शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
5
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
6
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
7
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
8
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
9
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
10
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
11
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
12
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
13
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
14
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
15
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
16
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
17
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
18
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
19
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?
20
पत्नीचं परपुरुषासोबत सुरू होत अफेयर, पतीला लागली कुणकुण अन् कांड झाला!

वननिर्मितीसाठी २ लाख कोटींची गुंतवणूक

By admin | Updated: October 6, 2015 03:40 IST

नव्या आणि पर्यायी वननिर्मितीसाठी देशात २ लाख कोटींची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य सरकारने निर्धारित केले आहे. त्याद्वारे २५0 ते ३00 कोटी टनांचा अतिरिक्त कार्बन सिंक देशात

नवी दिल्ली : नव्या आणि पर्यायी वननिर्मितीसाठी देशात २ लाख कोटींची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य सरकारने निर्धारित केले आहे. त्याद्वारे २५0 ते ३00 कोटी टनांचा अतिरिक्त कार्बन सिंक देशात तयार होईल. पर्यावरणाचे संतुलन तर यामुळे तर सुधारेलच त्याचबरोबर वातावरणही अधिक स्वच्छ होईल, अशी माहिती पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत पत्रकार वार्तालापात दिली. संयुक्त राष्ट्र संघाच्या पॅरिस येथे होणाऱ्या क्लायमेट चेंज संमेलनापूर्वी भारतात २0३0 पर्यंत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण किमान ३५ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट सरकारने निर्धारित केल्याचा पुनरूच्चार करतांना जावडेकर म्हणाले, देशात सर्वाधिक खनिजे जंगलांच्या भूगर्भातअसल्यामुळे या क्षेत्रात खाणींना परवानगी दिली तर जंगलतोड अपरिहार्य ठरते. खाण उद्योगातील कंपन्यांना पर्यायी वनीकरणाची शर्त त्यासाठी लागू करण्यात आली आहे. खाणींसाठी जितक्या प्रमाणात जंगलतोड होईल, तितक्याच आकाराच्या दुसऱ्या पर्यायी भूभागावर नवे जंगल उभे करून देण्याची जबाबदारी या कंपन्यांवर येईल. सिव्हिल पेनल्टीज्चा नवा कायदा यासाठी लवकरच संसदेत मंजूर करवून घेण्याचा संकल्प मंत्रालयाने केला आहे. १९८0 सालच्या वन कायद्याच्या सक्तीमुळे देशात तयार सिंचन प्रकल्प कसे रखडले आहेत, याची उदाहरणे देतांना जावडेकर म्हणाले, झारखंडातल्या लातेहार जिल्ह्यात कोयल नदीवर कटकू धरण बांधण्याचे काम १९७0 साली सुरू झाले. देशात ब्रिटीश सरकारने केलेला १९२७ सालचा वन कायदा त्यावेळी अमलात होता. या कायद्याच्या आधारे १९९३ पर्यंत कटकू धरणाचे कालवे व जोड कालव्यांसह काम पूर्ण झाले. कोणीही त्यास हरकत घेतली नाही. दरम्यान १९८0 साली संसदेने नवा वनकायदा मंजूर केला.