शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

भाजपाची २०१९ची तयारी

By admin | Updated: March 17, 2017 01:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना तरुणांमध्ये जा, असे सांगून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत २०१९च्या लोकसभा निवडणुकीची जणू तयारीच केली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना तरुणांमध्ये जा, असे सांगून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत २०१९च्या लोकसभा निवडणुकीची जणू तयारीच केली. ना मै बैठुंगा, ना बैठने दुंगा, असे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला नुसते बसलेले मी पाहणार नाही, असा जणू इशाराच दिला. पुढील दोन वर्षे अधिक जोमाने काम करणे गरजेचे असून, सतत मतदारांशी संपर्क साधणे, त्यांचे प्रश्न सोडविणे आणि सर्व समाजघटकांना एकत्र आणणे हे करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या.डिजिटल पेमेंट अ‍ॅप्लिकेशनसाठी ‘भिम अ‍ॅप’च्या वापराला प्रोत्साहन मिळावे म्हणून पक्षाच्या नेत्यांनी आठवडाभर काम करावे, लोकांना त्याची माहिती द्यावी, प्रशिक्षित करावे व त्यांना ते अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी सर्व खासदारांना केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशभरातील अनुयायांना भाजपाकडे आकर्षित करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.डॉ. आंबेडकरांचे काम आणि त्यांच्या योगदानाची प्रसिद्धी करा, असेही मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या लोककल्याण कामांचे आणि उत्तम प्रशासनाचे तरुणांना सदिच्छा दूत (अ‍ॅम्बेसडर्स) बनवा, असे आवाहन करून मोदी म्हणाले की, तरुण पिढी माहिती मिळवण्यासाठी वर्तमानपत्रांपेक्षाही मोबाइल फोन्स आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी याच माध्यमांचा वापर करणे आवश्यक आहे. तरुण पिढी जेव्हा १२वीच्या वर्गात असते, त्याचवेळी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही ते म्हणाले.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत पक्षाला मिळालेले यश हे लोकांनी जातियवाद, एकाच कुटुंबाची सत्ता आणि भ्रष्टाचाराविरोधात यामुळे आहे. लोककल्याण आणि उत्तम प्रशासनाचा कार्यक्रम राबवला जात असलेल्या मोदींच्या नेतृत्वाला दिलेला कौल आहे, असे अमित शाह म्हणाले. २०१४मध्ये लोकसभा निवडणुकातील पक्षाच्या विजयानंतर नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका या पक्षासमोर मोठे आव्हान होत्या, असे सांगून शाह म्हणाले की, दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकादेखील असेच मोठे आव्हान आहे. पक्षाच्या नेत्यांनी त्यासाठी तयारी करावी. केंद्र सरकारने राबविलेल्या लोककल्याणाच्या योजना आणि नोटाबंदीसारख्या धाडसी निर्णयाला लोकांनी पाठिंबा दिल्याचेच भाजपाच्या विजयातून दिसते, असा दावा शाह यांनी केला. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह म्हणाले की, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील उत्साहवर्धक यशानंतर लोकसभेच्या निवडणुका या पक्षासमोर मोठे आव्हान आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरची भाजपाच्या संसदीय पक्षाची ही पहिलीच बैठक होती. मतदारांचे आभार आणि विजयाचा आनंद साजरा करताना पक्षाच्या प्रवासाचा मार्ग तयार करण्याचा उद्देश या बैठकीचा होता.नुकत्याच उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत लक्षणीय संख्येने दलितांनी भाजपाला मते दिल्याचे मानले जाते. दलितांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने पक्षाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून (१४ एप्रिल) आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करायचे ठरवले आहे. प्रत्येक पंचायत आणि वॉर्डात पक्ष आठवडाभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करील. याशिवाय पक्षाच्या स्थापना दिनी (६ एप्रिल) नेते आणि कार्यकर्ते ‘स्वच्छ भारत’ मोहिमेत सहभागी होतील.