१९... सारांश
By admin | Updated: December 19, 2014 22:56 IST
छात्रसेनेने राबविले स्वच्छता अभियान
१९... सारांश
छात्रसेनेने राबविले स्वच्छता अभियानसावनेर : डॉ. हरिभाऊ आदमाने कॉलेजमधील छात्रसेनेच्या कॅडेस्नी स्वच्छ भारत अभियानांतर्गत मेजर बी. ए. टेकाडे यांच्या मार्गदर्शनात कॉलेजच्या परिसराची साफसफाई केली. यात कॅडेटसह संतदास सोनवाणी, ईश्वर बुरडे, जयदेव भुजाडे, रेखा लांबट, रामेश्वरी सोनवाणी, शुभम चौधरी सहभागी झाले होते. ***कृषिपंपाचे भारनियमन बंद करानरखेड : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जात आहे. हल्ली गारठा वाढल्याने रात्रीच्यावेळी ओलित करणे धोकादायक झाले आहे. दिवसा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे कृषिपंपाचे भारनियमन बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ***लाल्यामुळे कपाशी उद्ध्वस्तजलालखेडा : कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. नवीन फुलोराची प्रक्रिया थांबल्याने कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता बळावली आहे. आधी सोयाबीन आणि आता कपाशीने दगा दिल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. ***पांदण रस्त्यांची दुरुस्ती करामौदा : तालुक्यातील पांदण रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. शेतीची वहिवाट करण्यास अडचणी येत असल्याने तालुक्यातील पांदण रस्त्यांची वेळीच दुरुस्ती करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.***निवाऱ्यांअभावी प्रवासी त्रस्तकुही : तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये प्रवासी निवारे नाही. ज्या ठिकाणी निवारे आहेत, त्यांची दुरुस्ती अभावी दैनावस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने या निवाऱ्यांची दुरुस्ती करावी तसेच काही ठिकाणी नव्याने बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.***कृषिपंपाच्या बिलामुळे शेतकरी त्रस्त मेंढला : कृषिपंपाचे वीजबिल सरासरी आकारण्यात येत असल्याने या बिलांची आकारणी अवाजवी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मोठ्या रकमेमुळे बिल भरणे शक्य न झाल्यास वीजपुरवठा खंडित केला जातो. प्रसंगी वीजचोरीची कारवाई केली जाते. यातून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.*** दारू विक्रीला आळा घालालोहारीसावंगा : परिसरातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जात आहे. त्यामुळे गावातील भांडणांमध्ये वाढ झाली असून, महिला व तरुणींना त्रास होतो. या दारू विक्रेत्यांच्या विरुद्ध पोलीस कठोर कारवाई करीत नसल्याने अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी महिलांनी केली आहे. ***