शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

चेंगराचेंगरीत २७ ठार

By admin | Updated: July 15, 2015 00:13 IST

आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे गोदावरी नदी किनाऱ्यावर पुष्करम उत्सवात मंगळवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत २३ महिलांसह २७ भाविक ठार, तर ३० जखमी झाले.

राजमुंद्री : आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे गोदावरी नदी किनाऱ्यावर पुष्करम उत्सवात मंगळवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत २३ महिलांसह २७ भाविक ठार, तर ३० जखमी झाले. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी चेंगराचेंगरीत मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.१२ वर्षांत एकदा आयोजित होणाऱ्या या धार्मिक महोत्सवाच्या उद्घाटनात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक गोदावरी किनारी जमले होते. सकाळी ७.३० ते ८ च्या दरम्यान स्नानासाठीच्या घाटावर ही दुर्दैवी घटना घडली. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेले बहुतांश वयोवृद्ध होते. लांबचा प्रवास करून आल्याने ते थकलेले होते. श्वास गुदमरल्याने या सर्वांचा मृत्यू झाला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी विजय रामराजू यांनी दिली. दरम्यान, सर्व मृतदेह राजमुंद्री सरकारी इस्पितळात आणण्यात आले असून जखमींवर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे सुद्धा पुष्करमनिमित्त गोदावरी नदीत पवित्र स्नानासाठी आले होते. या घटनेबद्दल त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून ते स्वत: बचाव आणि मदत मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. पुढील ११ दिवस आपण येथेच मुक्कामी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. चेंगराचेंगरीपूर्वी नायडू, त्यांच्या पत्नी आणि मुलाने नदीत स्नान केले. नदीची पूजाअर्चा करून शंखनिनादाने १२ दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा शुभारंभ केला. मान्यवरांना शोक पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चेंगराचेंगरीतील मृतांप्रती शोक व्यक्त केला. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्याकरिता ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी राज्य सरकारला केले. (वृत्तसंस्था)