शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

उमविच्या २० फे र्‍या बंद

By admin | Updated: December 9, 2015 23:59 IST

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जळगाव आगारातर्फे बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र खाजगी वाहतुकीमुळे उत्पन्नावर परिणाम होऊन चालक व वाहकांचे पगारदेखील निघणे मुश्कील असल्याने सहा महिन्यापासून ३६ पैकी २० फेर्‍या बंद करण्यातआल्या आहेत. मात्र फेर्‍या बंद झाल्याने विद्यार्थ्याचे हाल होत असल्याची ओरड काही विद्यार्थी संघटनांनी केेली आहे.

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जळगाव आगारातर्फे बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र खाजगी वाहतुकीमुळे उत्पन्नावर परिणाम होऊन चालक व वाहकांचे पगारदेखील निघणे मुश्कील असल्याने सहा महिन्यापासून ३६ पैकी २० फेर्‍या बंद करण्यातआल्या आहेत. मात्र फेर्‍या बंद झाल्याने विद्यार्थ्याचे हाल होत असल्याची ओरड काही विद्यार्थी संघटनांनी केेली आहे.
महानगरपालिकेने सिटी बससेवा बंद केल्याने सहा सात महिन्या अगोदर जळगाव आगारातर्फे ३६ फेर्‍यांसहीत बससेवा सुरू करण्यात आली. मात्र खाजगी रिक्षाचे भाडे बसच्या भाड्यापेक्षा कमी असल्याने विद्यार्थ्यांनी खाजगी वाहतुकीला प्राध्यान्य दिले. हळुहळु आगाराचे उत्पन्न घटू लागले. परिणामी दोन तीन महिन्यातच दहा फेर्‍या बंद क राव्या लागल्या. त्यानंतर अजून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी मिळाल्याने नाईलाजास्तव २० फेर्‍या कमी कराव्या लागल्या.
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुरू करण्यात बससेवेला विद्यार्थ्यांचाच प्रतिसाद कमी मिळत असल्याने सध्या पाच फेर्‍यांमिळून चार पाचशे रुपये उत्पन्न मिळत आहे. म्हणचे एका फेरीला फक्त शंभर रुपये. मात्र एका फेरीला डिझेल व कर्मचार्‍यांचा पगार असा एकू ण खर्च ३ हजारापर्यंत आहे. उत्पन्नपेक्षा खर्च जास्त असल्याने बसफे र्‍या बंद कराव्या लागल्या असे जुने बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक एम.एन.सोनवणे यांनी सांगितले.
उत्पन्नाअभावी महानगरपालिकेनेही केली सिटी बससेवा बंद
पाच वर्षापूर्वी महानगरपालिकेने आगाराकडून हस्तांतरित करून सिटी बससेवा सुरू केली. मात्र पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने कर्मचार्‍यांचा पगारदेखील निघत नव्हता. उत्पन्नाअभावी महानगरपालिकेनेही सिटी बससेवा बंद करून तीन वर्षातच पुन्हा रा.प. मंडळाकडे सोपविण्यात आली.
पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे रोज अपडाऊन
शहरातील विविध भागातून रोज पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी अपडाऊन करीत असतात. पैकी अडीचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या पासेस् आहेत. बसफेर्‍या कमी झाल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव खाजगी वाहतुकीने प्रवास करावा लागतो. याने खाजगी वाहतुकीला ऊत येऊन विद्यार्थ्यांना रिक्षा चालकांच्या मनमानी व दादागिरीला सामोरे जावे लागते, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.
कोट-
आजपासून प्रायोगिकतत्त्वावर पाच फेर्‍यात वाढ विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता मंगळवारपासून विद्यापीठासाठी जादा पाच फेर्‍या वाढविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाल्यास फेर्‍या नियमित ठेवण्यात येतील. -एस.बी. खडसे, आगारप्रमुख, जळगाव
बसफेर्‍या कमी झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. साहजिकच खाजगी वाहतुकीने प्रवास करावा लागतो. मात्र यामुळे खाजगी रिक्षाचालकांची दादागिरी वाढत असून त्यांच्या मनमानीला सामोर जावे लागत आहे. फेर्‍या वाढविण्यात याव्या, जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. -अमित पाटील, अभाविप, महानगरमंत्री