शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

२५ मिनिटात तीन सभा मनपा: तहकुब सभा घेतल्या पण आटोपत्या

By admin | Updated: December 23, 2015 23:57 IST

जळगाव : सफाई मक्त्याच्या वादानंतर दोन वेळा तहकूब झालेली महापालिका स्थायी समितीची सभा बुधवारी झाली मात्र तीन सभांचे कामकाज अवघ्या २५ मिनिटात आटोपले गेले.

जळगाव : सफाई मक्त्याच्या वादानंतर दोन वेळा तहकूब झालेली महापालिका स्थायी समितीची सभा बुधवारी झाली मात्र तीन सभांचे कामकाज अवघ्या २५ मिनिटात आटोपले गेले.
महापालिका स्थायी समितीची २० नोव्हेंबर रोजीची सभा सफाई मक्त्याच्या विषयावरून वादग्रस्त ठरली होती. प्रशासनाकडून शहराच्या सफाई सारख्या विषयावर गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने स्थायी सदस्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. यानंतर जोपर्यंत सफाई मक्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सभेत न बसण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला होता. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी स्थायी समितीची सभा बोलविण्यात आली होती. या सभेतही प्रभाग निहाय सफाई कामाचा ठेका देण्याचा विषय आला नाही. त्यामुळे स्थायी सदस्य नितीन ल‹ा व अन्य सदस्य संतप्त झाले. नाराजी व्यक्त करत सदस्यांनी या सभेतूनही बहिर्गमन केले होते. त्यानंतर सफाई मक्त्याचा विषय प्रशासनाने गांभीर्याने घेऊन तो मार्गी लावला. त्यानंतर बुधवारी २३ रोजी दोन वेळा तहकूब झालेली व नियमित सभा सभापती नितीन बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिण्यात आली होती.
विषयांना फारसा विरोध नाहीच
सभेत २० नोव्हेंबर व ११ डिसेंबर रोजी तहकूब झालेल्या विषयांचे वाचन नगरसचिव निरंजन सैंदाणे यांनी केले. त्याला तातडीने मंजुरी देण्यात आली. प्रारंभी सात प्रशासकीय प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. त्यानंतर नियमित पाच विषय मंजूर करण्यात आले. यानंतर २३ च्या नियमित सभेला सुरुवात झाली. तीत सहा विषय चर्चेला होते. त्यांनाही मंजुरी देण्यात आली. जलशद्धीकरणासाठी लागणार्‍या पिवळ्या तुरटीच्या विषयावर तिच्या दर्जाविषयी पृथ्वीराज चव्हाण यांनी शंका उपस्थित करून तो नियमित तपासला जावा अशा सूचना केल्या. यावर डी.एस. खडके यांनी तशी तपासणी होत असल्याचे स्पष्ट केले.
-----
भोसलेंचा विषय तहकूब
मनपातील तत्कालीन प्रभाग अधिकारी दिनकर भोसले यांच्यावरील गुरांचे चामडे प्रकरणातील आक्षेपांवरून त्यांच्या दोन वेतनवाढी कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. त्यावर त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ च्या तरतुदीचा आधार घेत स्थायी समितीपुढे अपिल केले आहे. मात्र सविस्तर चौकशी अहवाल सादर होईपर्यंत हा विषय घेऊ नये असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचविल्यानंतर हा विषय तहकूब ठेवला जावा अशा सूचना सभापती बरडे यांनी दिल्या.
----