शहरं
Join us  
Trending Stories
1
उंदराला मांजर साक्ष! ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणारे डॉक्टर गंभीर प्रकरणांत अडकलेले; माजी सनदी अधिकाऱ्यांचा आक्षेप
2
मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले
3
Fact Check : "अबकी बार 400 पार..."; असं म्हणणाऱ्या व्यक्तीचा 'तो' व्हायरल Video स्क्रिप्टेड
4
जूनपासून मान्सून बरसणार, पण या 7 राज्यांत कमी पाऊस पडणार - IMD ची भविष्यवाणी!
5
LIC Q4 Results: प्रॉफिट, इन्कम, डिविडेंड... कसं आहे LIC चं चौथ्या तिमाहीचं रिपोर्टकार्ड? किती झाला नफा, किती पॉलिसींची झाली विक्री? पाहा
6
Yogi Adityanath : "हा विरोधकांचा प्रोपगंडा, तसंही मी एक..."; मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याबाबत योगींची पहिली प्रतिक्रिया
7
Panchayat 3 : 'पंचायत 3'च्या मेकर्सला मोठा झटका! वेब सीरीज रिलीज होताच ऑनलाईन झाली Leaked
8
अयोध्येतील आणखी १२५ मंदिरांचा जीर्णोद्धार केला जाणार; राम मंदिराचे कामही लवकरच पूर्णत्वाकडे
9
मी डिप्रेशनमध्ये गेलेलो! सेक्स स्कँडलनंतर पहिल्यांदाच प्रज्वल रेवन्ना समोर आले; हजर होण्याची तारीख दिली...
10
Gold Silver Price: सोनं खरेदी करणार आहात? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण!
11
Team India Head Coach : ३००० अर्ज... मुख्य प्रशिक्षकपदासाठी मोदी, शाह, धोनी, सचिन अशीही नावं; BCCI ची डोकेदुखी वाढली
12
'लाल' बादशाह फ्रेंच ओपनमधून बाहेर; हा शेवटचा सामना असेल तर..., राफेल नदाल भावूक
13
Dharavi fire: धारावीत अग्नितांडव, फर्निचर गोदाम खाक; ६ जण जखमी!
14
Mukesh Ambaniच्या 'या' कंपनीचा येणार IPO? मेटा, गुगलचीही आहे भागीदारी; किती असेल किंमत?
15
“अशा प्रकारचे धुके निर्माण करण्याचे काही कारण नाही”; भाजपा नेत्याचा भुजबळांवर पलटवार
16
ICICI आणि Yes Bank ला रिझर्व्ह बँकेनं ठोठावला १.९१ कोटींचा दंड, कारण काय?
17
दारुच्या आहारी गेला होता कपिल शर्मा; आत्महत्येसारखं उचलणार होता टोकाचं पाऊल
18
हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू
19
संतापजनक! भाजपा आमदाराने पेनने खोदला नवीन बांधलेला रस्ता; ठेकेदाराला धरलं धारेवर
20
शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती?

देशातील २० विद्यापीठे जागतिक दर्जाची बनविणार, मोदींची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 5:01 AM

जगातील प्रमुख ५०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नसल्याबद्दल खंत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, देशातील १० खासगी आणि १० सरकारी अशा २० विद्यापीठांना सरकारी बंधनातून स्वतंत्र करून, ती आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवण्यात येतील.

पाटणा : जगातील प्रमुख ५०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नसल्याबद्दल खंत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, देशातील १० खासगी आणि १० सरकारी अशा २० विद्यापीठांना सरकारी बंधनातून स्वतंत्र करून, ती आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवण्यात येतील. त्यासाठी येत्या पाच वर्षांत १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदतही देण्यात येईल.पाटणा विद्यापीठाच्या शताब्दी समारंभात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देण्यात यावा, असे आवाहन पंतप्रधानांना केले होते. त्याचा उल्लेख करून नरेंद्र मोदी म्हणाले की, विद्यापीठांना केंद्रीय दर्जा देणे ही आता भूतकाळातील गोष्ट झाली, असे मला वाटते. तिथवर न थांबता मी एक पाऊल टाकू इच्छितो. आमच्या देशात शैक्षणिक सुधारणा अतिशय मंदगतीने झाल्या आहेत. मात्र, आमच्या सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. हिंमत दाखविली आहे. देशात प्रथमच ‘आयआयएम’ला सरकारी नियंत्रणातून बाहेर काढून स्वतंत्र केले आहे. हा मोठा निर्णय आहे. तसेच भारतीय विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत, अशी आपली इच्छा आहे.थर्ड पार्टीकडून मूल्यांकनमोदी म्हणाले की, या विद्यापीठांची निवड कोणी नेता, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांकडून होणार नाही, तर संपूर्ण देशातील विद्यापीठांना यासाठी निमंत्रित करण्यात येईल. एका थर्ड पार्टी एजन्सीकडून १० खासगी आणि१० सरकारी विद्यापीठांची निवड करण्यात येईल.आपल्यालाच बदल करावे लागतीलज्या देशात नालंदा, विक्रमशिला, तक्षशिला यासारखी १३००, १५०० आणि १७०० वर्षांपूर्वीची विद्यापीठे जगाला आकर्षित करत होती, त्या देशातील एकही विद्यापीठ आज जगातील ५०० विद्यापीठांमध्ये नाही, ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. ही परिस्थिती बदलून टाकणे गरजेचे आहे. कोणी बाहेरून येऊन ही परिस्थिती बदलणार नाही. आपल्यालाच त्यासाठी बदल करावे लागतील.अध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांनीच पुढाकार घ्यावासरकारने देशातील २० विद्यापीठांना जागतिक दर्जा मिळावा, याकरिता काही पावले उचलायला सुरुवात केली आहे. या विद्यापीठांना सरकारी बंधने, नियम यातून मुक्तता देण्यात येईल. त्या विद्यापीठांना अर्थसाह्य केले जाईल.जागतिक दर्जा मिळावा, यासाठी विद्यापीठातील प्रशासक, अध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांनीच पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठीचे वातावरणही त्यांनीच तयार करायला हवे.या समारंभाला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, रामविलास पासवान, अश्विनी चौबे आणिउपेंद्र कुशवाह यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी