शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

‘सर्वांसाठी घर’ योजनेसाठी ३०५ शहरांची निवड

By admin | Updated: August 30, 2015 22:14 IST

केंद्र सरकारने ‘सर्वांसाठी घर’ या आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी देशातील नऊ राज्यांमधील ३०५ शहरांची निवड केली आहे. या योजनेंतर्गत दोन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘सर्वांसाठी घर’ या आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी देशातील नऊ राज्यांमधील ३०५ शहरांची निवड केली आहे. या योजनेंतर्गत दोन कोटी गरिबांना घरे बांधून देता यावीत यासाठी सरकार पुढील सहा वर्षांत दोन लाख कोटी रुपयांचे साह्य देणार आहे. निवड झालेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकाही शहराचा समावेश नाही. या योजनेंतर्गत शहरांमध्ये राहणाऱ्या गरिबांना घरे बांधून देण्याच्या कामाला सुरुवात करण्यासाठी नऊ राज्यांतील ३०५ शहरांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती गृहनिर्माण आणि शहरी गरिबी निर्मूलन मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.या योजनेंतर्गत मंत्रालयातर्फे दोन कोटी शहरी गरिबांना त्यांची स्वत:ची घरे बांधण्यासाठी पुढील सहा वर्षांत प्रत्येकी दोन लाख रुपये देण्यात येतील. ज्या नऊ राज्यांची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहेत, त्यात चंदीगड (३६), गुजरात (३०), जम्मू-काश्मीर (१९), झारखंड (१५), केरळ (१५), मध्यप्रदेश (७४), ओडिशा (४२), राजस्थान (४०) आणि तेलंगण (३४) यांचा समावेश आहे. या नऊ राज्यांशिवाय अन्य सहा राज्यांनी मंत्रालयासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून शहरी भागांत ही योजना यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेली कायदा दुरुस्ती करण्याची हमी दिली आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. ज्या राज्यांनी हा करार केला आहे, त्यात आंध्र प्रदेश, बिहार, मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे. या राज्यांनी स्वस्त घरे बांधण्यासाठी शहराच्या मास्टर प्लानमध्ये परिवर्तन किंवा सुधारणा, भवन निर्माणीबाबतच्या मंजुरीसाठी एकल खिडकी व्यवस्था, लेआऊटच्या मंजुरीसाठी कालबद्ध क्लिअरन्स प्रणाली, भाडे कायद्यात दुरुस्ती, झोपडपट्टीचा पुनर्विकास आदी सुधारणा करण्याची हमी दिली आहे. (वृत्तसंस्था)