शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
3
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
4
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
5
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो समोर आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
6
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
7
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
8
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
9
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
10
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
11
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
12
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
13
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
14
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
15
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
16
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
17
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
18
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
19
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
20
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

26/11 सारखा हल्ला टळला, दहशतवाद्यांच्या बोटीला जलसमाधी

By admin | Updated: January 2, 2015 19:08 IST

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न असल्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट भारतीय सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे टळला आहे.

ऑनलाइन लोकमत 
अहमदाबाद, दि. 2  - मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न असल्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट भारतीय सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे टळला आहे. अजमल कसाब व त्याच्या साथीदारांनी ज्या प्रकारे भारतात प्रवेश केला त्याच पद्धतीने भारतात घुसखोरी करणारी दहशतवाद्यांची बोट भारतीय तटरक्षक दलाने शुक्रवारी थांबवली. मात्र, वरकरणी मच्छिमारांची बोट वाटत असलेल्या या बोटीवर आत्मघातकी स्फोट घडवण्यात आले आणि त्यानंतरच या बोटीवर प्रचंड स्फोटकांचा साठा व सहा ते सात दहशतवादी होते हे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले. या प्रकारामुळे गुजरात अथवा मुंबईतील बड्या शहरावर २६/११च्या प्रकारचा कट उधळला गेला असल्याच्या अंदाजाला पुष्टी मिळत आहे. शुक्रवारी पहाटे झालेल्या या प्रकारानंतर दहशतवाद्यांसह ही बोट बुडाली असून भारतीय सुरक्षा रक्षक जास्तीत जास्त अवशे, गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर रोजी अशी खबर मिळाली होती की कराची बंदरामधून अरबी समुद्रात भारतविरोधी कारवाया करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी हवाई पाहणी केली असता पोरबंदरपासून ३६५ किलोमीटर अंतरावर सदर बोट दृष्टीपथास आली. तटरक्षक दलाच्या बोटींनी या बोटीचा माग काढला आणि सत्य जाणण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय जवानांच्या हाती सापडू नये म्हणून डाव फसलेल्या अतिरेक्यांनी स्फोट घडवून आणला.
भारतीय जवानांनी बोटीला थांबण्याचा इशारा केल्यानंतर बोटीने पळ काढला आणि सुमारे तासभराच्या पाठलागानंतर भारतीय जवानांच्या हातून सुटका शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर आत्मघातकी मार्ग स्वीकारण्यात आला.. काही वृत्तवाहिन्यांच्या वृत्तानुसार भारतीय सुरक्षारक्षकांनी बोटीवरील दहशतवादी व त्यांचे पाकिस्तानातील हँडलर यांचे टेलीफोनवरील संभाषण ऐकले आणि त्यांना या कटाची पूर्ण कल्पना आली.
बोटीवरील अतिरेक्यांच्या घरी पाच लाख रुपये पोचवण्यात आले असल्याचे तसेच आम्हाला शस्त्रे मिळाली असल्यासारखे संदेश भारतीय सुरक्षा रक्षकांना मिळाले असल्याचे वृत्त आहे, त्यामुळे या बोटीवर दहशतवादीच होते व ते भारतात घातपाती कारवाया करण्यासाठीच घुसत होते हे स्पषट होत असल्याचे तजंज्ञांचे म्हणणे आहे.
२६/११ सारखा भारतावरचा होणार हल्ला टाळण्यात भारतीय सुरक्षा दलांना यश आले असल्याचा दावा संरक्षण तज्ज्ञांनी केला आहे.