शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

२.९४ लाख रिक्त पदांसाठी रेल्वेने सुरू केली भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 06:03 IST

१९९१मध्ये रेल्वेकडे १६,५४,९८५ कर्मचारी होते

नवी दिल्ली : यंदाच्या १ जून रोजीच्या आकडेवारीनुसार, रेल्वेमधील २.९८ लाख पदे रिक्त असून, त्यातील २.९४ लाख पदांच्या भरतीची प्रक्रिया रेल्वेने सुरू केली आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले की, गेल्या दहा वर्षांत रेल्वेत ४.६१ लाख लोकांची भरती करण्यात आली. रिक्त जागा भरणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. रेल्वेची कर्मचारी संख्या ठरविताना रजा राखीव (लिव्ह रिझर्व्ह) आणि प्रशिक्षणार्थी राखीव (ट्रेनी रिझर्व्ह) यासह अनेक घटक लक्षात घेतले जातात.

एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात गोयल म्हणाले की, १९९१मध्ये रेल्वेकडे १६,५४,९८५ कर्मचारी होते. २०१९ मध्ये १२,४८,१०१ कर्मचारी आहेत. कर्मचारी संख्या कमी झाली असली, तरी रेल्वेच्या सेवेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.रेल्वे भरती बोर्ड, तसेच रेल्वे भरती सेल यांच्यामार्फत रेल्वेमध्ये भरती प्रक्रिया राबविली जाते. १ जून, २०१९ रोजी अ, ब, क आणि पूर्वाश्रमीच्या ड श्रेणीत २,९८,५७४ पदे रिक्त आहेत. त्यातील २,९४,४२० पदांची भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.खासगीकरण नाहीदरम्यान, रेल्वेच्या खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत सांगितले. रेल्वेने दोन गाड्या खासगी संस्थांना चालवायला दिल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात गोयल यांनी म्हटले की, ‘खासगी संस्थांना चालवायला देण्यासाठी अजून कोणतीही गाडी निश्चित करण्यात आलेली नाही.’सरकारने अधिकृत माहिती दिली नसली, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस खासगी संस्थेला चालवायला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.