शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

भरधाव ट्रकच्या धडकेत 20 ठार

By admin | Updated: April 21, 2017 20:27 IST

चित्तूर जिल्ह्यात एक वेदनादायक अपघात घडला आहे.

ऑनलाइन लोकमतआंध्र प्रदेश, दि. 21 - चित्तूर जिल्ह्यात एक वेदनादायक अपघात घडला आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव ट्रकनं विजेच्या खांबाला धडक दिली आहे. या धडकेत 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. या विचित्र अपघातात विजेचा शॉक लागून अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चित्तूरमधल्या येर्पेडू गावात हा भीषण अपघात घडला आहे. चालकाचा अचानक ट्रकवरील ताबा सुटला. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने तुटवत हा ट्रक थेट जाऊन एका विजेच्या खांबाला धडकला. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातातील जखमींना तिरुपती आणि श्रीकालहस्ती येथील रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आलं आहे. विजेच्या तारांचा शॉक लागल्याने आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही शहर पोलीस अधीक्षक विजयलक्ष्मींनी व्यक्त केली आहे. जखमींमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश असून, काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. आंध्र प्रदेश सरकारने या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं असून, मृतांच्या कुटुंबीयांचं सांत्वनही केलं आहे. जखमींची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी, अशी प्रार्थना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून केली आहे.