शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

२२ हजार कि.मी. लांबीच्या महामार्गांच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव

By admin | Updated: October 3, 2015 11:54 IST

पाच वर्षांमध्ये देशभरातील २२ हजार किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे चौपदरीकरण करण्याचा चार लाख कोटी रुपयांचा प्रस्ताव रस्ते वाहतूक मंत्रालयाने बनवला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - येत्या पाच वर्षांमध्ये देशभरातील २२ हजार किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे चौपदरीकरण करण्याचा चार लाख कोटी रुपयांचा प्रस्ताव रस्ते वाहतूक मंत्रालयाने बनवला असून तो मंत्रीमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. दुपदरी मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी सध्याच्या धोरणानुसार दरदिवशी १५ हजार गाड्या त्या मार्गावर धावणे अनिवार्य आहे. ही मर्यादा १० हजारांवर आणण्याचा आणि जास्त लांबीचे महामार्ग चौपदरी करण्याचा सरकारचा विचार आहे.
यामुळे सध्याच्या रस्त्यांची स्थिती सुधारेल आणि देशभरातील विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे, असे एका उच्चपदस्थ अधिका-याने सांगितल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. 
सध्या राष्ट्रीय महामार्गांच जाळं एक लाख किलोमीटर्सचे आहे. म्हणजे जवळपास एक पंचमांश जाळ्याचे चौपदरीकरण करण्याचा हा प्रस्ताव आहे. 
गेल्या १५ वर्षांमध्ये ४८ हजार किलोमीटर लांबीच्या महामार्गांचा स्तर वाढवण्यात आला असून या कामाला आणखी गती देण्याचा रस्ते वाहतूक खात्याचा प्रयत्न आहे. केवळ रस्त्याची लांबी वाढवू नका, तर दर्जाही सुधारा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचे सांगण्यात आले. 
त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचं जाळं ५० हजार किलोमीटरने वाढवणार आणि अस्तित्वात असलेल्या २२ हजार किलोमीटर दुपदरी मार्गाचं चौपदरीकरण करणार अशी ही योजना आहे. या महत्त्वांकाक्षी योजनांचं यश त्यासाठी लागणा-या प्रचंड निधीचा विचार करता खासगी गुंतवणुकीवर अवलंबून असेल असं एका अधिका-याने सांगितले.