शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

वननिर्मितीसाठी २ लाख कोटींची गुंतवणूक

By admin | Updated: October 6, 2015 03:40 IST

नव्या आणि पर्यायी वननिर्मितीसाठी देशात २ लाख कोटींची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य सरकारने निर्धारित केले आहे. त्याद्वारे २५0 ते ३00 कोटी टनांचा अतिरिक्त कार्बन सिंक देशात

नवी दिल्ली : नव्या आणि पर्यायी वननिर्मितीसाठी देशात २ लाख कोटींची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य सरकारने निर्धारित केले आहे. त्याद्वारे २५0 ते ३00 कोटी टनांचा अतिरिक्त कार्बन सिंक देशात तयार होईल. पर्यावरणाचे संतुलन तर यामुळे तर सुधारेलच त्याचबरोबर वातावरणही अधिक स्वच्छ होईल, अशी माहिती पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत पत्रकार वार्तालापात दिली. संयुक्त राष्ट्र संघाच्या पॅरिस येथे होणाऱ्या क्लायमेट चेंज संमेलनापूर्वी भारतात २0३0 पर्यंत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण किमान ३५ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट सरकारने निर्धारित केल्याचा पुनरूच्चार करतांना जावडेकर म्हणाले, देशात सर्वाधिक खनिजे जंगलांच्या भूगर्भातअसल्यामुळे या क्षेत्रात खाणींना परवानगी दिली तर जंगलतोड अपरिहार्य ठरते. खाण उद्योगातील कंपन्यांना पर्यायी वनीकरणाची शर्त त्यासाठी लागू करण्यात आली आहे. खाणींसाठी जितक्या प्रमाणात जंगलतोड होईल, तितक्याच आकाराच्या दुसऱ्या पर्यायी भूभागावर नवे जंगल उभे करून देण्याची जबाबदारी या कंपन्यांवर येईल. सिव्हिल पेनल्टीज्चा नवा कायदा यासाठी लवकरच संसदेत मंजूर करवून घेण्याचा संकल्प मंत्रालयाने केला आहे. १९८0 सालच्या वन कायद्याच्या सक्तीमुळे देशात तयार सिंचन प्रकल्प कसे रखडले आहेत, याची उदाहरणे देतांना जावडेकर म्हणाले, झारखंडातल्या लातेहार जिल्ह्यात कोयल नदीवर कटकू धरण बांधण्याचे काम १९७0 साली सुरू झाले. देशात ब्रिटीश सरकारने केलेला १९२७ सालचा वन कायदा त्यावेळी अमलात होता. या कायद्याच्या आधारे १९९३ पर्यंत कटकू धरणाचे कालवे व जोड कालव्यांसह काम पूर्ण झाले. कोणीही त्यास हरकत घेतली नाही. दरम्यान १९८0 साली संसदेने नवा वनकायदा मंजूर केला.