शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

रेल्वे बनवणार ताशी २०० कि.मी. वेगाने धावणारे कोच

By admin | Updated: February 9, 2015 00:35 IST

ताशी २०० कि.मी. वेगाने धावणारे रेल्वे कोच बनविण्याची तयारी रेल्वेने चालवली आहे़ चेन्नई येथील आपल्या कारखान्यात रेल्वेने या दिशेने काम सुरू केले

राजीव मुळ्ये-बेळगावात मराठी नाट्य संमेलन आयोजित करीत असताना कर्नाटकाच्या पोलिसांनी लादलेल्या जाचक अटी ही घटनात्मक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी केली. शरद पवार यांनी ‘जय महाराष्ट्र’ शब्द का गिळला, असा सवालही त्यांनी यावेळी केला.९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे सूप रविवारी सायंकाळी वाजले. समारोप समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना रावते यांनी अपेक्षेप्रमाणे मराठी अस्मितेचा मुद्दा लावून धरला. मराठी माणसाचा हुंकार थांबविण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने केला असून, मराठी माणूस कधीच झुकणार नाही. एका राज्याच्या मंत्र्याला दुसऱ्या राज्यात दौरा करताना त्या राज्याकडून मिळणाऱ्या सेवा या दौऱ्यात आपण नाकारल्या आहेत, असे रावते यांनी जाहीर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.संमेलन नगरीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ते म्हणाले, ‘‘कलावंतांच्या सरकारकडून अनेक अपेक्षा आहेत. हे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना संमेलनाच्या उद्घाटनावेळी आठवले; परंतु गेली १५ वर्षे त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांनी काय केले? स्व:त:चे पाकीट शाबूत ठेवून दुसऱ्याच्या खिशात हात घालण्याची सवय असली की असेच होते’’, असा टोलाही त्यांनी लगावला.सात दिवसांत सात नाटकांचा महोत्सव करण्याची परंपरा ग्रामीण भागात पोहोचविता येईल का, याचा रंगकर्मींनी विचार करावा, शासन त्यांना सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही रावते यांनी दिले. भाषणाच्या शेवटी हुतात्मा दिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांना दोन मिनिटे उभे राहण्याची विनंती त्यांनी केली. तसेच अखंड, संपूर्ण जय महाराष्ट्र, असा घोष करून भाषणाची सांगताकेली. कारवाईच्या भीतीने उद्धवची दांडी?महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून काही बोलाल तर कारवाई करु, असा इशारा कर्नाटक पोलिसांनी दिल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेळगावला जाण्याचे टाळले, अशी चर्चा शिवसेनेच्याच वर्तुळात सुरु आहे. / वृत्त ५‘जय महाराष्ट्र’ का वगळले : पवार यांच्या भाषणाचा ‘बाईट’ माझ्याकडे असून, भाषणाच्या शेवटी ‘जय हिंद’ म्हटल्यावर ‘जय महाराष्ट्र’ जाणीवपूर्वक का वगळले, असा सवाल त्यांनी केला. त्याचसोबत ‘जय कर्नाटक’ म्हटले तरी चालले असते, असेही त्यांनी नमूद केले.