शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

26/11 सारखा हल्ला टळला, दहशतवाद्यांच्या बोटीला जलसमाधी

By admin | Updated: January 2, 2015 19:08 IST

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न असल्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट भारतीय सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे टळला आहे.

ऑनलाइन लोकमत 
अहमदाबाद, दि. 2  - मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न असल्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट भारतीय सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे टळला आहे. अजमल कसाब व त्याच्या साथीदारांनी ज्या प्रकारे भारतात प्रवेश केला त्याच पद्धतीने भारतात घुसखोरी करणारी दहशतवाद्यांची बोट भारतीय तटरक्षक दलाने शुक्रवारी थांबवली. मात्र, वरकरणी मच्छिमारांची बोट वाटत असलेल्या या बोटीवर आत्मघातकी स्फोट घडवण्यात आले आणि त्यानंतरच या बोटीवर प्रचंड स्फोटकांचा साठा व सहा ते सात दहशतवादी होते हे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले. या प्रकारामुळे गुजरात अथवा मुंबईतील बड्या शहरावर २६/११च्या प्रकारचा कट उधळला गेला असल्याच्या अंदाजाला पुष्टी मिळत आहे. शुक्रवारी पहाटे झालेल्या या प्रकारानंतर दहशतवाद्यांसह ही बोट बुडाली असून भारतीय सुरक्षा रक्षक जास्तीत जास्त अवशे, गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर रोजी अशी खबर मिळाली होती की कराची बंदरामधून अरबी समुद्रात भारतविरोधी कारवाया करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी हवाई पाहणी केली असता पोरबंदरपासून ३६५ किलोमीटर अंतरावर सदर बोट दृष्टीपथास आली. तटरक्षक दलाच्या बोटींनी या बोटीचा माग काढला आणि सत्य जाणण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय जवानांच्या हाती सापडू नये म्हणून डाव फसलेल्या अतिरेक्यांनी स्फोट घडवून आणला.
भारतीय जवानांनी बोटीला थांबण्याचा इशारा केल्यानंतर बोटीने पळ काढला आणि सुमारे तासभराच्या पाठलागानंतर भारतीय जवानांच्या हातून सुटका शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर आत्मघातकी मार्ग स्वीकारण्यात आला.. काही वृत्तवाहिन्यांच्या वृत्तानुसार भारतीय सुरक्षारक्षकांनी बोटीवरील दहशतवादी व त्यांचे पाकिस्तानातील हँडलर यांचे टेलीफोनवरील संभाषण ऐकले आणि त्यांना या कटाची पूर्ण कल्पना आली.
बोटीवरील अतिरेक्यांच्या घरी पाच लाख रुपये पोचवण्यात आले असल्याचे तसेच आम्हाला शस्त्रे मिळाली असल्यासारखे संदेश भारतीय सुरक्षा रक्षकांना मिळाले असल्याचे वृत्त आहे, त्यामुळे या बोटीवर दहशतवादीच होते व ते भारतात घातपाती कारवाया करण्यासाठीच घुसत होते हे स्पषट होत असल्याचे तजंज्ञांचे म्हणणे आहे.
२६/११ सारखा भारतावरचा होणार हल्ला टाळण्यात भारतीय सुरक्षा दलांना यश आले असल्याचा दावा संरक्षण तज्ज्ञांनी केला आहे.