शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कोरोना प्रभावित देशांमधून आलेले तब्बल 335 प्रवासी बेपत्ता, स्क्रिनिंग न केल्याने धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 18:40 IST

परदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 14 दिवसांसाठी विलगिकरण कक्षात ठेवणे आवश्यक आहे. आतापर्यंत अटारी-वाघा सीमेवरून आलेल्या 6 हजार 892 लोकांची तपासणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देबेपत्ता प्रवाशांची यादी पंजाब सरकारने केंद्राकडे पाठवलीअटारी-वाघा सीमेवरून आलेल्या 6 हजार 892 लोकांची आतापर्यंत तपासणीपंजाबात शाळांपाठोपाठ आता मॉल, जीम, चित्रपटगृहे आणि हॉटेल्सदेखील बंद

चंदीगड - भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्ये वाढ होताना दिसत आहे. या व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळांवर तपासणी केली जात आहे. मात्र, असे असतानाच कोरोना प्रभावित देशांमधून आलेले तब्बल 335 प्रवासी कोरोना व्हायरस स्क्रिनिंगच्या भीतीने बेपत्ता झाले आहेत. या प्रवाशांची यादी पंजाब सरकारने केंद्राकडे पाठवली आहे. 

परदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 14 दिवसांसाठी विलगिकरण कक्षात ठेवणे आवश्यक आहे. आतापर्यंत अटारी-वाघा सीमेवरून आलेल्या 6 हजार 892 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी एकाला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.  

आता मॉल, जीम, चित्रपटगृहे आणि हॉटेल्सदेखील बंदपंजाब सरकारने शाळांना सुटीची घोषणा केल्यानंतर आणखी एक पाऊल उचलले आहे. आता पंजाब सरकारने मॉल, जीम, चित्रपटगृहे, हॉटेल्स आणि शॉपिंग मॉलही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले असून दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

राज्यातही शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा आणि राजकीय कार्यक्रमांची परवानगी रद्द -

महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 20 वर रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रांतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. याशिवाय, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा आणि राजकीय अशा सर्व कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात आली आहे.