शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
6
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
7
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
8
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
9
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
10
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
11
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
12
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
13
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
14
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
15
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
16
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
18
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
19
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
20
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

ऑगस्टच्या अतिवृष्टीचा २२८ गावांना फटका, १६ हजार हेक्टरचे नुकसान

By admin | Updated: August 16, 2016 22:46 IST

शासनाला प्रस्ताव सादर : शेतकर्‍यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

शासनाला प्रस्ताव सादर : शेतकर्‍यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षानाशिक : जिल्‘ात १ ते ४ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्‘ातील २२८ गावांमधील ३२ हजार ९४२ शेतकर्‍यांच्या १६ हजार ३८५ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. तसा नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.दरम्यान, शासनाला नुकसानभरपाईचा प्रस्ताव सादर केल्यानंतर आता ३२ हजार शेतकर्‍यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा लागली आहे. अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान इगतपुरी व सुरगाणा तालुक्यातील भात पिकाचे झाले आहे.ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्‘ात अतिवृष्टीमुळे अनेक गावांना फटका बसला होता. बागलाण तालुक्यात ३५, कळवण- ५७, नाशिक- ४२, इगतपुरी- १०, चांदवड- ४ अशा एकूण २२८ गावांमधील ३२ हजार ९४२ शेतकर्‍यांना फटका बसला होता. त्यात भात पिकाची सर्वाधिक लागवड झालेल्या त्र्यंबकेश्वर व सुरगाणा तालुक्यातील भात पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यात सुरगाणा तालुक्यात २५ हजार २३७ शेेतकर्‍यांच्या ३८७६ हेक्टरवरील भात, सोयाबीन यांसह अन्य पिके मिळून सुमारे ४५२२ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच इगतपुरी तालुक्यातील १० गावांमध्ये ५ हजार २०९ शेतकर्‍यांच्या २६६० हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचे तसेच वरई, भाजीपालासह अन्य पिकांचे मिळून ३४०६ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. कळवण तालुक्यातील ५७ गावांमधील १५११ शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. तसेच बागलाण, त्र्यंबकेश्वर, चांदवड आदि तालुक्यातही अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर केला आहे. आता शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळण्याची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)