शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

सर्जिकल स्ट्राइकमध्ये तोयबाचे २० अतिरेकी ठार

By admin | Updated: October 10, 2016 05:31 IST

उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरात घुसून केलेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे २० अतिरेकी मारले गेले असा दावा गुप्तचर विभागाने

नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरात घुसून केलेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे २० अतिरेकी मारले गेले असा दावा गुप्तचर विभागाने केला आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद हाच तोयबाचा प्रमुख आहे. या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यात जी चर्चा झाली आहे त्यावरुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या हल्ल्यात तोयबाचे सर्वात जास्त नुकसान झाल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. भारतीय सैन्याकडून अशी काही कारवाई होईल, याची पुसटशी कल्पनाही या अतिरेक्यांना नव्हती. त्यामुळे या कारवाईने ते थक्कच झाले. भारतीय सैन्याने या अतिरेक्यांना मारण्यास सुरुवात केली तेव्हा हे अतिरेकी त्यांच्या चौकीकडे पळताना दिसत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याची वाहने आली आणि त्यांनी हे मृतदेह अज्ञात स्थळी नेले. सिमेपलीकडून झालेल्या गोळीबारात आमचे दोन सैनिक ठार झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

भांडवल करू नका-

 ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ करण्यापूर्वी भारतीय सैन्याने नियोजन केले होते. त्यामुळे ते कशासाठी खोटे बोलतील? आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. हा मामला सैन्य, देश आणि नागरिक यांच्याशी संबंधित आहे. मात्र, या विषयाचे भांडवल भाजपा करीत असल्याचा आरोप, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी केला. काँग्रेसच्या स्वराज्य संकल्प अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी रविवारी शेगावात आले असता, आयोजित पत्रकार परिषदेत विखे पाटील बोलत होते.

भारताचा भाग ताब्यात घ्या - रामदास आठवले च्अमरावती : उरी घटनेचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्काराने पाकिस्तानच्या सीमेत घुसून ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून देशाची शान वाढविली आहे. मात्र, आता शत्रूला धडा शिकविण्यासाठी पाकव्याप्त काश्मिरातील भारताचा भाग ताब्यात घ्यावा, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे रविवारी व्यक्त केले.अमरावती येथे आयोजित बुद्ध महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आले असता त्यांनी पत्रपरिषद घेऊन सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली.

‘सर्जिकल स्ट्राईक’चे सरसंघचालकांकडून समर्थन-नागपूर : उरी येथील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या मुद्यावरून देशभरातील राजकारण तापत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी या लष्करी कारवाईचे स्वागत केले आहे. आपल्याकडे किती शक्ती आहे हे ती दाखविल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे शक्ती दाखविणे आवश्यक आहे. असे केल्यानेच आज जग आपल्यासोबत उभे आहे, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले. नागपुरात रविवारी आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.