शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

३० टक्के वकिलांकडे नाही कायद्याची वैध पदवी

By admin | Updated: July 26, 2015 04:56 IST

देशातील न्यायालयांमध्ये काळा झगा घालून वकिली करणाऱ्या ३० टक्के वकिलांच्या कायद्याच्या पदव्या ‘लबाडी’ने मिळविलेल्या आहेत, अशी धक्कादायक माहिती बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या

चेन्नई : देशातील न्यायालयांमध्ये काळा झगा घालून वकिली करणाऱ्या ३० टक्के वकिलांच्या कायद्याच्या पदव्या ‘लबाडी’ने मिळविलेल्या आहेत, अशी धक्कादायक माहिती बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या अध्यक्षांनीच येथे एका कार्यक्रमात दिली.बार कौन्सिल ही वकिलांना वकिलीची सनद देणारी आणि चुकार वकिलांवर कारवाई करण्याचे अधिकार असलेली वैधानिक संस्था आहे. बार कौन्सिलने आयोजित केलेल्या वकिलांच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेत बोलताना अ.भा. बार कौन्सिलचे अध्यक्ष मन्नन कुमार मिश्रा यांनी ही माहिती देताना सांगितले की, सध्या न्यायालयांमध्ये वकिली करणाऱ्या ३० टक्के वकिलांकडे कायद्याची वैध पदवी नाही. अशा वकिलांना वकिली व्यवसायातून बाहेर काढण्याचे काम कौन्सिलने हाती घेतले आहे. दुसऱ्यांदा कौन्सिलचे अध्यक्ष झालेल्या अ‍ॅड. मिश्रा यांनी सांगितले की, असे बनावट वकील व कायद्याची पदवी घेऊन वकिली न करणारे (नॉन प्रॅक्टिसिंग) यांच्यामुळे वकिली व्यवसायाचे नाव खराब होत आहे. अशांना वेचून बाहेर काढले जाईल. वकिलांकडून, कोणत्याही कारणावरून केले जाणारे संप व न्यायालयीन कामावर टाकले जाणारे बहिष्कार याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. या संदर्भात त्यांनी सांगितले की, असे तंटे व वदा सोडविण्यासाठी बार कौन्सिलने त्रीस्तरिय तंटा निवारण यंत्रणेचा प्रस्ताव केला आहे. यात न्यायसंस्थेनेही सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले. विधी सेवा प्राधिकरणांचे काम व्यवस्थित सुरूसध्याच्या परिस्थितीत विधी सेवा प्राधिकरणे नीटपणे कामे करीत नाहीत. परिणामी, सार्वजनिक निधीचा अपव्यय होत आहे. त्यामुळे या प्राधिकरणांंचे काम वकिलांकडे सोपवावे, असे मिश्रा यांचे म्हणणे होते. यासंदर्भात आपण केंद्रीय विधी व न्यायमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांची भेट घेतली असता त्यांनी या प्रस्तावावर विचार करण्याचे मान्य केले असून, त्यासंबंधीचे नियम बार कौन्सिलने तयार करावेत असे सांगितले आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. व्ही. गोपाळ गौडा यांनी मिश्रा यांच्या म्हणण्याचे लगेच खंडन केले. विधी सेवा प्राधिकरणांचे काम व्यवस्थित सुरू आहे व वकील आणि न्यायाधीश दोघेही त्याच्या यशाचे मानकरी आहेत, असे न्या. गौडा म्हणाले.