शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

२६/११ च्या हल्ल्यामुळे माझं आयुष्यच बदललं - रतन टाटा

By admin | Updated: December 2, 2015 13:41 IST

मुंबईवर २६/ ११ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आपलं आयुष्यच बदलल्याची भावना विख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केली.

ऑनलाइन लोकमत
बडोदा, दि. २ - मुंबईवर २६/ ११ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आपलं आयुष्यच बदलल्याची भावना विख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केली. 'बडोदा मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे रतन टाटा यांना सयाजी रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, त्यानंतर ते तरूणांशी संवाद साधत होते. 
'आयुष्यात मागे वळून बघितलं तर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे माझं आयुष्यचं बदलून गेल्याचं जाणवतं. त्या भीषण हल्ल्यानंतर मी तब्बल सहा महिने नीट बोलूही शकत नव्हतो, माझ्या आवाजात कंप जाणवयाचा, असं सांगणा-या  रतन टाटांच्या शब्दांमधून त्या हल्ल्याची भीषणता जाणवत होती. रोज संध्याकाळी मी रुग्णालयांमध्ये जाऊन हल्यात जखमी झालेल्यांना, त्यांच्या कुटुंबियांना भेटायचो. काही जणांकडे उपचाराचे पैसे देण्यासाठीही कोणी उरलं नव्हतं, हे माझ्या लक्षात आलं. त्यानंतर आम्ही सर्व ज्ञात व अज्ञात पीडितांच्या पुनर्वसनसाठी एका ट्रस्टची स्थापना केली असे सांगत त्या हल्लाने मला आणखी संवेदनशील बनवल्याचेही टाटांनी नमूद केलं.
यावेळी रतन टाटा यांनी भारत हे एक गुणवत्तेवर आधारित समान संधी देणार राष्ट्र म्हणून घडवण्याचे आवाहनही तरुणांना केले.
भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असलेले बडोदा राज्याचे प्रभावशाली संस्थानिक सयाजी राजे तृतीय यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. टाटा हे हा पुरस्कार मिळालेले दुसरे व्यक्तिमत्त्व असून त्यांच्याआधी हा इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांना या पुरस्कारान गौरवण्यात आले होते.