शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

भारतीय लष्करानं प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून 20 दहशतवाद्यांचा केला खात्मा ?

By admin | Updated: September 24, 2016 04:15 IST

भारतीय लष्कराच्या एका स्पेशल टीमनं प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे

ऑनलाइन लोकमत,

नवी दिल्ली, दि. 22 - उरी हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी भारतीय लष्करानं आता मोहीम उघडली आहे. भारतीय लष्कराच्या एका स्पेशल टीमनं प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे, असं वृत्त द क्विन्ट या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. मात्र केंद्र सरकार, लष्कराच्या कोणत्याही प्रवक्त्यांकडून याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. या हल्ल्यात आतापर्यंत 20 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. भारतीय लष्कराच्या दोन पॅरा फोर्सनं हा हल्ला केला आहे. भारतीय लष्कराच्या दोन गटांमध्ये विभागलेल्या या पॅरा फोर्समध्ये जवळपास 18 ते 20 जवान असल्याचं समजतं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तीन तळ उद्ध्वस्त करून 20 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या हल्ल्यात 200हून अधिक दहशतवादी जखमी झाल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येते आहे. लष्कराच्या सूत्रांनी ही माहिती दिल्याचा दावा द क्विन्ट या वृत्तसंस्थेनं केला आहे. मात्र केंद्र सरकार, लष्कराचा कोणत्याही सूत्रांकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. क्विन्टच्या माहितीनुसार, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरच पाकिस्तानी इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीएआय)नं उत्तर पाकिस्तानमधल्या शहरांमधून विमानसेवाही रद्द केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधली गिलगिट आणि स्कर्डू या शहरांची सेवा याच कारणास्तव खंडित केल्याची माहिती क्विन्टनं दिली आहे.