शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूत पुराचे २६९ बळी - गृहमंत्री राजनाथ सिंह

By admin | Updated: December 3, 2015 14:27 IST

पूरग्रस्त तामिळनाडूतील स्थिती अतिशय गंभीर बनली असून राज्यात आत्तापर्यंत २६९ बळी गेले आहेत, अशी माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिली

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - पूरग्रस्त तामिळनाडूतील स्थिती अतिशय गंभीर बनली असून राज्यात आत्तापर्यंत २६९ बळी गेले आहेत, अशी माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिली. नियम १९३ अतंर्गत देशातील विविध पूरग्रस्त भागांसदर्भात झालेल्या चर्चेवर ते उत्तर देत होते. केंद्र सरकार तामिळनाडूतील स्थितीवर संपूर्ण लक्ष ठेवून असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही पूराची हवाई पाहणी करण्यासाठी चेन्नईला रवाना झाल्याचे सिंह यांनी सांगितले. 
संसदेत बोलताना गृहमंत्री म्हणाले की ' १ ते २ डिसेंबर या २४ तासांच्या काळात राज्यात ३३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या १०० वर्षातील पावसाने गाठलेला हा उच्चांक आहे. तसेच हवामान विभागाने येत्या दोन ते दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात सर्वत्र पाणीच पाणी साचले असून तामिळनाडूची राजधानी तर अक्षरश: एक बेट बनले आहे. सतत पडणा-या पावसामुळे रेल्वे, रस्ते व हवाई वाहतुकीवर विपरित परिणाम झाला असून  मदतकार्यातही अनेक अडचणी येत असल्याचे गृहमंत्र्यांनी नमूद केले. 
दरम्यान एनडीआरएफची २८ पथके तामिळनाडू व पाँडेचेरीत तैनात करण्यात आली असून लष्कराची अनेक पथकेही पाठवण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच दिल्लीहून चार तर हैदराबादहून लष्कराची अतिरिक्त दोन पथके पाठवण्यात येत असून नौदलाच्या १२ नौका व २५५ जवान बचावकार्यात गुंतल्याचे सांगत सरकारच्या मदतकार्याची माहिती सादर केली. तसेच राज्यातील मदत व पुनर्वसनासाठी ९४० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.