शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

इंजिनियरिंगचे २४ विद्यार्थी वाहून गेले

By admin | Updated: June 9, 2014 03:26 IST

हैदराबादच्या एका इंजिनियरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हिमाचल प्रदेशची सहल जीवावर बेतली

सिमला/ मंडी : हैदराबादच्या एका इंजिनियरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हिमाचल प्रदेशची सहल जीवावर बेतली. रविवारी संध्याकाळी मंडीपासून ४० कि.मी. अंतरावर मनाली- किरतपूर राष्ट्रीय महामार्गावर बियास नदीच्या काठावर छायाचित्रे टिपण्याचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा लोंढा आल्याने किमान २४ विद्यार्थी वाहून गेले. लार्जी येथील १२६ मेगावॅटच्या जलविद्युत प्रकल्पातून अचानक पाणी सोडण्यात आल्याने ही दुर्घटना घडली.मृतांमध्ये १८ विद्यार्थी आणि सहा विद्यार्थिनींचा समावेश आहे. नदीत पाणी सोडताना प्रकल्प अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने हा प्रसंग ओढवला. नदीतील पाण्याची पातळी आणि प्रवाहाचा वेग वाढला होता. या दुर्घटनेनंतर संतप्त लोकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून निदर्शने केली. बेपत्ता विद्यार्थ्यांच्या शोधासाठी रात्री मोहीम सुरू करण्यात आली मात्र अंधार असल्यामुळे मदतकार्यात बाधा निर्माण झाली. बेपत्ता विद्यार्थी जिवंत सापडण्याची आशा अंधूक झाली आहे.पाणबुड्यांची मदत घेतली जात आहे. नदीच्या काठावर न गेलेले उर्वरित २० विद्यार्थी बचावले मात्र आपल्या मित्रांवर ओढवलेल्या दुर्दैवी प्रसंगाने त्यांना जबर धक्का बसला आहे. बेपत्ता विद्यार्थ्यांबाबत माहिती घेतली जात आहे, असे हिमाचलचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एस.आर. मार्डी यांनी सांगितले. या घटनेमुळे देशभरात टिका होत असतांनाच सर्व स्तरातून दु;ख सुध्दा व्यक्त होत आहे.