शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

29000 कोटींचा कोळसा घोटाळा, अदानी समूहाची चौकशी

By admin | Updated: April 7, 2016 18:39 IST

इंडोनेशियातून कोळसा आयात करताना कृत्रिमरीत्या चढे दर दाखवायचे आणि ग्राहकांकडून जास्त दराने वीजबिलातून पैसे लुबाडायचे असा प्रकार घडल्याचा संशय असून हा घोटाळा 29 हजार कोटी रुपये

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - इंडोनेशियातून कोळसा आयात करताना कृत्रिमरीत्या चढे दर दाखवायचे आणि ग्राहकांकडून जास्त दराने वीजबिलातून पैसे लुबाडायचे असा प्रकार घडल्याचा संशय असून हा घोटाळा 29 हजार कोटी रुपये किंवा 4.4 अब्ज डॉलर्स इतका प्रचंड असल्याचा अंदाज आहे. या घोटाळ्यात एकूण 40 कंपन्या असून यामध्ये अदानी समूहाच्या सहा कंपन्यांचा व अनिल अंबानींच्या कंपनीचाही समावेश आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळचे मानले जाणाऱ्या गौतम अदानींच्या कंपन्यांची निष्पक्षपातीपणे चौकशी होईल का अशी उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
या संदर्भातले वृत्त प्रथम इकॉनॉमक अँड पॉलिटिकल वीकलीने याबाबत वृत्त दिले असून केंद्रीय अर्थखाते भारतातल्या 40 ऊर्जा कंपन्यांची चौकशी करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर, अदानी पॉवर राजस्थान, अदानी पॉवर महाराष्ट्र, अदानी विल्मर, व्योम ट्रेड या कंपन्यांचा समावेश आहे. या समूहाने वेगवेगळ्या राज्यांच्या ऊर्जानिर्मिती कंपन्यांना आयात कोळसा पुरवला आहे. 
याखेरीज अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्टरचीही चौकशी करण्यात येत असल्याचे वृत्त ईपीडब्ल्यूने दिले आहे.
डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स या प्रकरणांची चौकशी करत असून फेब्रवारीमध्ये मनोज कुमार गर्ग यास अटक करण्यात आली. इंडोनेशियातून आयात कोळसाची किंमत जास्त दाखवून जवळपास 280 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप या प्रकरणात आहे.
वीजेचे दर निश्चित करताना अनेक घटकांबरोबच कच्च्या मालाची, म्हणजे कोळश्याची किंमत महत्त्वाची असते. हेच दर कृत्रिमरीत्या फुगवल्याने सर्वसामान्य ग्राहकांची हजारो कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा आरोप व्यक्त करण्यात आला आहे. 
विशेष म्हणजे इंडोनेशियातून थेट कोळसा आयात झाला असला तरी बिलं मात्र अन्य देशांच्या मार्फत आल्याचे दाखवल्याने आर्थिक अफरातफरीची शक्यताही डीआरआय पडताळत आहे.
 
 
भारताने 2014-15 मध्ये 212.11 दशलक्ष टन इतका कोळसा आयात केला, ज्याची किंमत 1.04 लाख कोटी रुपये होती. यामध्ये नक्की किंमत किती होती, आणि वाढवून किती लावली होती हे चौकशीअंती स्पष्ट होईल.
केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी इंडोनेशियातून आयात केलेल्या व एनटीपीसीला वितरीत केलेल्या कोळशाची किंमत वाढवून लावली होती का याची चौकशी करत असल्याचे डीआरआयने कळवल्याचे मान्य केले आहे.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या गौतम अदानी यांच्या अदानी समूहाची निष्पक्ष चौकशी या कोळसा घोटाळ्यात मोदी सरकार करेल का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.