तिरुअनंतपूरम : येथे भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका ९0 वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी त्या भागातील २७ भटक्या कुत्र्यांची हत्या केली. गुरुवारी हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. एक वृद्ध जेवल्यानंतरआपल्या घराबाहेर आराम करत असताना पाच भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यात तो मरण पावल्याचे कळताच, त्या भागात राहणारे रहिवासी अतिशय संतापले आणि त्यांनी तेथील जनसेवा शिशुभवनच्या संस्थेतील कार्यकर्त्यांच्या मदतीने २७ कुत्र्यांना ठार मारले. (वृत्तसंस्था)
केरळमध्ये केले २७ कुत्र्यांना ठार
By admin | Updated: October 29, 2016 02:22 IST