शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

राज्यसभा बंद पाडल्याचा ३३ काँग्रेस सदस्यांवर ठपका

By admin | Updated: May 4, 2016 02:10 IST

तद्दन बेशिस्त वर्तन करून आणि वारंवार अडथळे आणून सोमवारी राज्यसभेचे कामकाज बंद पाडल्याबद्दल राज्यसभा सचिवालयाने काँग्रेसच्या ३३ सदस्यांवर ठपका ठेवला आहे.

नवी दिल्ली : तद्दन बेशिस्त वर्तन करून आणि वारंवार अडथळे आणून सोमवारी राज्यसभेचे कामकाज बंद पाडल्याबद्दल राज्यसभा सचिवालयाने काँग्रेसच्या ३३ सदस्यांवर ठपका ठेवला आहे. काँग्रेस संसदीय पक्षाने यावर लगेच कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी तृणमूल काँग्रेसने मात्र या प्रकरणी सभापतींनी पक्षपात केल्याचा आरोप करत सभात्याग केला.दिवाळखोरीत गेलेल्या गुजरात राज्य पेट्रोलियम कॉर्पोरेशनला कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील भूगर्भवायू उत्खननासाठी भाडेपट्टा दिला जाण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत काँग्रेस सदस्यांनी सोमवारी राज्यसभेत गोंंधळ घातला होता. त्यावरून सभापतींनी कामकाज वारंवार तहकूब केले होते. तृणमूल काँग्रेसचे सुखेंदू शेखर रॉय यांनीही हा मुद्दा स्वतंत्रपणे लावून धरला होता. सभापतींचा आदेश न पाळल्याबद्दल त्यांना दिवसभरासाठी सभागृहाबाहेर काढले गेले होते.संसदेच्या दिवसभराच्या कामकाजातील ठळक बाबींची नोंद करणारे एक अधिकृत बुलेटिन अधिवेशन काळात प्रसिद्ध केले. सोमवारच्या राज्यसभेतील कामकाजासंबंधी जे बुलेटिन काढले गेले त्यात बेशिस्त वर्तन करून व वारंवार अडथळे आणून कामकाज चालू न दिल्याबद्दल एकूण ३३ काँग्रेस सदस्यांचा नावानिशी उल्लेख केला गेला. या ३३ सदस्यांचा ‘बेशिस्त’, ‘नियम मोडणारे’ व ‘सभापतींचा आदेश झुगारणारे’ म्हणून नामोल्लेख केलागेला त्यात मधुसूदन मिस्त्री, रेणुका चौधरी व आॅस्कर फर्नांडिस या नेत्यांसह गोव्याचे शांताराम नाईक व महाराष्ट्रातील हुसेन दलवाई यांचाही समावेश होता.मंगळवारी राज्यसभेचे कामकाज सुरू होताच तृणमूल काँग्रेसचे गटनेते डेरेक ओ‘ब्रायन यांनी उपर्युक्त बुलेटिन व त्यातील काँग्रेसच्या ३३ सदस्यांचा नामोल्लेख यांचा मुद्दा मांडला व या काँग्रेस सदस्यांवर का कारवाई केली गेली नाही, असा सवाल केला. ओ‘ब्रायन म्हणाले की, आमच्या पक्षाचे सदस्य सुखेंदू शेखर चौधरी यांना सभापतींनी दिवसभरासाठी सभागृहाबाहेर काढले. चौधरी यांनीही कोणताही वाद न घालता सभापतींच्या आदेशाचे पालन केले. ओ‘ब्रायन म्हणाले की, सभापतींनी बोलू नका सांगूनही चौधरी बोलत होते, हे खरे. मात्र ते त्यांच्या आसनावर बसूनच बोलत होते. काँग्रेसचे सदस्य आपल्या जागा सोडून आले होते व आरडाओरड करीत होते. त्यांच्याविरुद्ध काहीच कारवाई केली गेली नाही. तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी ‘आम्ही व्यथित झालो आहोत’, असे सांगत सभात्याग केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)सभापतींचा निर्णय अंतिम; त्यावर वाद घातला जाऊ शकत नाहीराज्यघटनेच्या अनुच्छेद १४ अन्वये प्रत्येकाला समानतेचा व समान वागणुकीचा हक्क आहे. सभागृहातील बेशिस्त वर्तनाबद्दल एका सदस्यावर कारवाई केली जाणे व अन्य ३३ जणांना काहीही कारवाई न करता सोडून दिले जाणे याने या हक्काचे उल्लंघन झाले नाही का, असा मुद्दा ओ‘ब्रायन यांनी मांडला व पीठासीन अधिकाऱ्यांनी यावर निर्णय द्यावा अशी मागणी केली. यावर उपसभापती पी.जे. कुरियन म्हणाले की, सोमवारीच कारवाई सभापतींनी (डॉ. हमीद अन्सारी) केलेली असल्याने त्यावर मी काहीच बोलू शकत नाही. सभापतींचा निर्णय अंतिम असतो. त्यावर वाद घातला जाऊ शकत नाही.