शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

२६/११ च्या हल्ल्यामुळे माझं आयुष्यच बदललं - रतन टाटा

By admin | Updated: December 2, 2015 13:41 IST

मुंबईवर २६/ ११ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आपलं आयुष्यच बदलल्याची भावना विख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केली.

ऑनलाइन लोकमत
बडोदा, दि. २ - मुंबईवर २६/ ११ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आपलं आयुष्यच बदलल्याची भावना विख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केली. 'बडोदा मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे रतन टाटा यांना सयाजी रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, त्यानंतर ते तरूणांशी संवाद साधत होते. 
'आयुष्यात मागे वळून बघितलं तर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे माझं आयुष्यचं बदलून गेल्याचं जाणवतं. त्या भीषण हल्ल्यानंतर मी तब्बल सहा महिने नीट बोलूही शकत नव्हतो, माझ्या आवाजात कंप जाणवयाचा, असं सांगणा-या  रतन टाटांच्या शब्दांमधून त्या हल्ल्याची भीषणता जाणवत होती. रोज संध्याकाळी मी रुग्णालयांमध्ये जाऊन हल्यात जखमी झालेल्यांना, त्यांच्या कुटुंबियांना भेटायचो. काही जणांकडे उपचाराचे पैसे देण्यासाठीही कोणी उरलं नव्हतं, हे माझ्या लक्षात आलं. त्यानंतर आम्ही सर्व ज्ञात व अज्ञात पीडितांच्या पुनर्वसनसाठी एका ट्रस्टची स्थापना केली असे सांगत त्या हल्लाने मला आणखी संवेदनशील बनवल्याचेही टाटांनी नमूद केलं.
यावेळी रतन टाटा यांनी भारत हे एक गुणवत्तेवर आधारित समान संधी देणार राष्ट्र म्हणून घडवण्याचे आवाहनही तरुणांना केले.
भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असलेले बडोदा राज्याचे प्रभावशाली संस्थानिक सयाजी राजे तृतीय यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. टाटा हे हा पुरस्कार मिळालेले दुसरे व्यक्तिमत्त्व असून त्यांच्याआधी हा इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांना या पुरस्कारान गौरवण्यात आले होते.