शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

उत्तरप्रदेशमध्ये जनता एक्सप्रेसला अपघात, ३१ ठार

By admin | Updated: March 20, 2015 18:58 IST

उत्तरप्रदेशमधील रायबरेली येथे डेहराडून - वाराणसी जनता साधारण एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरल्याने ३१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.

ऑनलाइन लोकमत 

रायबरेली, दि. २० - उत्तरप्रदेशमधील रायबरेली येथे डेहराडून - वाराणसी जनता साधारण एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात ३१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अपघातात सुमारे १५० प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. केंद्र सरकारने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

शुक्रवारी सकाळी जनता साधारण एक्सप्रेस बछरावा रेल्वे स्थानकाजवळ  इंजिनच्या मागील दोन डबे रुळांवरुन घसरले. या एक्सप्रेसला बछरावा स्टेशनवर थांबा होता पण गाडी तिथे थांबली नाही व स्टेशनपासून पुढे जाऊन या ट्रेनचे चार डबे रुळांवरुन घसरले. एक्सप्रेसचे ब्रेक न लागल्याने हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तसेच मोटरमनने सिग्नल न बघितल्याने गाडी वेगात पुढे गेली व अपघात झाला अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.  जखमींना लखनौ, रायबरेली व बछरावा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस व रेल्वेचे पथक मदतकार्यासाठी घटनास्थळी रवाना झाले असून रेल्वे मंत्रालयाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबाला दोन लाख रुपये, गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला ५० हजार रुपये तर किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना २० हजार रुपयांची मदत रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मृतांच्या नातेवाईकाना २ लाक रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.