शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

मोदी - शरीफ भेटीत निघाला २६/११चा विषय

By admin | Updated: May 27, 2014 16:34 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान नरेंद्र मोदींनी २६/११ रोजी मुंबईवर झालेला हल्ला,दाऊद इब्राहिम अशा अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केल्याचे समजते.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २७ - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान नरेंद्र मोदींनी २६/११ रोजी मुंबईवर झालेला हल्ला, त्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हफीझ सईद, दाऊद इब्राहिम अशा अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केल्याचे परराष्ट्र खात्याच्या अधिका-यांनी पत्रकारांना सांगितले.  तसेच पाकिस्तानकडून भारतावर वारंवार होणारे हल्ले, हेरत येथे भारतीय दूतावासावार झालेल्या हल्ला याबाबतही चर्चा करत हे सर्व त्वरित थांबले पाहिजे, अशी कठोर भूमिका घेतली.
मुंबईवरील हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानात न्यायालयीन प्रक्रिया गतीमान करावी अशी मागणी मोदींनी शरीफ यांच्याकडे केल्याचे परराष्ट्र खात्याच्या अधिका-यांनी सांगितले. तसेच दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव एकमेकांमध्ये संपर्क ठेवतील आणि परस्पर संबंध सुधारण्याकडे लक्ष देतील यावर या बैठकीत भर देण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले.
मंगळवारी दुपारी मोदींनी नवाझ शरीफ यांची हैदराबाद हाऊस येथे भेट घेतली, यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज याही उपस्थित होत्या. सुमारे ४५ मिनिटे चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांनी अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्याबाबत चर्चा करताना त्या खटल्याच्या सुनावणीबाबत तसेच या मुद्यावर पाकिस्तानच्या भूमिकेबाबतही भारत समाधानी नसल्याचे मोदींनी या चर्चेत नमूद केले.
तत्पूर्वी मंगळवारी सकाळी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मोदींनी सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांचीही भेट घेतली. त्यामध्ये अफगाणिस्तान, भूतान, मालदीव या राष्ट्रांच्या प्रमुखांचा समावेश होता.