शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

राज्यसभा बंद पाडल्याचा ३३ काँग्रेस सदस्यांवर ठपका

By admin | Updated: May 4, 2016 02:10 IST

तद्दन बेशिस्त वर्तन करून आणि वारंवार अडथळे आणून सोमवारी राज्यसभेचे कामकाज बंद पाडल्याबद्दल राज्यसभा सचिवालयाने काँग्रेसच्या ३३ सदस्यांवर ठपका ठेवला आहे.

नवी दिल्ली : तद्दन बेशिस्त वर्तन करून आणि वारंवार अडथळे आणून सोमवारी राज्यसभेचे कामकाज बंद पाडल्याबद्दल राज्यसभा सचिवालयाने काँग्रेसच्या ३३ सदस्यांवर ठपका ठेवला आहे. काँग्रेस संसदीय पक्षाने यावर लगेच कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी तृणमूल काँग्रेसने मात्र या प्रकरणी सभापतींनी पक्षपात केल्याचा आरोप करत सभात्याग केला.दिवाळखोरीत गेलेल्या गुजरात राज्य पेट्रोलियम कॉर्पोरेशनला कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील भूगर्भवायू उत्खननासाठी भाडेपट्टा दिला जाण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत काँग्रेस सदस्यांनी सोमवारी राज्यसभेत गोंंधळ घातला होता. त्यावरून सभापतींनी कामकाज वारंवार तहकूब केले होते. तृणमूल काँग्रेसचे सुखेंदू शेखर रॉय यांनीही हा मुद्दा स्वतंत्रपणे लावून धरला होता. सभापतींचा आदेश न पाळल्याबद्दल त्यांना दिवसभरासाठी सभागृहाबाहेर काढले गेले होते.संसदेच्या दिवसभराच्या कामकाजातील ठळक बाबींची नोंद करणारे एक अधिकृत बुलेटिन अधिवेशन काळात प्रसिद्ध केले. सोमवारच्या राज्यसभेतील कामकाजासंबंधी जे बुलेटिन काढले गेले त्यात बेशिस्त वर्तन करून व वारंवार अडथळे आणून कामकाज चालू न दिल्याबद्दल एकूण ३३ काँग्रेस सदस्यांचा नावानिशी उल्लेख केला गेला. या ३३ सदस्यांचा ‘बेशिस्त’, ‘नियम मोडणारे’ व ‘सभापतींचा आदेश झुगारणारे’ म्हणून नामोल्लेख केलागेला त्यात मधुसूदन मिस्त्री, रेणुका चौधरी व आॅस्कर फर्नांडिस या नेत्यांसह गोव्याचे शांताराम नाईक व महाराष्ट्रातील हुसेन दलवाई यांचाही समावेश होता.मंगळवारी राज्यसभेचे कामकाज सुरू होताच तृणमूल काँग्रेसचे गटनेते डेरेक ओ‘ब्रायन यांनी उपर्युक्त बुलेटिन व त्यातील काँग्रेसच्या ३३ सदस्यांचा नामोल्लेख यांचा मुद्दा मांडला व या काँग्रेस सदस्यांवर का कारवाई केली गेली नाही, असा सवाल केला. ओ‘ब्रायन म्हणाले की, आमच्या पक्षाचे सदस्य सुखेंदू शेखर चौधरी यांना सभापतींनी दिवसभरासाठी सभागृहाबाहेर काढले. चौधरी यांनीही कोणताही वाद न घालता सभापतींच्या आदेशाचे पालन केले. ओ‘ब्रायन म्हणाले की, सभापतींनी बोलू नका सांगूनही चौधरी बोलत होते, हे खरे. मात्र ते त्यांच्या आसनावर बसूनच बोलत होते. काँग्रेसचे सदस्य आपल्या जागा सोडून आले होते व आरडाओरड करीत होते. त्यांच्याविरुद्ध काहीच कारवाई केली गेली नाही. तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी ‘आम्ही व्यथित झालो आहोत’, असे सांगत सभात्याग केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)सभापतींचा निर्णय अंतिम; त्यावर वाद घातला जाऊ शकत नाहीराज्यघटनेच्या अनुच्छेद १४ अन्वये प्रत्येकाला समानतेचा व समान वागणुकीचा हक्क आहे. सभागृहातील बेशिस्त वर्तनाबद्दल एका सदस्यावर कारवाई केली जाणे व अन्य ३३ जणांना काहीही कारवाई न करता सोडून दिले जाणे याने या हक्काचे उल्लंघन झाले नाही का, असा मुद्दा ओ‘ब्रायन यांनी मांडला व पीठासीन अधिकाऱ्यांनी यावर निर्णय द्यावा अशी मागणी केली. यावर उपसभापती पी.जे. कुरियन म्हणाले की, सोमवारीच कारवाई सभापतींनी (डॉ. हमीद अन्सारी) केलेली असल्याने त्यावर मी काहीच बोलू शकत नाही. सभापतींचा निर्णय अंतिम असतो. त्यावर वाद घातला जाऊ शकत नाही.