शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

सैन्याला युद्धात सज्ज ठेवण्यासाठी 20 हजार कोटींचे ताबडतोब करार

By admin | Updated: February 6, 2017 09:11 IST

गेल्या दोन ते तीन महिन्यात सरकारने दारुगोळ्यासहित युद्धासाठी गरज लागणा-या इतर साहित्याशी संबंधित 20 हजार कोटींचे करार केले आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - युद्धासारख्या आणीबाणी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी भारताने मोठी पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यात सरकारने दारुगोळ्यासहित युद्धासाठी गरजेच्या असणा-या  इतर साहित्याशी संबंधित 20 हजार कोटींचे करार केले असून त्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. शॉर्ट नोटीसवरही सेना दलाचे जवान, टँक्स, पायदळ आणि युद्धनौका युद्धासाठी तयार असावेत, याची खात्री सरकारकडून केली जात असून त्यासाठीच हे करार केले जात आहेत. 
 
संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युद्धपरिस्थिती निर्माण झाल्यास भारतीय सेनेला दारुगोळ्याची कमतरता भासू नये, आणि शत्रुला कमीत कमी 10 दिवस कडवी झुंज देता यावी,  हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सरकारने गतवर्षी सप्टेंबर महिन्यात उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. सरकारने ताबडतोब रशिया, फ्रान्स आणि इस्रायलशी यासंबंधी करार केला आहे. 
 
भारत - पाकिस्तान सीमारेषेवर दहशतवादाला सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून उत्तर देण्याव्यतिरिक्त सरकारने तिन्ही दलाच्या समिती गठीत केल्या आहेत. उपाध्यक्ष प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या या समितीला आणीबाणी परिस्थितीत विशेष आर्थिक अधिकार देण्यात आले आहेत. यानुसार आणीबाणी परिस्थितीत सेना दलाच्या भांडारात काही कमतरता असल्यास ती पुर्ण केली जाऊ शकते. 
 
2017-18 च्या अर्थसंकल्पात नव्या लष्करी प्रकल्पांबद्दल वेगळ्याने सांगण्यात आलं नसलं तरी 86,4888 कोटी रुपयांच्या निधीतून लष्कर आपल्या गरजा पुर्ण करत आहे. भारतीय हवाई दलाने 9200 कोटींच्या 43 करारांवर सह्या केल्या आहेत. तर लष्कराने रशियामधील कंपन्यांसोबत 10 करार अंतिम केले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर कोणत्याही दहशतवादी हल्ल्यानंतर सेना दलाच्या तुकड्या कारण देत आपली जबाबदारी झटकू शकणार नाहीत.