शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

26/11 सारखा हल्ला टळला, दहशतवाद्यांच्या बोटीला जलसमाधी

By admin | Updated: January 2, 2015 19:08 IST

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न असल्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट भारतीय सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे टळला आहे.

ऑनलाइन लोकमत 
अहमदाबाद, दि. 2  - मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न असल्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट भारतीय सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे टळला आहे. अजमल कसाब व त्याच्या साथीदारांनी ज्या प्रकारे भारतात प्रवेश केला त्याच पद्धतीने भारतात घुसखोरी करणारी दहशतवाद्यांची बोट भारतीय तटरक्षक दलाने शुक्रवारी थांबवली. मात्र, वरकरणी मच्छिमारांची बोट वाटत असलेल्या या बोटीवर आत्मघातकी स्फोट घडवण्यात आले आणि त्यानंतरच या बोटीवर प्रचंड स्फोटकांचा साठा व सहा ते सात दहशतवादी होते हे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले. या प्रकारामुळे गुजरात अथवा मुंबईतील बड्या शहरावर २६/११च्या प्रकारचा कट उधळला गेला असल्याच्या अंदाजाला पुष्टी मिळत आहे. शुक्रवारी पहाटे झालेल्या या प्रकारानंतर दहशतवाद्यांसह ही बोट बुडाली असून भारतीय सुरक्षा रक्षक जास्तीत जास्त अवशे, गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर रोजी अशी खबर मिळाली होती की कराची बंदरामधून अरबी समुद्रात भारतविरोधी कारवाया करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी हवाई पाहणी केली असता पोरबंदरपासून ३६५ किलोमीटर अंतरावर सदर बोट दृष्टीपथास आली. तटरक्षक दलाच्या बोटींनी या बोटीचा माग काढला आणि सत्य जाणण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय जवानांच्या हाती सापडू नये म्हणून डाव फसलेल्या अतिरेक्यांनी स्फोट घडवून आणला.
भारतीय जवानांनी बोटीला थांबण्याचा इशारा केल्यानंतर बोटीने पळ काढला आणि सुमारे तासभराच्या पाठलागानंतर भारतीय जवानांच्या हातून सुटका शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर आत्मघातकी मार्ग स्वीकारण्यात आला.. काही वृत्तवाहिन्यांच्या वृत्तानुसार भारतीय सुरक्षारक्षकांनी बोटीवरील दहशतवादी व त्यांचे पाकिस्तानातील हँडलर यांचे टेलीफोनवरील संभाषण ऐकले आणि त्यांना या कटाची पूर्ण कल्पना आली.
बोटीवरील अतिरेक्यांच्या घरी पाच लाख रुपये पोचवण्यात आले असल्याचे तसेच आम्हाला शस्त्रे मिळाली असल्यासारखे संदेश भारतीय सुरक्षा रक्षकांना मिळाले असल्याचे वृत्त आहे, त्यामुळे या बोटीवर दहशतवादीच होते व ते भारतात घातपाती कारवाया करण्यासाठीच घुसत होते हे स्पषट होत असल्याचे तजंज्ञांचे म्हणणे आहे.
२६/११ सारखा भारतावरचा होणार हल्ला टाळण्यात भारतीय सुरक्षा दलांना यश आले असल्याचा दावा संरक्षण तज्ज्ञांनी केला आहे.