शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

तामिळनाडूत पुराचे २६९ बळी - गृहमंत्री राजनाथ सिंह

By admin | Updated: December 3, 2015 14:27 IST

पूरग्रस्त तामिळनाडूतील स्थिती अतिशय गंभीर बनली असून राज्यात आत्तापर्यंत २६९ बळी गेले आहेत, अशी माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिली

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - पूरग्रस्त तामिळनाडूतील स्थिती अतिशय गंभीर बनली असून राज्यात आत्तापर्यंत २६९ बळी गेले आहेत, अशी माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिली. नियम १९३ अतंर्गत देशातील विविध पूरग्रस्त भागांसदर्भात झालेल्या चर्चेवर ते उत्तर देत होते. केंद्र सरकार तामिळनाडूतील स्थितीवर संपूर्ण लक्ष ठेवून असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही पूराची हवाई पाहणी करण्यासाठी चेन्नईला रवाना झाल्याचे सिंह यांनी सांगितले. 
संसदेत बोलताना गृहमंत्री म्हणाले की ' १ ते २ डिसेंबर या २४ तासांच्या काळात राज्यात ३३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या १०० वर्षातील पावसाने गाठलेला हा उच्चांक आहे. तसेच हवामान विभागाने येत्या दोन ते दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात सर्वत्र पाणीच पाणी साचले असून तामिळनाडूची राजधानी तर अक्षरश: एक बेट बनले आहे. सतत पडणा-या पावसामुळे रेल्वे, रस्ते व हवाई वाहतुकीवर विपरित परिणाम झाला असून  मदतकार्यातही अनेक अडचणी येत असल्याचे गृहमंत्र्यांनी नमूद केले. 
दरम्यान एनडीआरएफची २८ पथके तामिळनाडू व पाँडेचेरीत तैनात करण्यात आली असून लष्कराची अनेक पथकेही पाठवण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच दिल्लीहून चार तर हैदराबादहून लष्कराची अतिरिक्त दोन पथके पाठवण्यात येत असून नौदलाच्या १२ नौका व २५५ जवान बचावकार्यात गुंतल्याचे सांगत सरकारच्या मदतकार्याची माहिती सादर केली. तसेच राज्यातील मदत व पुनर्वसनासाठी ९४० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.