शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
3
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
4
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
5
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
7
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
8
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
9
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."
10
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
11
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
12
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
13
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
14
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
15
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
16
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
17
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
18
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
19
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
20
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!

उमविच्या २० फे र्‍या बंद

By admin | Updated: December 9, 2015 23:59 IST

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जळगाव आगारातर्फे बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र खाजगी वाहतुकीमुळे उत्पन्नावर परिणाम होऊन चालक व वाहकांचे पगारदेखील निघणे मुश्कील असल्याने सहा महिन्यापासून ३६ पैकी २० फेर्‍या बंद करण्यातआल्या आहेत. मात्र फेर्‍या बंद झाल्याने विद्यार्थ्याचे हाल होत असल्याची ओरड काही विद्यार्थी संघटनांनी केेली आहे.

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जळगाव आगारातर्फे बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र खाजगी वाहतुकीमुळे उत्पन्नावर परिणाम होऊन चालक व वाहकांचे पगारदेखील निघणे मुश्कील असल्याने सहा महिन्यापासून ३६ पैकी २० फेर्‍या बंद करण्यातआल्या आहेत. मात्र फेर्‍या बंद झाल्याने विद्यार्थ्याचे हाल होत असल्याची ओरड काही विद्यार्थी संघटनांनी केेली आहे.
महानगरपालिकेने सिटी बससेवा बंद केल्याने सहा सात महिन्या अगोदर जळगाव आगारातर्फे ३६ फेर्‍यांसहीत बससेवा सुरू करण्यात आली. मात्र खाजगी रिक्षाचे भाडे बसच्या भाड्यापेक्षा कमी असल्याने विद्यार्थ्यांनी खाजगी वाहतुकीला प्राध्यान्य दिले. हळुहळु आगाराचे उत्पन्न घटू लागले. परिणामी दोन तीन महिन्यातच दहा फेर्‍या बंद क राव्या लागल्या. त्यानंतर अजून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी मिळाल्याने नाईलाजास्तव २० फेर्‍या कमी कराव्या लागल्या.
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुरू करण्यात बससेवेला विद्यार्थ्यांचाच प्रतिसाद कमी मिळत असल्याने सध्या पाच फेर्‍यांमिळून चार पाचशे रुपये उत्पन्न मिळत आहे. म्हणचे एका फेरीला फक्त शंभर रुपये. मात्र एका फेरीला डिझेल व कर्मचार्‍यांचा पगार असा एकू ण खर्च ३ हजारापर्यंत आहे. उत्पन्नपेक्षा खर्च जास्त असल्याने बसफे र्‍या बंद कराव्या लागल्या असे जुने बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक एम.एन.सोनवणे यांनी सांगितले.
उत्पन्नाअभावी महानगरपालिकेनेही केली सिटी बससेवा बंद
पाच वर्षापूर्वी महानगरपालिकेने आगाराकडून हस्तांतरित करून सिटी बससेवा सुरू केली. मात्र पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने कर्मचार्‍यांचा पगारदेखील निघत नव्हता. उत्पन्नाअभावी महानगरपालिकेनेही सिटी बससेवा बंद करून तीन वर्षातच पुन्हा रा.प. मंडळाकडे सोपविण्यात आली.
पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे रोज अपडाऊन
शहरातील विविध भागातून रोज पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी अपडाऊन करीत असतात. पैकी अडीचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या पासेस् आहेत. बसफेर्‍या कमी झाल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव खाजगी वाहतुकीने प्रवास करावा लागतो. याने खाजगी वाहतुकीला ऊत येऊन विद्यार्थ्यांना रिक्षा चालकांच्या मनमानी व दादागिरीला सामोरे जावे लागते, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.
कोट-
आजपासून प्रायोगिकतत्त्वावर पाच फेर्‍यात वाढ विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता मंगळवारपासून विद्यापीठासाठी जादा पाच फेर्‍या वाढविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाल्यास फेर्‍या नियमित ठेवण्यात येतील. -एस.बी. खडसे, आगारप्रमुख, जळगाव
बसफेर्‍या कमी झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. साहजिकच खाजगी वाहतुकीने प्रवास करावा लागतो. मात्र यामुळे खाजगी रिक्षाचालकांची दादागिरी वाढत असून त्यांच्या मनमानीला सामोर जावे लागत आहे. फेर्‍या वाढविण्यात याव्या, जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. -अमित पाटील, अभाविप, महानगरमंत्री