ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २८ - वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानी जवानांनी सामान्य नागरिकांना लक्ष करत जम्मू-काश्मीरमधील आर.एस.पुरा सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात तीन नागरिक ठार झाले असून १६ जण जखमी झाले आहेत. काल रात्री दीडच्या सुमारास पाकिस्तानी जवानांनी जोरदार गोळीबार सुरू केला. त्यात दोन नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. पाकिस्तानच्या या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.