शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

2020 पर्यंत वन्यप्राण्यांची संख्या 67 टक्क्यांनी घटणार

By admin | Updated: October 27, 2016 15:45 IST

मानवी हस्तक्षेपामुळे 1970 ते 2020 या काळात जगभरातील वन्य प्राण्यांची एकूण संख्येत 67 टक्क्यांनी घट होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत
 नवी दिल्ली, दि. 27 - बेसुमार जंगलतोड, वाढते प्रदूषण, अवैध शिकार आणि मानवी अतिक्रमण यामुळे गेल्या काही काळापासून वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मानवी हस्तक्षेपामुळे 1970 ते 2020 या काळात जगभरातील वन्य प्राण्यांची एकूण संख्येत 67 टक्क्यांनी घट होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंडच्या लिव्हिंग प्लॅनेट या अहवालामधून ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. 
1970 ते 2012 या काळात जगभरातील मासे, पक्षी, सस्तन प्राणी, उभयचर आणि सरीसृप प्राण्यांची एकूण संख्या 58 टक्क्यांनी घटल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या अर्धशतकापासून वन्य प्राण्यांची संख्या सातत्याने घटत असून 2020 पर्यंत वन्यजिवांची संख्या दोन तृतियांशने घटण्याची भीती या अहवालामधून व्यक्त करण्यात आली आहे.  
मानवी हस्तक्षेपाचे पृथ्वीवर होत असलेले दुष्परिणाम  या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले असून, त्यात बदल होण्याची गरज असल्याचेही मत मांडण्यात आले आहे. तसेच मानवी हस्तक्षेपाचा वन्यजिवांच्या अधिवासावर थेट परिणाम होत असल्याची माहिती अहवालातून देण्यात आली आहे. 
"संशोधकांनी या काळाला याआधीच अँथ्रोपोसिन असे नाव दिले आहे. ज्या काळात मानवाकडून होणाऱ्या कृतींमुळे जागतिक तापमान आणि पर्यावरणात बदल होणार आहे,"असेही या अहवालात म्हटले आहे.   
('ब्रिक्स' पर्यावरण परिषदेत वायू, जल प्रदूषणावर चिंता)
(वाघांसाठी सुरक्षित 'कॉरिडोर'चा शोध, भारतीय वन्यजीव संस्थेकडून सर्वेक्षण)