शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

2020 पर्यंत वन्यप्राण्यांची संख्या 67 टक्क्यांनी घटणार

By admin | Updated: October 27, 2016 15:45 IST

मानवी हस्तक्षेपामुळे 1970 ते 2020 या काळात जगभरातील वन्य प्राण्यांची एकूण संख्येत 67 टक्क्यांनी घट होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत
 नवी दिल्ली, दि. 27 - बेसुमार जंगलतोड, वाढते प्रदूषण, अवैध शिकार आणि मानवी अतिक्रमण यामुळे गेल्या काही काळापासून वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मानवी हस्तक्षेपामुळे 1970 ते 2020 या काळात जगभरातील वन्य प्राण्यांची एकूण संख्येत 67 टक्क्यांनी घट होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंडच्या लिव्हिंग प्लॅनेट या अहवालामधून ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. 
1970 ते 2012 या काळात जगभरातील मासे, पक्षी, सस्तन प्राणी, उभयचर आणि सरीसृप प्राण्यांची एकूण संख्या 58 टक्क्यांनी घटल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या अर्धशतकापासून वन्य प्राण्यांची संख्या सातत्याने घटत असून 2020 पर्यंत वन्यजिवांची संख्या दोन तृतियांशने घटण्याची भीती या अहवालामधून व्यक्त करण्यात आली आहे.  
मानवी हस्तक्षेपाचे पृथ्वीवर होत असलेले दुष्परिणाम  या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले असून, त्यात बदल होण्याची गरज असल्याचेही मत मांडण्यात आले आहे. तसेच मानवी हस्तक्षेपाचा वन्यजिवांच्या अधिवासावर थेट परिणाम होत असल्याची माहिती अहवालातून देण्यात आली आहे. 
"संशोधकांनी या काळाला याआधीच अँथ्रोपोसिन असे नाव दिले आहे. ज्या काळात मानवाकडून होणाऱ्या कृतींमुळे जागतिक तापमान आणि पर्यावरणात बदल होणार आहे,"असेही या अहवालात म्हटले आहे.   
('ब्रिक्स' पर्यावरण परिषदेत वायू, जल प्रदूषणावर चिंता)
(वाघांसाठी सुरक्षित 'कॉरिडोर'चा शोध, भारतीय वन्यजीव संस्थेकडून सर्वेक्षण)