुस्ती व देखभालीचे काम करणारे सुमारे ३० हजार कर्मचारी देशभरात वरिष्ठ अधिकाºयांच्या घरी कामाला असल्याचा अंदाज आहे. अशा सर्व कर्मचा-यांनी वरिष्ठ अधिका-यांच्या घरी काम न करता आपापले नेमून दिलेले काम करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.काळानुरूप बदलायला हवे-रेल्वे मंडळाचा एक माजी सदस्य, नाव उघड न करण्याच्या अटीवर म्हणाला की, जेव्हा हा ‘प्रोटोकॉल’ तयार केला गेला तेव्हा तो तयार करणाºयांनी त्यासाठीची साधाक-बाधक कारणे नक्की विचारात घेतली असणार. पण आता काळ बदलल्याने तो सुरू ठेवण्याचे काही कारण नाही. कोणत्याही सार्वजनिक संस्थेने काळानुरूप बदलायला हवेच.अधिका-यांनी प्रवाशांमध्ये मिसळावे-रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनुसार गेल्या महिनाभरात असे सहा-सात हजार कर्मचारी आपापल्या कामावर रुजू झाले आहेत. लवकरच सर्व कर्मचारी त्यांच्या मूळ ड्युटीवर परत जातील, अशी अपेक्षा आहे. अगदीच अपवादात्मक परिस्थिती वगळता यातून कोणालाही सूट दिली जाणार नाही, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.रेल्वेचे महाव्यवस्थापक व त्याहून वरचे अधिकारी जेव्हा रेल्वेने प्रवास करतात तेव्हा त्यांचा मोठा राजेशाही थाट असतो. त्यांच्यासाठी संबंधित गाडीला ऐशारामी ‘सलून’ किंवा खास ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’चा डबा जोडला जातो.परंतु अधिका-यांनी ही छानछोकी बंद करावी आणि वरिष्ठ अधिका-यांनी रेल्वेच्या नियमित स्लीपर व थ्री-टियर डब्यांमधून प्रवास करून प्रवाशांमध्ये मिसळावे, असा फतवा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी काढला आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेpiyush goyalपीयुष गोयल