शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

२००३ पासून जम्मू-काश्मीरच्या हिंसाचारात ३१८ मुले मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:44 IST

जम्मू-काश्मीरमध्ये २००३ पासून आतापर्यंत म्हणजे १५ वर्षांत दरवर्षी सरासरी २६ मुले ठार झाली आहेत. लष्करी कारवाई, अतिरेकी हल्ले, अज्ञात बंदूकधाऱ्यांचा हल्ले, कचºयातील तोफगोळ्याचा स्फोट आणि भारत व पाकिस्तानी लष्करांचा तोफमारा यांत ही मुले मारली गेली आहेत.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये २००३ पासून आतापर्यंत म्हणजे १५ वर्षांत दरवर्षी सरासरी २६ मुले ठार झाली आहेत. लष्करी कारवाई, अतिरेकी हल्ले, अज्ञात बंदूकधाऱ्यांचा हल्ले, कचºयातील तोफगोळ्याचा स्फोट आणि भारत व पाकिस्तानी लष्करांचा तोफमारा यांत ही मुले मारली गेली आहेत. या काळात ३१८ मुले ठार झाली असून, १४४ मुले लष्करांच्या गोळीबारात सापडून तर १४७ मुले अज्ञात बंदूकधाºयांकडून मारली गेली.जम्मू-काश्मिरात मुलांच्या संरक्षणासाठी कोणतीही कायदेशीर चौकट पाळली जात नाही. तसेच आरोपींविरुद्ध आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही, असे अहवालात म्हटले आहे. काश्मीरचे बांधकाममंत्री नईम अख्तर यांनी सांगितले की, मुलांची हत्या वा गोळीबारात मृत्यू ही राज्यातील मोठी शोकांतिका असून, त्यामुळे येथील जनजीवन, मालमत्ता, शांतता व अर्थव्यवस्था अशा सर्वच पातळ्यांवर गंभीर परिणाम होत आहेत. (वृत्तसंस्था)मुलांवरील अन्य गुन्ह्यांचाही उल्लेख‘जेकेसीसीएस’ने जारी केलेला हा अहवाल ६३ पानांचा आहे. जम्मू-काश्मिरात गेल्या १५ वर्षांत मुलांविरोधातील हिंसाचाराचा त्यात आढावा घेण्यात आला आहे. त्यात मुलांची हत्या तसेच मुलांविरोधातील अटक, सामूहिक हिंसाचार आणि लैंगिक हिंसाचार यासारखे गुन्हे याचा तपशील देण्यात आला आहे.जम्मू काश्मीर कोअ‍ॅलिशन आॅफ सिव्हिल सोसायटी (जेकेसीसीएस) या मानवी हक्क संघटनेने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.अहवालातील तपशिलानुसार, लष्करी कारवाईत ठार झालेल्या मुलांपैकी ११० मुलांना गोळ्या घातल्या गेल्या आहेत.या अहवालासाठी जेकेसीसीएसच्या संशोधक पथकांनी प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन तसेच वृत्तपत्रांतील बातम्यांच्या आधारे खातरजमा करून सलग १५ वर्षे अभ्यास केला आहे.ही फक्त जम्मू-काश्मीरची मुले नाहीत, ही भारताचीमुले आहेत. त्यांच्याकडे शत्रूची मुले या भावनेने नपाहता आपली मुले या भावनेने पाहिल्यास प्रवाहच बदलेल.काश्मीरकडे आपण मानवीय दृष्टिकोनातून पाहायला हवे; तरच ही शोकांतिका समजून घेता येईल.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर