शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

26/11 सारखा हल्ला टळला, दहशतवाद्यांच्या बोटीला जलसमाधी

By admin | Updated: January 2, 2015 19:08 IST

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न असल्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट भारतीय सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे टळला आहे.

ऑनलाइन लोकमत 
अहमदाबाद, दि. 2  - मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न असल्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट भारतीय सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे टळला आहे. अजमल कसाब व त्याच्या साथीदारांनी ज्या प्रकारे भारतात प्रवेश केला त्याच पद्धतीने भारतात घुसखोरी करणारी दहशतवाद्यांची बोट भारतीय तटरक्षक दलाने शुक्रवारी थांबवली. मात्र, वरकरणी मच्छिमारांची बोट वाटत असलेल्या या बोटीवर आत्मघातकी स्फोट घडवण्यात आले आणि त्यानंतरच या बोटीवर प्रचंड स्फोटकांचा साठा व सहा ते सात दहशतवादी होते हे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले. या प्रकारामुळे गुजरात अथवा मुंबईतील बड्या शहरावर २६/११च्या प्रकारचा कट उधळला गेला असल्याच्या अंदाजाला पुष्टी मिळत आहे. शुक्रवारी पहाटे झालेल्या या प्रकारानंतर दहशतवाद्यांसह ही बोट बुडाली असून भारतीय सुरक्षा रक्षक जास्तीत जास्त अवशे, गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर रोजी अशी खबर मिळाली होती की कराची बंदरामधून अरबी समुद्रात भारतविरोधी कारवाया करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी हवाई पाहणी केली असता पोरबंदरपासून ३६५ किलोमीटर अंतरावर सदर बोट दृष्टीपथास आली. तटरक्षक दलाच्या बोटींनी या बोटीचा माग काढला आणि सत्य जाणण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय जवानांच्या हाती सापडू नये म्हणून डाव फसलेल्या अतिरेक्यांनी स्फोट घडवून आणला.
भारतीय जवानांनी बोटीला थांबण्याचा इशारा केल्यानंतर बोटीने पळ काढला आणि सुमारे तासभराच्या पाठलागानंतर भारतीय जवानांच्या हातून सुटका शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर आत्मघातकी मार्ग स्वीकारण्यात आला.. काही वृत्तवाहिन्यांच्या वृत्तानुसार भारतीय सुरक्षारक्षकांनी बोटीवरील दहशतवादी व त्यांचे पाकिस्तानातील हँडलर यांचे टेलीफोनवरील संभाषण ऐकले आणि त्यांना या कटाची पूर्ण कल्पना आली.
बोटीवरील अतिरेक्यांच्या घरी पाच लाख रुपये पोचवण्यात आले असल्याचे तसेच आम्हाला शस्त्रे मिळाली असल्यासारखे संदेश भारतीय सुरक्षा रक्षकांना मिळाले असल्याचे वृत्त आहे, त्यामुळे या बोटीवर दहशतवादीच होते व ते भारतात घातपाती कारवाया करण्यासाठीच घुसत होते हे स्पषट होत असल्याचे तजंज्ञांचे म्हणणे आहे.
२६/११ सारखा भारतावरचा होणार हल्ला टाळण्यात भारतीय सुरक्षा दलांना यश आले असल्याचा दावा संरक्षण तज्ज्ञांनी केला आहे.