शेतकरी आत्महत्येचे २२ प्रकरणे अपात्र
By admin | Updated: April 14, 2016 00:53 IST
जळगाव- कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केलेल्या २९ शेतकर्यांच्या वारसांनी मदतीसाठी दाखल केलेल्या प्रस्तावापैकी २२ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, वसंतराव महाजन उपस्थित होते. समितीपुढे २९ प्रकरणे ठेवण्यात आली. त्यात सहा प्रकरणे पात्र करण्यात आली. २२ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली तर एक प्रकरण फेरचौकशीसाठी पाठविण्यात आले.
शेतकरी आत्महत्येचे २२ प्रकरणे अपात्र
जळगाव- कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केलेल्या २९ शेतकर्यांच्या वारसांनी मदतीसाठी दाखल केलेल्या प्रस्तावापैकी २२ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, वसंतराव महाजन उपस्थित होते. समितीपुढे २९ प्रकरणे ठेवण्यात आली. त्यात सहा प्रकरणे पात्र करण्यात आली. २२ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली तर एक प्रकरण फेरचौकशीसाठी पाठविण्यात आले.