शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

भरधाव ट्रकच्या धडकेत 20 ठार

By admin | Updated: April 21, 2017 20:27 IST

चित्तूर जिल्ह्यात एक वेदनादायक अपघात घडला आहे.

ऑनलाइन लोकमतआंध्र प्रदेश, दि. 21 - चित्तूर जिल्ह्यात एक वेदनादायक अपघात घडला आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव ट्रकनं विजेच्या खांबाला धडक दिली आहे. या धडकेत 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. या विचित्र अपघातात विजेचा शॉक लागून अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चित्तूरमधल्या येर्पेडू गावात हा भीषण अपघात घडला आहे. चालकाचा अचानक ट्रकवरील ताबा सुटला. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने तुटवत हा ट्रक थेट जाऊन एका विजेच्या खांबाला धडकला. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातातील जखमींना तिरुपती आणि श्रीकालहस्ती येथील रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आलं आहे. विजेच्या तारांचा शॉक लागल्याने आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही शहर पोलीस अधीक्षक विजयलक्ष्मींनी व्यक्त केली आहे. जखमींमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश असून, काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. आंध्र प्रदेश सरकारने या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं असून, मृतांच्या कुटुंबीयांचं सांत्वनही केलं आहे. जखमींची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी, अशी प्रार्थना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून केली आहे.