शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

२२... मालेवाडा... कर्जवसुली

By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST

दुष्काळी परिस्थितीत पीककर्ज वसुलीचा तगादा

दुष्काळी परिस्थितीत पीककर्ज वसुलीचा तगादा
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक : शेतकऱ्यांना बजावल्या नोटीस
मालेवाडा : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेतीचा खर्च आणि प्रपंच चालविणे कठीण झाले आहे. त्यातच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीककर्ज वसुलीसाठी संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. सदर कर्जाची परतफेड १५ दिवसांच्या आत न केल्यास कारवाई करण्याचा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
भिवापूर तालुक्यातील मालेवाडा व परिसरातील शेतकऱ्यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जवळी शाखेतून पीककर्जाची उचल केली होती. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आजवर सदर बँकेकडून घेतलेल्या पीककर्जाचा नियमित भरणा केला आहे. गेल्या खरीप हंगामात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काही तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप केले नाही. ऐन पेरणीच्या काळात ही परिस्थिती उद्भवल्याने शेतकऱ्यांनी या बँकेकडून घेतलेल्या पीककर्जाची परतफेड केली. पीककर्जाचा भरणा केल्यानंतर नव्याने कर्ज मिळण्याची शाश्वती नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी हातचा पैसा सोडला नाही.
काही शेतकऱ्यांनी यातून मार्ग काढत अन्य राष्ट्रीयीकृत बँकांकडून तर काहींनी सावकारांकडून कर्जाची उचल केली. यावर्षी प्रतिकूल वातावरणामुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले. कमी उत्पादन होऊनही सोयाबीनला कमी भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी व मिरचीकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यातच कपाशीवर लाल्या आणि मिरचीवर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने दोन्ही पिके उद्ध्वस्त झालीत. भिवापूर तालुक्यातील सोयाबीन, कपाशी व मिरची शिवाय तिसरे कोणतेही प्रमुख घेतले जात नसल्याने तसेच या तिन्ही पिकांवर प्रतिकूल वातारणाचा विपरीत परिणाम झाल्याने शेतातून घरी आलेल्या या पिकांचा उत्पादनखर्चही भरून निघाला नाही. कापसालाही यंदा चांगला भाव मिळत नाही.
पावसाच्या लपंडावामुळे यावर्षी भिवापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. यातून सावरत शेतकऱ्यांनी पेरणी करून पिकांची चांगली मशागत केली. मात्र, समाधानकारक पीक हाती आले नाही. त्यात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटीस पाठविल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. वास्तवात, भिवापूर तालुक्यात यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी पैसेवारीची (आणेवारी) अट आडवी येत असून,