शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

२२ हजार कि.मी. लांबीच्या महामार्गांच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव

By admin | Updated: October 3, 2015 11:54 IST

पाच वर्षांमध्ये देशभरातील २२ हजार किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे चौपदरीकरण करण्याचा चार लाख कोटी रुपयांचा प्रस्ताव रस्ते वाहतूक मंत्रालयाने बनवला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - येत्या पाच वर्षांमध्ये देशभरातील २२ हजार किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे चौपदरीकरण करण्याचा चार लाख कोटी रुपयांचा प्रस्ताव रस्ते वाहतूक मंत्रालयाने बनवला असून तो मंत्रीमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. दुपदरी मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी सध्याच्या धोरणानुसार दरदिवशी १५ हजार गाड्या त्या मार्गावर धावणे अनिवार्य आहे. ही मर्यादा १० हजारांवर आणण्याचा आणि जास्त लांबीचे महामार्ग चौपदरी करण्याचा सरकारचा विचार आहे.
यामुळे सध्याच्या रस्त्यांची स्थिती सुधारेल आणि देशभरातील विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे, असे एका उच्चपदस्थ अधिका-याने सांगितल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. 
सध्या राष्ट्रीय महामार्गांच जाळं एक लाख किलोमीटर्सचे आहे. म्हणजे जवळपास एक पंचमांश जाळ्याचे चौपदरीकरण करण्याचा हा प्रस्ताव आहे. 
गेल्या १५ वर्षांमध्ये ४८ हजार किलोमीटर लांबीच्या महामार्गांचा स्तर वाढवण्यात आला असून या कामाला आणखी गती देण्याचा रस्ते वाहतूक खात्याचा प्रयत्न आहे. केवळ रस्त्याची लांबी वाढवू नका, तर दर्जाही सुधारा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचे सांगण्यात आले. 
त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचं जाळं ५० हजार किलोमीटरने वाढवणार आणि अस्तित्वात असलेल्या २२ हजार किलोमीटर दुपदरी मार्गाचं चौपदरीकरण करणार अशी ही योजना आहे. या महत्त्वांकाक्षी योजनांचं यश त्यासाठी लागणा-या प्रचंड निधीचा विचार करता खासगी गुंतवणुकीवर अवलंबून असेल असं एका अधिका-याने सांगितले.