शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
3
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
4
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
5
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
6
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
7
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
8
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
9
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
10
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
11
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
13
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
14
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
15
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
16
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
17
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
18
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
19
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
20
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा

काँग्रेसचे २५ खासदार लोकसभेतून निलंबित

By admin | Updated: August 3, 2015 23:44 IST

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गेले दोन आठवडे

नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गेले दोन आठवडे संसदेच्या कामकाजाचा खोळंबा झाला असताना सोमवारी काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणा लिहिलेले फलक दाखवत जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी या पक्षाच्या २५ सदस्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्याची घोषणा केली. सभागृहाच्या कामकाजात सातत्याने आणि हेतूपुरस्सर अडथळे आणणाऱ्या काँग्रेसच्या २५ सदस्यांना या आठवड्याच्या उर्वरित काळासाठी (५ दिवस) नियम ३७४ (अ) नुसार निलंबित करण्यात येत असून त्यांना सभागृहाच्या पाच बैठकींना उपस्थित राहता येणार नाही, असा आदेश महाजन यांनी दिला. हेतूपुरस्सर कामकाज रोखले जात असेल तर नियम ३७३ आणि ३७४ चा वापर केला जातो. नियमांवर बोट ठेवत अध्यक्षांनी कारवाई केली. राज्यसभेत गदारोळआयपीएलचे माजी घोटाळेबाज प्रमुख ललित मोदी यांना प्रवासासाठी दस्तऐवज देण्याबाबत मी ब्रिटनला कोणतीही विनंती केली नव्हती, असे विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत निवेदन देताना म्हटले. ललित मोदींना दस्तऐवज दिल्याबाबत विरोधकांनी केलेले आरोप निराधार असून त्यात काहीही तथ्य नाही, एवढीच वाक्ये त्या गदारोळात बोलू शकल्या. काँग्रेस सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत त्यांचे निवेदन हाणून पाडले. स्वराज यांचे निवेदन बेकायदेशीर असल्याने ते संसदेच्या कामकाजातून काढून टाकावे, अशी मागणी काँग्रेसने केली. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज ठप्प झाले.दरम्यान, जबाबदारी निश्चित करण्याबाबत पंतप्रधान उत्तर देणार नाहीत तोवर हीच परिस्थिती राहील, असे काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी म्हटले. त्यांनी नियम २६७ अन्वये कामकाजाचा तास निलंबित ठेवून चर्चा सुरू करण्याची मागणी केली होती, मात्र सभापतींनी चर्चा सुरू झाल्याखेरीज पंतप्रधान उत्तर देऊ शकणार नाहीत, असे सांगितले. त्यावर सभागृहाचे नेते अरुण जेटली यांनी काँग्रेसची चर्चा सुरू करण्याची इच्छा नसेल तर स्वराज यांनी निवेदन देऊन चर्चा सुरू करावी, असे स्पष्ट केले. मी एक दिवस आधीच जेटली यांच्यामार्फत सर्व आरोपांना प्रत्युत्तर देण्याची तयारी दर्शविली होती, असे स्वराज म्हणाल्या.(लोकमत न्यूज नेटवर्क)