शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
5
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
6
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
7
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
8
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
9
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
10
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
11
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
12
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
13
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
14
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
15
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
16
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
17
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
18
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
19
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
20
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे २५ खासदार लोकसभेतून निलंबित

By admin | Updated: August 3, 2015 23:44 IST

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गेले दोन आठवडे

नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गेले दोन आठवडे संसदेच्या कामकाजाचा खोळंबा झाला असताना सोमवारी काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणा लिहिलेले फलक दाखवत जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी या पक्षाच्या २५ सदस्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्याची घोषणा केली. सभागृहाच्या कामकाजात सातत्याने आणि हेतूपुरस्सर अडथळे आणणाऱ्या काँग्रेसच्या २५ सदस्यांना या आठवड्याच्या उर्वरित काळासाठी (५ दिवस) नियम ३७४ (अ) नुसार निलंबित करण्यात येत असून त्यांना सभागृहाच्या पाच बैठकींना उपस्थित राहता येणार नाही, असा आदेश महाजन यांनी दिला. हेतूपुरस्सर कामकाज रोखले जात असेल तर नियम ३७३ आणि ३७४ चा वापर केला जातो. नियमांवर बोट ठेवत अध्यक्षांनी कारवाई केली. राज्यसभेत गदारोळआयपीएलचे माजी घोटाळेबाज प्रमुख ललित मोदी यांना प्रवासासाठी दस्तऐवज देण्याबाबत मी ब्रिटनला कोणतीही विनंती केली नव्हती, असे विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत निवेदन देताना म्हटले. ललित मोदींना दस्तऐवज दिल्याबाबत विरोधकांनी केलेले आरोप निराधार असून त्यात काहीही तथ्य नाही, एवढीच वाक्ये त्या गदारोळात बोलू शकल्या. काँग्रेस सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत त्यांचे निवेदन हाणून पाडले. स्वराज यांचे निवेदन बेकायदेशीर असल्याने ते संसदेच्या कामकाजातून काढून टाकावे, अशी मागणी काँग्रेसने केली. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज ठप्प झाले.दरम्यान, जबाबदारी निश्चित करण्याबाबत पंतप्रधान उत्तर देणार नाहीत तोवर हीच परिस्थिती राहील, असे काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी म्हटले. त्यांनी नियम २६७ अन्वये कामकाजाचा तास निलंबित ठेवून चर्चा सुरू करण्याची मागणी केली होती, मात्र सभापतींनी चर्चा सुरू झाल्याखेरीज पंतप्रधान उत्तर देऊ शकणार नाहीत, असे सांगितले. त्यावर सभागृहाचे नेते अरुण जेटली यांनी काँग्रेसची चर्चा सुरू करण्याची इच्छा नसेल तर स्वराज यांनी निवेदन देऊन चर्चा सुरू करावी, असे स्पष्ट केले. मी एक दिवस आधीच जेटली यांच्यामार्फत सर्व आरोपांना प्रत्युत्तर देण्याची तयारी दर्शविली होती, असे स्वराज म्हणाल्या.(लोकमत न्यूज नेटवर्क)