शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वननिर्मितीसाठी २ लाख कोटींची गुंतवणूक

By admin | Updated: October 6, 2015 03:40 IST

नव्या आणि पर्यायी वननिर्मितीसाठी देशात २ लाख कोटींची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य सरकारने निर्धारित केले आहे. त्याद्वारे २५0 ते ३00 कोटी टनांचा अतिरिक्त कार्बन सिंक देशात

नवी दिल्ली : नव्या आणि पर्यायी वननिर्मितीसाठी देशात २ लाख कोटींची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य सरकारने निर्धारित केले आहे. त्याद्वारे २५0 ते ३00 कोटी टनांचा अतिरिक्त कार्बन सिंक देशात तयार होईल. पर्यावरणाचे संतुलन तर यामुळे तर सुधारेलच त्याचबरोबर वातावरणही अधिक स्वच्छ होईल, अशी माहिती पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत पत्रकार वार्तालापात दिली. संयुक्त राष्ट्र संघाच्या पॅरिस येथे होणाऱ्या क्लायमेट चेंज संमेलनापूर्वी भारतात २0३0 पर्यंत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण किमान ३५ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट सरकारने निर्धारित केल्याचा पुनरूच्चार करतांना जावडेकर म्हणाले, देशात सर्वाधिक खनिजे जंगलांच्या भूगर्भातअसल्यामुळे या क्षेत्रात खाणींना परवानगी दिली तर जंगलतोड अपरिहार्य ठरते. खाण उद्योगातील कंपन्यांना पर्यायी वनीकरणाची शर्त त्यासाठी लागू करण्यात आली आहे. खाणींसाठी जितक्या प्रमाणात जंगलतोड होईल, तितक्याच आकाराच्या दुसऱ्या पर्यायी भूभागावर नवे जंगल उभे करून देण्याची जबाबदारी या कंपन्यांवर येईल. सिव्हिल पेनल्टीज्चा नवा कायदा यासाठी लवकरच संसदेत मंजूर करवून घेण्याचा संकल्प मंत्रालयाने केला आहे. १९८0 सालच्या वन कायद्याच्या सक्तीमुळे देशात तयार सिंचन प्रकल्प कसे रखडले आहेत, याची उदाहरणे देतांना जावडेकर म्हणाले, झारखंडातल्या लातेहार जिल्ह्यात कोयल नदीवर कटकू धरण बांधण्याचे काम १९७0 साली सुरू झाले. देशात ब्रिटीश सरकारने केलेला १९२७ सालचा वन कायदा त्यावेळी अमलात होता. या कायद्याच्या आधारे १९९३ पर्यंत कटकू धरणाचे कालवे व जोड कालव्यांसह काम पूर्ण झाले. कोणीही त्यास हरकत घेतली नाही. दरम्यान १९८0 साली संसदेने नवा वनकायदा मंजूर केला.