शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

२६/११ च्या हल्ल्यामुळे माझं आयुष्यच बदललं - रतन टाटा

By admin | Updated: December 2, 2015 13:41 IST

मुंबईवर २६/ ११ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आपलं आयुष्यच बदलल्याची भावना विख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केली.

ऑनलाइन लोकमत
बडोदा, दि. २ - मुंबईवर २६/ ११ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आपलं आयुष्यच बदलल्याची भावना विख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केली. 'बडोदा मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे रतन टाटा यांना सयाजी रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, त्यानंतर ते तरूणांशी संवाद साधत होते. 
'आयुष्यात मागे वळून बघितलं तर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे माझं आयुष्यचं बदलून गेल्याचं जाणवतं. त्या भीषण हल्ल्यानंतर मी तब्बल सहा महिने नीट बोलूही शकत नव्हतो, माझ्या आवाजात कंप जाणवयाचा, असं सांगणा-या  रतन टाटांच्या शब्दांमधून त्या हल्ल्याची भीषणता जाणवत होती. रोज संध्याकाळी मी रुग्णालयांमध्ये जाऊन हल्यात जखमी झालेल्यांना, त्यांच्या कुटुंबियांना भेटायचो. काही जणांकडे उपचाराचे पैसे देण्यासाठीही कोणी उरलं नव्हतं, हे माझ्या लक्षात आलं. त्यानंतर आम्ही सर्व ज्ञात व अज्ञात पीडितांच्या पुनर्वसनसाठी एका ट्रस्टची स्थापना केली असे सांगत त्या हल्लाने मला आणखी संवेदनशील बनवल्याचेही टाटांनी नमूद केलं.
यावेळी रतन टाटा यांनी भारत हे एक गुणवत्तेवर आधारित समान संधी देणार राष्ट्र म्हणून घडवण्याचे आवाहनही तरुणांना केले.
भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असलेले बडोदा राज्याचे प्रभावशाली संस्थानिक सयाजी राजे तृतीय यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. टाटा हे हा पुरस्कार मिळालेले दुसरे व्यक्तिमत्त्व असून त्यांच्याआधी हा इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांना या पुरस्कारान गौरवण्यात आले होते.