शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

२२... मालेवाडा... कर्जवसुली

By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST

दुष्काळी परिस्थितीत पीककर्ज वसुलीचा तगादा

दुष्काळी परिस्थितीत पीककर्ज वसुलीचा तगादा
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक : शेतकऱ्यांना बजावल्या नोटीस
मालेवाडा : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेतीचा खर्च आणि प्रपंच चालविणे कठीण झाले आहे. त्यातच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीककर्ज वसुलीसाठी संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. सदर कर्जाची परतफेड १५ दिवसांच्या आत न केल्यास कारवाई करण्याचा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
भिवापूर तालुक्यातील मालेवाडा व परिसरातील शेतकऱ्यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जवळी शाखेतून पीककर्जाची उचल केली होती. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आजवर सदर बँकेकडून घेतलेल्या पीककर्जाचा नियमित भरणा केला आहे. गेल्या खरीप हंगामात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काही तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप केले नाही. ऐन पेरणीच्या काळात ही परिस्थिती उद्भवल्याने शेतकऱ्यांनी या बँकेकडून घेतलेल्या पीककर्जाची परतफेड केली. पीककर्जाचा भरणा केल्यानंतर नव्याने कर्ज मिळण्याची शाश्वती नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी हातचा पैसा सोडला नाही.
काही शेतकऱ्यांनी यातून मार्ग काढत अन्य राष्ट्रीयीकृत बँकांकडून तर काहींनी सावकारांकडून कर्जाची उचल केली. यावर्षी प्रतिकूल वातावरणामुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले. कमी उत्पादन होऊनही सोयाबीनला कमी भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी व मिरचीकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यातच कपाशीवर लाल्या आणि मिरचीवर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने दोन्ही पिके उद्ध्वस्त झालीत. भिवापूर तालुक्यातील सोयाबीन, कपाशी व मिरची शिवाय तिसरे कोणतेही प्रमुख घेतले जात नसल्याने तसेच या तिन्ही पिकांवर प्रतिकूल वातारणाचा विपरीत परिणाम झाल्याने शेतातून घरी आलेल्या या पिकांचा उत्पादनखर्चही भरून निघाला नाही. कापसालाही यंदा चांगला भाव मिळत नाही.
पावसाच्या लपंडावामुळे यावर्षी भिवापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. यातून सावरत शेतकऱ्यांनी पेरणी करून पिकांची चांगली मशागत केली. मात्र, समाधानकारक पीक हाती आले नाही. त्यात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटीस पाठविल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. वास्तवात, भिवापूर तालुक्यात यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी पैसेवारीची (आणेवारी) अट आडवी येत असून,