शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

तामिळनाडूत पुराचे २६९ बळी - गृहमंत्री राजनाथ सिंह

By admin | Updated: December 3, 2015 14:27 IST

पूरग्रस्त तामिळनाडूतील स्थिती अतिशय गंभीर बनली असून राज्यात आत्तापर्यंत २६९ बळी गेले आहेत, अशी माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिली

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - पूरग्रस्त तामिळनाडूतील स्थिती अतिशय गंभीर बनली असून राज्यात आत्तापर्यंत २६९ बळी गेले आहेत, अशी माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिली. नियम १९३ अतंर्गत देशातील विविध पूरग्रस्त भागांसदर्भात झालेल्या चर्चेवर ते उत्तर देत होते. केंद्र सरकार तामिळनाडूतील स्थितीवर संपूर्ण लक्ष ठेवून असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही पूराची हवाई पाहणी करण्यासाठी चेन्नईला रवाना झाल्याचे सिंह यांनी सांगितले. 
संसदेत बोलताना गृहमंत्री म्हणाले की ' १ ते २ डिसेंबर या २४ तासांच्या काळात राज्यात ३३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या १०० वर्षातील पावसाने गाठलेला हा उच्चांक आहे. तसेच हवामान विभागाने येत्या दोन ते दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात सर्वत्र पाणीच पाणी साचले असून तामिळनाडूची राजधानी तर अक्षरश: एक बेट बनले आहे. सतत पडणा-या पावसामुळे रेल्वे, रस्ते व हवाई वाहतुकीवर विपरित परिणाम झाला असून  मदतकार्यातही अनेक अडचणी येत असल्याचे गृहमंत्र्यांनी नमूद केले. 
दरम्यान एनडीआरएफची २८ पथके तामिळनाडू व पाँडेचेरीत तैनात करण्यात आली असून लष्कराची अनेक पथकेही पाठवण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच दिल्लीहून चार तर हैदराबादहून लष्कराची अतिरिक्त दोन पथके पाठवण्यात येत असून नौदलाच्या १२ नौका व २५५ जवान बचावकार्यात गुंतल्याचे सांगत सरकारच्या मदतकार्याची माहिती सादर केली. तसेच राज्यातील मदत व पुनर्वसनासाठी ९४० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.