शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

चेंगराचेंगरीत २७ ठार

By admin | Updated: July 15, 2015 00:13 IST

आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे गोदावरी नदी किनाऱ्यावर पुष्करम उत्सवात मंगळवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत २३ महिलांसह २७ भाविक ठार, तर ३० जखमी झाले.

राजमुंद्री : आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे गोदावरी नदी किनाऱ्यावर पुष्करम उत्सवात मंगळवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत २३ महिलांसह २७ भाविक ठार, तर ३० जखमी झाले. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी चेंगराचेंगरीत मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.१२ वर्षांत एकदा आयोजित होणाऱ्या या धार्मिक महोत्सवाच्या उद्घाटनात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक गोदावरी किनारी जमले होते. सकाळी ७.३० ते ८ च्या दरम्यान स्नानासाठीच्या घाटावर ही दुर्दैवी घटना घडली. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेले बहुतांश वयोवृद्ध होते. लांबचा प्रवास करून आल्याने ते थकलेले होते. श्वास गुदमरल्याने या सर्वांचा मृत्यू झाला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी विजय रामराजू यांनी दिली. दरम्यान, सर्व मृतदेह राजमुंद्री सरकारी इस्पितळात आणण्यात आले असून जखमींवर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे सुद्धा पुष्करमनिमित्त गोदावरी नदीत पवित्र स्नानासाठी आले होते. या घटनेबद्दल त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून ते स्वत: बचाव आणि मदत मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. पुढील ११ दिवस आपण येथेच मुक्कामी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. चेंगराचेंगरीपूर्वी नायडू, त्यांच्या पत्नी आणि मुलाने नदीत स्नान केले. नदीची पूजाअर्चा करून शंखनिनादाने १२ दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा शुभारंभ केला. मान्यवरांना शोक पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चेंगराचेंगरीतील मृतांप्रती शोक व्यक्त केला. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्याकरिता ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी राज्य सरकारला केले. (वृत्तसंस्था)