शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

२८... भिवापूर... कार्ड

By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST

दोन तासात २०० रेशनकार्ड तयार?

दोन तासात २०० रेशनकार्ड तयार?
भिवापूर तहसील कार्यालय : वृद्धाने व्यक्त केला रोष, सहा महिन्यांपासून सुरू होत्या हेलपाट्या
भिवापूर : सामान्य नागरिकांच्या दृष्टीने रेशनकार्डला विशेष महत्त्व आहे. रेशनकार्डासाठी खेड्यापाड्यातील ग्रामस्थ सहा महिन्यांपासून भिवापूर तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवीत होते. त्यातच शुक्रवारी एका वृद्ध व्यक्तीने तहसील कार्यालयात चांगलाच रोष व्यक्त केला. त्यामुळे कार्यालयात धूळ खात पडलेल्या रेशनकार्डवर अधिकाऱ्याने स्वाक्षरी केली. पाहता पाहता सहा महिन्यांपासून केवळ स्वाक्षरीसाठी अडलेले २०० च्यावर रेशनकार्ड अवघ्या दोन तासांत तयार झाले.
सामान्य नागरिकांना शासकीय स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्याची खरेदी करण्यासह अन्य महत्त्वाच्या कामासाठी रेशनकार्डची गरज भासते. त्यामुळे अनेकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज भिवापूर तहसील कार्यालयात सादर केला. दरम्यान, रेशनकार्ड मिळविण्यासाठी ग्रामस्थांच्या तहसील कार्यालयात हेलपाट्या मारणे सुरू झाले. प्रत्येक वेळी तहसीलदारांची स्वाक्षरी झाली नसल्याचे कारण सांगून संबंधित कर्मचारी ग्रामस्थांची बोळवण करीत होते. वारंवार कार्यालयातून रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण होणे स्वाभाविक होते.
शुक्रवारी भिवापूरचा आठवडी बाजार असल्याने बहुतांश ग्रामस्थ बाजाराच्या निमित्ताने भिवापुुरात आले होते. सदर ग्रामस्थ रेशनकार्डची चौकशी करण्यासाठी तहसील कार्यालयात पोहोचले. ग्रामस्थांनी कर्मचाऱ्याकडे रेशनकार्डविषयी विचारणा केली असता, कर्मचाऱ्यांनी नेहमीचे उत्तर देत ग्रामस्थांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला. सदर उत्तर ऐकून बेसूर येथील एका वृद्ध व्यक्तीने त्या कर्मचाऱ्याला जोरजोरात शिव्यांची लाखोळी वाहायला सुरुवात केली. प्रकरण एवढ्यावर थांबले नाही तर, संतापलेली वृद्ध व्यक्ती चक्क त्या कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून गेली. या प्रकारामुळे कर्मचारीही अवाक् झाले. अखेर त्या कर्मचाऱ्याला स्वत:च्या बचावासाठी दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या मागे लपावे लागले. सदर प्रकार कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला कळताच त्याने नायब तहसीलदारांना सदर रेशनकार्डवर स्वाक्षरी करण्यास सांगितले. त्यानंतर स्वाक्षरी झालेले कार्ड त्या वृद्ध व्यक्तीच्या स्वाधीन करण्यात आले.
या कार्यालयात गेल्या सहा महिन्यांपासून तयार करण्यात आलेले रेशनकार्ड अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीविना धूळ खात पडले होते. त्यावर स्वाक्षरी करण्याचे औदार्य अधिकाऱ्यांनी दाखवले नव्हते. त्यामुळे एकीकडे कर्मचाऱ्यांची फजिती तर दुसरीकडे ग्रामस्थांची अडचण, अशी दुहेरी समस्या निर्माण झाली होती. ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्रांचा तिढा अद्याप कायम आहे. (तालुका प्रतिनिधी)